AVINASH HAMBIRRAO LONDHE

About Author

Birth Date : 17/02/1985


AVINASH LONDHE DID HIS M.TECH FROM IIT, KHARAGPUR. TOOK THIS DEGREE. CURRENTLY, HE IS A PROJECT MANAGER AT COCA-COLA COMPANY IN ETHIOPIA. HE IS ORIGINALLY FROM VENEGAON IN SOLAPUR DISTRICT. HE IS FOND OF READING, WRITING AND MUSIC. HIS CHAROLI COLLECTION BEDHUND WAS PUBLISHED IN 2011 BY SOCIAL WORKER SINDHUTAI SAPKAL. AVINASH LONDHE GOT FOURTH RANK IN YASHWANTRAO CHAVAN STATE LEVEL SCHOOL STORY COMPETITION HELD IN 2005-06.

अविनाश लोंढे यांनी खरगपूर येथील आयआयटीमधून एम.टेक. ही पदवी घेतली. सध्या ते इथिओपियामधील कोका-कोला कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील वेणेगावचे आहेत. त्यांना वाचन, लिखाण व संगीताचा छंद आहे. त्यांच्या बेधुंद या चारोळीसंग्रहाचे समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते २०११ मध्ये प्रकाशन झाले. २००५-०६ मध्ये झालेल्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय विद्यालयीन कथा स्पर्धेत अविनाश लोंढे यांना चौथा क्रमांक मिळाला. ते आयआयटी खरगपूरमध्ये महाराष्ट्र मंडळा चे सांस्कृतिक सचिव होते. तसेच ते २००५-०६ मध्ये डॉ. अण्णासाहेब शिंदे अभियांत्रिकी विद्यालयात अंतरंग कमिटीचे संपादक आणि वादविवाद, वक्तृत्व अन् सांस्कृतिक कमिटीचे सलग दोन वर्षे सदस्य होते.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
BEDHUND Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more