* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789357207829
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 2026
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : NOVEL
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
PRAMILA TAI GETS MARRIED AND COMES TO APPA`S HOUSE FROM THE ORPHANAGE. PRATAP AND GAURI`S MOTHER HAS PASSED AWAY DUE TO ILLNESS, AND THE WHOLE HOUSE IS ENGULFED IN THIS GRIEF. PRAMILATAI PLEASES EVERYONE WITH HER LOVING, CULTURED, AND DUTIFUL BEHAVIOR; BUT SHE IS SAD AS SHE IS UNABLE TO CONNECT WITH PRATAP. BUT STILL, SHE NEVER EXCUSES PRATAP FOR HIS WRONG BEHAVIOR. SHE ALWAYS THINKS ABOUT THE FUTURE OF THOSE CHILDREN, THEIR GRANDMOTHER, AND THEIR FATHER. PRAMILATAI SAVES HER FAMILY AND HOME FROM THE SELFISH, FRAUDSTER UNCLE (MAMA). BUT IN THE END, THE UNCLE MANAGES TO STEAL AAJI`S JEWELRY, WHICH SHE REALIZES VERY LATE. AAJI IS ABOUT TO LEAVE FOR A PILGRIMAGE; BUT PRAMILATAI MEETS HER AND TELLS HER THAT PRATAP IS SICK AND BRINGS HER TO THE HOSPITAL. PRATAP WAITS FOR `CHHOTI AAI` EAGERLY. HE FINALLY APPRECIATES HIS LOVING `CHHOTI AAI` AND UNDERSTANDS THAT EVEN A STEPMOTHER CAN BE SO AFFECTIONATE. SHE ALSO HELPS OUT APPA IN HIS BUSINESS. GAURI IS THE DARLING OF `CHHOTI AAI`. SHE DECIDES NOT TO HAVE KIDS OF HER OWN AND THIS `CHHOTI AAI` HELPS BRING TOGETHER APPA`S SHATTERED LIFE.
अनाथाश्रमातून प्रमिलाताई लग्न करून आप्पांच्या घरी येतात. प्रताप व गौरीची आई आजारपणात अर्ध्यावर संसार सोडून जाते, याचे दु:ख सर्व घरावर पसरलेले असते. आपल्या प्रेमळ, संस्कारी, कर्तव्यदक्ष वागण्याने प्रमिलाताई सर्वांना आपलसं करतात;पण प्रतापच्या मनात अढी असल्याने त्यांचं मन उदास असे. पण तरीही चुकीच्या वर्तनाबद्दल त्यांनी प्रतापची कधीच गय केलेली नसते. कायम त्या मुलांच्या भविष्याचा, आजींचा, आप्पांचा विचार करतात. स्वार्थी, घरफोड्यावृत्तीच्या मामांपासून प्रमिलाताई आपल्या घराला वाचवतात. पण शेवटी मामा आजींचे दागिने लाटाळतातच. आजींना हा कावा फार उशिरा कळतो. त्या यात्रेला निघून जाणार असतात; पण प्रमिलाताई त्यांना नमस्कार करून प्रताप आजारी असल्याचं सांगतात व प्रतापकडे दवाखान्यात आणतात. प्रताप ‘छोटी आई’ची चातकासारखी वाट पाहतो. आपल्या प्रेमळ ‘छोटी आई’ ला त्याने ओळखलेलं असतं. सावत्र आई इतका जीव लावणारी असते, हे प्रतापला कळून चुकते. आप्पांनाही व्यवसायात छोटी आई मदत करते. गौरी तर ‘छोटी आई’ची लाडकीच असते. स्वत:ला मूल होऊ न देता ही ‘छोटी आई’ आप्पांचा विस्कटलेला संसार सावरते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य#मेहतापब्लिशिंगहाऊस#मराठीपुस्तके#कादंबरी#छोटीआई#प्रा.अनंतवासुदेववाईकर#MEHTAPUBLISHINGHOUSE#MARATHIBOOKS#NOVEL#CHHOTIAAI#PROF.ANANTVASUDEVVAIKAR
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more