DHIRENDRA MEHTA

About Author

Birth Date : 29/08/1944


MA IN GUJARATI LITERATURE AND PH.D. MEHTA ATTENDED GUJARAT COLLEGE IN AHMEDABAD AND RR IN BHUJ. WORKED AS A PROFESSOR AT LALAN COLLEGE FOR A TOTAL OF 37 YEARS. AFTER RETIREMENT, HE MENTORED M.PHIL STUDENTS AT KUTCH UNIVERSITY.

गुजराथी साहित्य या विषयात एम.ए. आणि पीएच.डी. झालेल्या मेहता यांनी अहमदाबाद येथील गुजरात कॉलेज आणि भुज येथील आर.आर. लालन कॉलेज येथे एकूण ३७ वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. निवृत्तीनंतर त्यांनी कच्छ युनिव्हर्सिटीत एम.फिलच्या विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. १९८० सालापासून मेहता सातत्याने लेखन करीत आहेत. ते कवी, कथालेखक आणि कादंबरीकार म्हणून वाचकांना परिचित आहेत. याशिवाय त्यांनी विवेचक व संपादक अशा जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत. त्यांची ३० पुस्तके प्रकाशित असून त्यातील काही पुस्तकांचे इंग्रजी, हिंदी व ओडिया भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. काही कथांचे मराठीत अनुवाद झाले आहेत. २०१० साली त्यांच्या छावणी या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यांना रणजितराम सुवर्णचंद्रक , साहित्य क्षेत्रातील कामाबद्दल मुनशी सुवर्णचंद्रक , कादंबरी लेखनासाठी दर्शक फाउंडेशन अ‍ॅवॉर्ड व धूमकेतू चंद्रक आणि गुजराती साहित्य परिषद पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
CHHAVANI Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more