B.G. KESKAR

About Author

Birth Date : 01/06/1946


B.G. KESKAR 73 YEARS OLD SMALL FARMER FROM SOLAPUR COMPLETED HIS DEGREE IN B.COM. HE HAS WRITTEN 2 NOVELS & 4 STORY BOOK. MARATHI FILM “SURVANTA” BASED ON HIS NOVEL AWARDED BY GOVERNMENT OF MAHARASHTRA IN “BEST RURAL FILM” CATEGORY .

बा. ग. केसकर हे ग्रामीण साहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म जून 1946 मध्ये माळशिरस तालुक्यातील कुरबावी (जिल्हा सोलापूर) येथे झाला. त्यांनी बी. कॉम. ही पदवी घेतली. केसकर यांच्या वायटुळ आणि कुणाच्या खांद्यावर या दोन कादंबऱ्या तसेच फलोट, गुर्हाळ आणि डव्हाळं हे तीन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. यापैकी ’कुणाच्या खांद्यावर’ या कादंबरीला ह. ना. आपटे पारितोषिक तर ’डव्हाळं’ या कथासंग्रहाला रोहमारे पुरस्कार मिळाला आहे. तसेच कुणाच्या खांद्यावर या कादंबरीवर आधारित रामदास फुटाणे दिग्दर्शित ’सुर्वंता’ या मराठी चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृठ ग्रामीण चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. केसकर यांची ’दही’ ही कथा ज्ञानपीठ दिल्लीच्या भारतीय कहानियाँमध्ये समाविष्ट झाली आहे. केसकर यांच्या अनेक कथांचा इतर भाषांमध्येही अनुवाद झाला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
DAVHALA Rating Star
Add To Cart INR 180
SURVANTA Rating Star
Add To Cart INR 180

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more