A. P. KHARAT

About Author

Birth Date : 15/07/1936


PRINCIPAL ANANTRAO PANDURANG KHARAT WAS BORN IN A SMALL VILLAGE KHARATWADI (T. VALWA, DIST. SANGLI) IN A FARMING FAMILY. HE RECEIVED THE PROF.GANGUNANA KANETKAR AWARD FOR SECURING FIRST RANK IN B.ED FROM PUNE UNIVERSITY IN 1962. HE ALSO STOOD FIRST IN M.ED EXAM FROM SHIVAJI UNIVERSITY IN 1965. HE IS A RED RIBBON AWARDEE IN THE D.P.ED. COURSE.

प्राचार्य अनंतराव पांडुरंग खरात यांचा जन्म खरातवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) या छोट्या खेड्यात शेतकरी कुटुंबात झाला. 1962 मध्ये पुणे विद्यापीठाच्या बी.एड. परीक्षेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांना प्रा. गंगूनाना कानेटकर पारितोषिक मिळाले. 1965 मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या एम.एड. परीक्षेत त्यांना प्रथम क्रमांक मिळाला. डी.पी.एड. कोर्समध्ये ते ’रेड रिबन’चे मानकरी आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत व महाविद्यालयांत अध्यापनाचा त्यांचा अडतीस वर्षांचा अनुभव आहे. शैक्षणिक मानसशास्त्र, शैक्षणिक संशोधन, शैक्षणिक प्रशासन व शारीरिक शिक्षण या विषयांच्या अध्यापनात विशेष रस. चौदा वर्षे प्राचार्य म्हणून प्रशासकीय कामाचा त्यांना अनुभव आहे. तसेच रयत शिक्षण संस्थेच्या प्रशासकीय विभागात इंटर्नल ऑडिटर म्हणून त्यांनी तीन वर्षे काम केले आहे. ते रयत शिक्षण संस्थेचे निवृत्त आजीव सेवक आहेत. निवृत्तीनंतर रयत प्रिंटिंग प्रेसचे मानसेवी व्यवस्थापक म्हणून त्यांनी काही वर्षे सेवा केली आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SHARYATI SPARDHA KHEL Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more