BABY HALDER

About Author

Birth Date : 19/06/1973


BABY HALDER IS AN INDIAN AUTHOR. HER BEST KNOWN WORK IS HER AUTOBIOGRAPHY AALO AANDHARI WHICH DESCRIBES HER HARSH LIFE GROWING UP AS A DOMESTIC WORKER, LATER TRANSLATED INTO 21 LANGUAGES, INCLUDING 13 FOREIGN LANGUAGES.

बेबीचे वडील सैन्यात असल्याने, साधारण बत्तीस वर्षांपूर्वी, जम्मू-काश्मीर-मधल्या कुठल्याशा गावात बेबीचा जन्म झाला. तिचे वडील कधी घरात पैसे द्यायचे तर कधी द्यायचे नाहीत. त्यामुळे त्यांच्या घरात नेहमीच पैशांची अडचण असायची. त्यावरून भांडणेही व्हायची. म्हणूनच तिची आई घर सोडून निघून गेली. काही दिवसांनंतर बेबीच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. आणि त्यानंतर तिसरेही. सैन्यातून निवृत्त झाल्यावर त्यांनी लहान-मोठ्या नोकऱ्या केल्या. अखेर ते दुर्गापूरला स्थायिक झाले. बेबी तेरा वर्षांचीसुद्धा झाली नव्हती तेव्हाच तिचे लग्न, तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या मुलाशी लावून देण्यात आले. त्यामुळे तिला सातवीतूनच शाळा सोडावी लागली. पुढे बारा-तेरा वर्षांनी तिला तिचे घरही सोडावे लागले. कारण नवऱ्याचे वागणे तिला असह्य झाले. तीन मुलांना घेऊन तिने दुर्गापूर सोडले आणि फरीदाबादची रेल्वे पकडली. काही दिवस फरीदाबादला काढून ती गुडगावला आली. मोलकरीण म्हणून तिने आयुष्य कंठायला सुरुवात केली. आपल्या मुलांना स्वत:ची ओळख सांगताना अजिबात लाज वाटणार नाही, हा विचार मनात आल्यावर बेबीला अतिशय आनंद वाटतो.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
ALO-ANDHARI Rating Star
Add To Cart INR 160

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more