BISHWANATH GHOSH

About Author

Birth Date : 26/12/1970


BISHWANATH GHOSH IS AN INDIAN WRITER, JOURNALIST AND POET, BEST KNOWN FOR HIS LITERARY TRAVELOGUES WHICH DESCRIBE THE REAL ESSENCE OF INDIA. HIS MOST RECENT BOOK IS JIYO BANARAS, A COLLECTION OF HINDI POEMS ON BANARAS.

बिश्वनाथ घोष यांचा जन्म २०डिसेंबर, १९७० रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झाला. तेथे त्यांनी ‘द पायोनियर’ या मासिकाद्वारे आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. सन २००१ मध्ये ते दक्षिण भारतात गेले. त्या आधी त्यांनी नवी दिल्लीतील ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ व ‘एशियन एज’ या संस्थांसाठी आठ वर्षे पत्रकार म्हणून काम केले. चेन्नईत सन २००१ पासून त्यांनी ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’मध्ये काम केले. हे पुस्तक प्रकाशित झाले, त्या वेळी सन २००९ मध्ये चेन्नईत ते ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये सहसंपादक म्हणून काम करत होते. सध्या ते चेन्नई येथील ‘द हिंदू’ वृत्तपत्राचे उपसंपादक या पदावर काम करीत आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
CHAI, CHAI Rating Star
Add To Cart INR 150

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more