DR. ARVIND VAMAN KULKARNI

About Author

Birth Date : 04/07/1933
Death Date : 29/10/2003


DR. ARVIND VAMAN KULKARNI WAS A RENOWNED CRITIC, WRITER, POET. HIS DEVELOPMENT OF MARATHI PLAYWRITING TECHNIQUE - ETC. S. 1843 TO ETC. S. IN 1950, HIS PH.D. THESIS WAS AWARDED THE PARANJAPE PRIZE OF THE UNIVERSITY OF PUNE. HE TAUGHT MARATHI AT BRIHANMAHARASHTRA COLLEGE, PUNE, FERGUSSON COLLEGE AND JSM COLLEGE, ALIBAUG.

डॉ. अरविंद वामन कुळकर्णी हे नामवंत समीक्षक, लेखक, कवी होते. त्यांच्या ’मराठी नाट्यलेखन तंत्राचा विकास - इ. स. 1843 ते इ. स. 1950’ या पीएच.डी.च्या प्रबंधाला पुणे विद्यापीठाचे परांजपे पारितोषिक प्राप्त झाले होते. त्यांनी पुण्याच्या बृहन्महाराष्ट्र महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि अलिबागच्या जेएसएम महाविद्यालयात मराठीचे अध्यापन केले. अनेक विद्यार्थ्यांना एम.फिल./पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले. अनेक विद्यापीठांमध्ये ते निमंत्रित प्राध्यापक म्हणून जात असत. विविध मासिकांतून त्यांनी साहित्यविषयक लेख लिहिले. विविध मंचांवरून त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने दिली. त्यांच्या नावावर सुमारे सतरा ठांथ आहेत. इतस्तत:, कविता तायाच्या, वाटेच्या, रूप अव्यक्ता फुटले यांसारखे कवितासंठाह, साहित्यविचार सारखा भारतीय साहित्यशास्त्राबरोबरच साहित्याचा विविधांगाने अभ्यासपूर्ण वेध घेणारा ठांथ, मराठी नाट्यलेखन तंत्राची वाटचाल, विस्मरणात गेलेली नाटके यांसारखे नाट्यविषयक ठांथ इ. त्यांची ठांथसंपदा त्यांच्या लेखनाची वैविध्यपूर्णता दर्शवते. शरद जोशींबरोबर पंजाबात, भारतीय अर्थवादाचा क्रियाशील जनक, इ. पुस्तके हे त्यांच्या शेतकरी चळवळीतील सहभागाचे फलित होते. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्याबरोबर त्यांनी काम केले होते. ठाामीण साहित्य चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. साहित्यकृतीची गरज ओळखून त्याप्रमाणे समीक्षा करणे आणि साहित्यकृतीतील दोषही परखडपणे दाखवून देणे, ही त्यांच्या समीक्षात्मक लेखनाची वैशिष्ट्ये होती. मानसशास्त्रीय समीक्षेला अधिक उपयोजित करण्यात ते अठास्थानी होते. इतस्तत:, कविता तायाच्या, वाटेच्या या त्यांच्या कवितासंठाहांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला. उपयोजित समीक्षा : लक्षणे आणि पडताळणी या ठांथासाठी त्यांना साहित्य परिषदेच्या रा. श्री. जोग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनी त्यांच्या नावाने नवोदितांना समीक्षेसाठी आणि कवितेसाठी आलटूनपालटून पुरस्कार दिला जातो. पाच हजार रुपयांचा हा पुरस्कार आहे. या वर्षीपासून कशिश या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी त्यांच्या नावाचा पुरस्कार दिला जाणार आहे. पंधरा हजार रुपयांचा हा पुरस्कार असेल. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ते संस्थापक सदस्य होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या साहित्य पत्रिका या मासिकाचे काही काळ ते संपादक होते. त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल त्यांचे नाव 1983च्या इंडियाज हूज हूमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यांच्या घराजवळील चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. 1975च्या आणीबाणीला उघड उघड विरोध दर्शवणार्या मोजक्या साहित्यिकांपैकी ते एक होते. समाजाशी नाळ जोडलेले ते एक व्यासंगी समीक्षक-कवी होते.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
30 %
OFF
DR ARVIND KULKARNI BIRTHDAY OFFER Rating Star
Add To Cart INR 160 INR 112
UPYOJIT SAMIKSHA : LAKSHANE ANI PADT... Rating Star
Add To Cart INR 160

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more