ARUN SHEVATE

About Author

Birth Date : 30/04/1958


NA

शेवते १९९३ पासून ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकाचे संपादन आणि प्रकाशन करत आहेत. ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकातील विविध लेखांची ५० पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. नापास मुलांची गोष्ट, हाती ज्यांच्या शून्य होते, एकच मुलगी, माझे गाव माझे जगणे, ऐवज तसेच ७९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर आधारित ‘संवाद’ इत्यादी पुस्तकांचे संपादन त्यांनी केले. त्यांचे ‘नापास मुलांची गोष्ट’ हे पुस्तक मुंबई विद्यापीठाच्या एफ.वाय.बी.ए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाले आहे. त्यांच्या ‘राजघाट’ या कवितासंग्रहाचा गुजरातीमध्ये अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळे यांनी डिसेंबर २०१७ मध्ये आयोजित केलेल्या ‘असेही एक संमेलन’ या साहित्य संमेलनाचे श्री. शेवते अध्यक्ष होते. शेवते यांना पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला. तसेच त्यांच्या ‘कावळ्यांच्या कविता’, ‘तळघर’ या कवितासंग्रहांना राज्य पुरस्कार, ‘ऐवज’ (निवडक ऋतुरंग) ग्रंथाला राज्य शासनाचा उत्कृष्ट संपादन पुरस्कार, ‘माझे गाव माझे जगणे’ ग्रंथाला व ‘राजघाट’ या कवितासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, तर ‘ऐवज’ या ग्रंथाला सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पुरस्कार यांसह ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकाला २५ वर्षांत ६० पारितोषिके प्राप्त झाली आहेत. शेवते यांची आजवर कवितासंग्रह, संपादन आणि इतर पुस्तके मिळून ७५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SAHEB SANDHYAKALI BHETALE Rating Star
Add To Cart INR 120

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more