DR. BHALBA VIBHUTE

About Author


PROFESSOR (DR.) BHALCHANDRA BABURAO ALIAS BHALBA VIBHUTE, M.A., PH.D. (POLITICAL SCIENCE), DIRECTOR & HEAD, DEPARTMENT OF ADULT, CONTINUING EDUCATION & EXTENSION WORK, SHIVAJI UNIVERSITY, KOLHAPUR HAS A REWARDING CAREER AS A TEACHER FOR LAST 31 YEARS. HE HAS SUCCESSFULLY ADDRESSED THE NEEDS OF THE AMBIENT SOCIELY CONSISTENT WITH THE WORLD’S TRANSITION TO THE NEW MILLENNIUM BY IDENTIFYING LIFELONG LEARNING AS A KEY TO THE TWENTY – FIRST CENTURY

प्रा. डॉ. भालबा विभुते यांनी राज्यशास्त्र विषयात एम.ए. (१९७५) आणि पीएच.डी. (१९८१) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून प्राप्त केली. डॉ. विभुते हे शिवाजी विद्यापीठातील प्रौढ आणि निरंतर शिक्षण विभागाचे माजी संचालक आहेत. संचालक पदाच्या काळात त्यांनी शिवाजी विद्यापीठ संचलित श्रमिक विद्यापीठाचे संचालक आणि मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक म्हणून ४ वर्षे कर्तव्य बजावले आहे. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या कोल्हापूर विभागीय केंद्राचे संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. १९७८ ते १९८४ या काळात कोल्हापूर येथील न्यू कॉलेजमध्ये राज्यशास्त्राचे अधिव्याख्याता म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. डॉ. विभुते यांनी शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद, सिनेट, अ‍ॅकॅडमिक कौन्सिल इत्यादी अधिकार मंडळांवर काम केले आहे. तसेच युजीसी, राज्यशासन, देशातील विविध विद्यापीठे, राज्य साधन केंद्र, पुणे आकाशवाणी (महाराष्ट्र), कामगार कल्याण मंडळ (महाराष्ट्र) इत्यादी संस्था, मंडळांवर सदस्य म्हणून कार्य केले आहे. तसेच महाविद्यालयांच्या विविध व्यवस्थापनावरही काम केले आहे. डॉ. विभुते यांनी ३० ग्रंथांचे लेखन, संपादन केले आहे. त्यांच्या ‘महात्मा फुले विचारधन’ या पुस्तकात महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे तर ‘प्रौढ शिक्षण योजना, यंत्रणा आणि कार्यवाही’ या ग्रंथास शिवाजी विद्यापीठाने उत्कृष्ट ग्रंथ म्हणून पुरस्कृत केले आहे. डॉ. विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली चार विद्याथ्र्यांनी पीएच.डी. संशोधन तर पाच विद्याथ्र्यांनी एम.फिल. पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी ९ संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय परिसंवादामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. उत्तम वक्ते, लेखक, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक म्हणून त्यांना ओळखले जाते. विशेषत: संसदीय लोकशाही आणि आजीवन अध्ययन या क्षेत्रांत राष्ट्रीय पातळीवर त्यांना मान्यता प्राप्त झाली आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more