BELINDA VIEGAS

About Author


NA

बेलिंडा व्हीगस गोव्यात मानसोपचारतज्ज्ञ म्हणून व्यवसाय करतात. त्यांचा जन्म केनियात नैरोबीला झाला. सहलींना जाणं, मासे पकडणं आणि अभयारण्यात िंहडणं अशा रम्य वातावरणात त्यांनी बालपण व्यतीत केलं आहे. भारतात परतल्यावर त्यांनी बेळगावला शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि एम.बी.बी.एस. करण्यासाठी बंगळुरूच्या सेंट जॉन्स मेडिकल कॉलेजात प्रवेश घेतला. प्रिव्हेंटिव्ह आणि सोशल मेडिसिनसाठी त्यांना बंगळुरू युनिव्हर्सिटीकडून गुंडू राव गोल्ड मेडल मिळालं आणि कम्युनिटी मेडिसिनसाठी मेजर डॉ. के. पद्मनाभ मेनन प्राइझ मिळालं. त्यांनी बंगळुरूला एनआयएमएचएएनएस(द नॅशनल इाQन्स्टट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस)मधून मानसोपचारशास्त्रात एम.डी. केलं. तिथं असतानाच त्यांना रॉक क्लाइंबिंग आणि ट्रेविंÂगमध्ये रस निर्माण झाला आणि त्यांनी उत्तरकाशी स्वूÂल ऑफ माउंटेनिअरिंगमध्ये एक कोर्सही केला. त्यांनी मानसोपचारशास्त्राची लेक्चरर म्हणून सेंट जॉन्स मेडिकल कॉलेजात पुन्हा प्रवेश केला आणि विद्यार्थी आणि स्टाफसाठी ट्रेविंÂगचे कार्यक्रम आखणं चालूच ठेवलं. नेपाळला माउंट एव्हरेस्ट बेसवँÂपचा ट्रेक करीत असताना त्यांची व त्यांचे पती रिचर्ड यांची भेट झाली. लग्नानंतर त्या जर्मनीला गेल्या. तिथंच त्यांच्या मुलांचा जन्म झाला आणि त्यांनी लेखनाला सुरुवात केली. तरुणपणातच त्यांचं कुटुंब गोव्याला परत आलं आणि त्यांनी वार्काला व्यवसायास सुरुवात केली. अल्पकाळासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियातही वास्तव्य केलं.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
DHIVARACHI AARTA SAAD Rating Star
Add To Cart INR 295

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more