DR. ARVIND VAMAN KULKARNI

About Author

Birth Date : 04/07/1933
Death Date : 29/10/2003


DR. ARVIND VAMAN KULKARNI WAS A RENOWNED CRITIC, WRITER, POET. HIS DEVELOPMENT OF MARATHI PLAYWRITING TECHNIQUE - ETC. S. 1843 TO ETC. S. IN 1950, HIS PH.D. THESIS WAS AWARDED THE PARANJAPE PRIZE OF THE UNIVERSITY OF PUNE. HE TAUGHT MARATHI AT BRIHANMAHARASHTRA COLLEGE, PUNE, FERGUSSON COLLEGE AND JSM COLLEGE, ALIBAUG.

डॉ. अरविंद वामन कुळकर्णी हे नामवंत समीक्षक, लेखक, कवी होते. त्यांच्या ’मराठी नाट्यलेखन तंत्राचा विकास - इ. स. 1843 ते इ. स. 1950’ या पीएच.डी.च्या प्रबंधाला पुणे विद्यापीठाचे परांजपे पारितोषिक प्राप्त झाले होते. त्यांनी पुण्याच्या बृहन्महाराष्ट्र महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि अलिबागच्या जेएसएम महाविद्यालयात मराठीचे अध्यापन केले. अनेक विद्यार्थ्यांना एम.फिल./पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले. अनेक विद्यापीठांमध्ये ते निमंत्रित प्राध्यापक म्हणून जात असत. विविध मासिकांतून त्यांनी साहित्यविषयक लेख लिहिले. विविध मंचांवरून त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने दिली. त्यांच्या नावावर सुमारे सतरा ठांथ आहेत. इतस्तत:, कविता तायाच्या, वाटेच्या, रूप अव्यक्ता फुटले यांसारखे कवितासंठाह, साहित्यविचार सारखा भारतीय साहित्यशास्त्राबरोबरच साहित्याचा विविधांगाने अभ्यासपूर्ण वेध घेणारा ठांथ, मराठी नाट्यलेखन तंत्राची वाटचाल, विस्मरणात गेलेली नाटके यांसारखे नाट्यविषयक ठांथ इ. त्यांची ठांथसंपदा त्यांच्या लेखनाची वैविध्यपूर्णता दर्शवते. शरद जोशींबरोबर पंजाबात, भारतीय अर्थवादाचा क्रियाशील जनक, इ. पुस्तके हे त्यांच्या शेतकरी चळवळीतील सहभागाचे फलित होते. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्याबरोबर त्यांनी काम केले होते. ठाामीण साहित्य चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. साहित्यकृतीची गरज ओळखून त्याप्रमाणे समीक्षा करणे आणि साहित्यकृतीतील दोषही परखडपणे दाखवून देणे, ही त्यांच्या समीक्षात्मक लेखनाची वैशिष्ट्ये होती. मानसशास्त्रीय समीक्षेला अधिक उपयोजित करण्यात ते अठास्थानी होते. इतस्तत:, कविता तायाच्या, वाटेच्या या त्यांच्या कवितासंठाहांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला. उपयोजित समीक्षा : लक्षणे आणि पडताळणी या ठांथासाठी त्यांना साहित्य परिषदेच्या रा. श्री. जोग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनी त्यांच्या नावाने नवोदितांना समीक्षेसाठी आणि कवितेसाठी आलटूनपालटून पुरस्कार दिला जातो. पाच हजार रुपयांचा हा पुरस्कार आहे. या वर्षीपासून कशिश या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी त्यांच्या नावाचा पुरस्कार दिला जाणार आहे. पंधरा हजार रुपयांचा हा पुरस्कार असेल. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ते संस्थापक सदस्य होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या साहित्य पत्रिका या मासिकाचे काही काळ ते संपादक होते. त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल त्यांचे नाव 1983च्या इंडियाज हूज हूमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यांच्या घराजवळील चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. 1975च्या आणीबाणीला उघड उघड विरोध दर्शवणार्या मोजक्या साहित्यिकांपैकी ते एक होते. समाजाशी नाळ जोडलेले ते एक व्यासंगी समीक्षक-कवी होते.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
UPYOJIT SAMIKSHA : LAKSHANE ANI PADT... Rating Star
Add To Cart INR 160

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
...गणेश जोशी, पुणे.

मी मूळचा अमरावतीचाच परंतु आता पुण्यास स्थायिक झालॊ आहे. या प्रस्तावनेस कारण की मी नुकतेच जी.बी.देशमुख ह्यांनी शब्दबद्ध केलेला श्री. रवींद्र वानखडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभव कथा `कुलामामाच्या देशात ` हा कथा संग्रह वाचला. खुपच आवडला. त्यातील `माकाय आकांत` ही कथा मनाला चटका लावून जाते.. एकंदरीत सर्वच कथा खूप छान शब्द बद्ध केल्या आहेत. मी स्वतः भारतीय स्टेट बँकेत असतांना जवळपास १० वर्षे परतवाड्यास होतो त्यामुळे मेळघाटशी माझा खूप जवळचा संबंध आला आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शरद जवंजाळ, अमरावती.

मी नुकतंच `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचलं. उत्तम लेखन व ओघवती भाषा शैली.