* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789357202053
  • Edition : 1
  • Publishing Year : MARCH 2026
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 236
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KALYANIRAMAN BENNURWAR`S `ATARKYA` IS A COLLECTION OF STORIES THAT IS INTERTWINED WITH REALITY AND FANTASY, AND THAT SENDS SHIVERS DOWN THE SPINE. IT CONTAINS VARIOUS STORIES THAT ARE TRUE, FICTIONAL OR A MIXTURE OF BOTH. ONLY THAT DISTINCT HUMAN BEING- SOMEONE WHO IS EXCEPTIONALLY SENSITIVE GETS THE EXPERIENCE OF SOME INCIDENTS BEYOND THE COMMON PERCEPTIONS OF THE HUMAN MIND AND LOGIC. HE/SHE MIGHT ALWAYS OR MIGHT NOT HAVE EXPERIENCED THEM ONCE /OFTEN/ SUDDENLY AND THAT IS WHAT HAS BEEN WOVEN INTO THIS COLLECTION OF STORIES. THIS COMPILATION OF SIX STORIES IN TOTAL DESCRIBES THE PAINFUL SITUATION IN REALITY TO SOME EXTENT. MYSTERY - FEAR - MYSTERY - GHOSTS – LOYALTY/ DISLOYALTY TO ANCESTORS - CURSES RECEIVED BY GENERATIONS - THE CUSTOM OF “BALI” OR SACRIFICE - THE TRUTH BEHIND THE INEVITABLE - THE REPERCUSSIONS OF BLACK MAGIC - THE CRUEL DESIRE THAT LIVES ON EVEN AFTER DEATH TO TAKE REVENGE FOR INSULTS. `ATARKYA..!` IS A COLLECTION OF SUCH STRANGE AND INHUMANE EMOTIONS.
कल्याणीरमण बेन्नुरवार यांचा ‘अतर्क्य’ हा वास्तव आणि कल्पना यांत गुंफलेला, अंगावर शहारे आणणारा कथासंग्रह आहे. यामध्ये सत्य, कल्पित आणि या दोन्हींचे मिश्रण असलेल्या अशा विविध कथा आहेत. मानवी मनाच्या सर्वसामान्य जाणिवा आणि तर्काच्या पलीकडल्या काही घटना यांचा अनुभवही अशाच खास; परंतु विशिष्ट जाणिवांच्याच मनुष्य प्राण्याला येत असेल किंवा आला असेल; एकदा – अनेकदा – अचानक आणि त्याचीच गुंफण या कथासंग्रहात झाली आहे. एकूण सहा कथांचा हा कथासंग्रह काहीअंशी वास्तवतेतील वेदनादायी परिस्थिती विशद करतो. गूढ - भय – रहस्य – भुतं – पूर्वजांवरची निष्ठा-अनिष्ठा – पिढ्यांना मिळालेला शाप – बळी प्रथा – अटळ गोष्टींमागची सत्यता – करणी केल्यामुळे उमटणारे पडसाद – अपमानाचा बदला घेण्यासाठी मृत्युपश्चातही जिवंत असलेली क्रूर वासना अशा विचित्र व अमानविय वाटणाऱ्या भावनांचा संग्रह म्हणजे ‘अतर्क्य..!’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य#मेहतापब्लिशिंगहाऊस#मराठीपुस्तके#गूढकथासंग्रह#अतर्क्य#कल्याणीरमणबेन्नुरवार#MEHTAPUBLISHINGHOUSE#MARATHIBOOKS#STORIES#ATARKYA#KALYANIRAMANBENNURVAR
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more