AGNI SRIDHAR

About Author

Birth Date : 01/01/1955


AGNI SHRIDHAR IS A KANNADA FORMER GANGSTER, WRITER, CRITIC AND ARTIST. HE FOUNDED KARUNADA SENE. LATER HE FOUNDED THE WEEKLY KANNADA NEWSPAPER AGNI, AND TURNED A PROFESSIONAL WRITER. HE HAS WRITTEN A BOOK CALLED "DAADAGIRIYA DINAGALU", MEANING THE DAYS OF GOONDAISM. HE HAILS FROM KANAKAPURA AND STUDIED IN BANGALORE.

‘अग्नी’ श्रीधर हे बंगलोरच्या गुन्हेगारी विश्वातले एके काळचे कुविख्यात व्यक्तिमत्त्व. गुन्हेगारी जगतातील अनेक ‘डॉन’ त्यांचे साथीदार होते आणि ते स्वत:ही काही काळ बंगलोरचे ‘डॉन’ होते. कालांतराने गुन्हेगारी सोडल्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ले झाले, पण पुन्हा ते त्या जगाकडे वळले नाहीत. आज ते कन्नड चळवळीचे कार्यकर्ते आहेत. हिंदू मूलतत्ववाद, वर्णव्यवस्था आणि ब्राह्मण्याचे कठोर टीकाकार आहेत. आता ते विद्वान व आधुनिक विचारसरणीचे लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पूर्वायुष्यातील घटनांवर आधारित ‘दादागिरिय दिनगळु’ हे पुस्तक त्यांनी लिहिले. या पुस्तकावर आधारित ‘आ दिनगळु’ या चित्रपटाच्या पटकथेचे लेखनही त्यांनी केले आहे. एक चित्रपट निर्माता म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. ‘एदेगारिके’ या त्यांच्या कलाकृतीचा ‘जिगर’ हा अनुवाद. ‘अग्नी’ या नावाने ते एक कन्नड साप्ताहिक चालवतात. त्यावरूनच त्यांचे नाव ‘अग्नी’ श्रीधर असे पडले. आज बंगलोरच्या प्रतिष्ठित विश्वात त्यांना स्थान आहे. दोन भिन्न प्रकारची आयुष्यं जगल्यामुळे त्यांचे अनुभव रोमांचकारी आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
JIGAR Rating Star
Add To Cart INR 60

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more