ASHA BAGE

About Author

Birth Date : 28/07/1939


ASHA ARVIND BAGHE IS A SAHITYA AKADEMI AWARD WINNING WRITER. HE WAS BORN IN NAGPUR. TILL DATE, 5 NOVELS AND 9 COLLECTIONS OF SHORT STORIES HAVE BEEN PUBLISHED. SOME OF THE STORIES HAVE BEEN TRANSLATED INTO OTHER INDIAN LANGUAGES. TRANSLATIONS FROM ENGLISH, FRENCH, GERMAN AND URDU LANGUAGES ​​ARE ALSO POPULAR. RENOWNED HINDI WRITER SHRI. HIS STORY IS INCLUDED IN THE FIRST FIVE STORIES SELECTED BY KAMLESHWAR FROM MARATHI.

आशा अरविंद बगे या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका. यांचा जन्म नागपूर येथे झाला. आजपर्यंत त्यांच्या ५ कादंबऱ्या व ९ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. काही कथांचे भारतातील इतर भाषांतून अनुवाद प्रकाशित झाले आहेत. इंग्रजी, फ्रेंच, जर्मन व उर्दू या भाषांतूनही अनुवाद प्रसिध्द आहेत. विख्यात हिंदी साहित्यिक श्री. कमलेश्वर यांनी मराठीतून निवडलेल्या पहिल्या पाच कथांमध्ये यांच्या कथेचा समावेश आहे. दिल्लीला कथा या आंतरभारतीय संस्थेतर्फे इंग्रजी अनुवादाकरिता तुफान (१९९२) आणि पंख (१९९४) या कथांचा निवड झाली आहे. पुरस्कार : मारवा, अत्तर, पुजा, मांडव या कथासंग्रहांना व झुंबर या कादंबरीस महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाले आहेत. त्याच बरोबर नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा डॉ. अ.बा. वर्टी पुरस्कार, कै. राधाबाई बोबडे स्मृती पुरस्कार, कै. दि. बा. मोकाशी पुरस्कार, कै. काकासाहेब गाडगीळ पुरस्कार, पत्र या कथेला शांताराम कथा पुरस्कार, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र या कादंबरीला विदर्भ साहित्य संघ, नागपूर पुरस्कार, कथा शताब्दी वर्षात विदर्भ साहित्य संघाच्या लेखिका संमेलनाचे अध्यक्षपद, यंदाचा सु.ल. गद्रे मातोश्री पुरस्कार, दर्पण या कथासंग्रहास यंदाचा कै. केशवराव कोठावले पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. लेखनाव्यतिरिक्त त्यांना संगीताची आणि आई-वडील, आजोबांकडून वारसाने आलेली नाटकांचीही आवड आहे. पूर्वी अधून-मधून आकाशवाणी व रंगभूमीवर नाटकातून भूमिका केलेली आहे. महाराष्ट्र सेवा संघाचा सु.ल.गद्रे साहित्यिक पुरस्कार
Sort by
Show per page
Books not found in this category.

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
...गणेश जोशी, पुणे.

मी मूळचा अमरावतीचाच परंतु आता पुण्यास स्थायिक झालॊ आहे. या प्रस्तावनेस कारण की मी नुकतेच जी.बी.देशमुख ह्यांनी शब्दबद्ध केलेला श्री. रवींद्र वानखडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभव कथा `कुलामामाच्या देशात ` हा कथा संग्रह वाचला. खुपच आवडला. त्यातील `माकाय आकांत` ही कथा मनाला चटका लावून जाते.. एकंदरीत सर्वच कथा खूप छान शब्द बद्ध केल्या आहेत. मी स्वतः भारतीय स्टेट बँकेत असतांना जवळपास १० वर्षे परतवाड्यास होतो त्यामुळे मेळघाटशी माझा खूप जवळचा संबंध आला आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शरद जवंजाळ, अमरावती.

मी नुकतंच `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचलं. उत्तम लेखन व ओघवती भाषा शैली.