AMBARISH MISHRA

About Author

Birth Date : 24/12/1995


HE HAS BEEN IN THE FIELD OF JOURNALISM SINCE 1975. HE STARTED OFF IN AIR, MUMBAI AS A CONTRACT ARTIST. HE IS CURRENTLY WORKING WITH THE TIMES OF INDIA, MUMBAI. HE HAS COMPLETED 25 YEARS IN THE TIMES OF INDIA.

जन्म, शिक्षण मुंबईत.काही काळ आकाशवाणी, मुंबई केंद्रात उमेदवारी. १९७५ सालापासून इंग्रजी पत्रसृष्टीत.क्लॅरिटी, बाँबे, द डेली, द इण्डिअन पोस्ट, सण्डे आॅब्जर्वर, द इण्डिपेन्डेन्ट या वृत्तपत्रांत बातमीदारी. गेली सत्तावीस वर्षं द टाइम्स आॅफ इण्डियाच्या मुंबई आवृत्तीत कार्यरत. मौज, माणूस, सत्यकथा, अक्षर, दीपावली ह्या दिवाळी अंकांत नियमित ललित लेखन. शुभ्र काही जीवघेणे, गंगेमध्ये गगन वितळले, संुदर ती दुसरी दुनिया, दरवळे इथे सुवास हे ललित लेखसंग्रह आणि अलख हा कवितासंग्रह प्रकाशित. गुलजारजींच्या उर्दू कथांचा तसेच त्यांच्या मिर्झा गालिब या चरित्राचा मराठी अनुवाद केला आहे. विजया मेहता यांच्या झिम्मा ह्या आत्मचरित्रात लेखन व संपादन सहाय्य. विजयाबाईंच्या कलाकीर्दीचा आढावा घेणाऱ्या बाई या ग्रंथाचं संपादन. राज्य शासन, महाराष्ट्र फौंडेशन, मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई मराठी पत्रकार संघ, इचलकरंजी सार्वजनिक वाचनालय, कोल्हापूरचा रणजित देसाई, पुण्याचा गो. नी. दांडेकर, गोपीनाथ पाटील, मराठी नाट्य परिषद असे मानाचे पुरस्कार-सन्मान प्राप्त झाले आहेत. मुंबईत वास्तव्य.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
GULZAR PATKATHA (6 BOOKS SET) Rating Star
Add To Cart INR 1295

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more