ANAND KANHERE

About Author

Birth Date : 04/06/1941


SEVENTY-FIVE-YEAR-OLD ANAND KANHERE IS A BARODA M.S. BA (ELECTRONICS) FROM THE UNIVERSITY AND MMS IN MANAGEMENT FROM THE UNIVERSITY OF PUNE. HE ALSO PLAYED CRICKET AND BADMINTON WELL. ) LEADERS OF TOMORROW IS A CERTIFICATE COURSE.

वयाच्या पंचाहत्तरीत असलेले आनंद कान्हेरे यांनी बडोद्याच्या एम.एस. विद्यापीठातून बी.ई (इलेक्ट्रॉनिक व पुणे विद्यापीठातून व्यवस्थापन क्षेत्रातील एम.एम.एस. या पदव्या घेतल्या आहेत. ते क्रिकेट व बॅडमिंटनही उत्तम खेळायचे. त्यांनी सातत्याने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांत भाग घेतला आणि विजेतेपद मिळवले होते. त्याशिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा (आय एल ओ चा) लीडर्स ऑफ टुमॉरो हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेला आहे. त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या मॅस्वी कंपनीत त्यांनी १९६५ ते १९७३ ही आठ वर्षे अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली. दुर्दैवाने ती कंपनी बंद पडल्यानंतर सह्याद्री उद्योग, किर्लोस्कर किसान, महिन्द्रा ओवेन, आरसीए फोटोफोन, स्वस्तिक रबर इत्यादी औद्योगिक आस्थापनांतून जबाबदारीच्या तंत्र-व्यवस्थापकीय पदांवर कामे केली. १९८२ मध्ये त्यांनी स्वत:चा हर्षांजली उद्योग हा व्यवसाय सुरू केला आणि १९८९ मध्ये त्याचे हर्षांजली इन्स्ट्रुमेंन्टस या कंपनीत रूपांतर केले. अलीकडे त्यांनी आपले ज्येष्ठ चिरंजीव जय यांच्या बरोबर जी. आय. ऑटोमेशन अ‍ॅन्ड सिस्टीम्स प्रा. लि. ही रोबोटिक्सच्या क्षेत्रात कार्य करणारी कंपनी सुरू केली. या वयातही ते औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची अजुनी रुसून आहे ही सामाजिक कादंबरी १९७३ मध्ये कुलकर्णी ग्रंथागार मार्फत प्रकाशित झाली आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MASVI KANHERE Rating Star
Add To Cart INR 180

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more