DR. BHALBA VIBHUTE

About Author


PROFESSOR (DR.) BHALCHANDRA BABURAO ALIAS BHALBA VIBHUTE, M.A., PH.D. (POLITICAL SCIENCE), DIRECTOR & HEAD, DEPARTMENT OF ADULT, CONTINUING EDUCATION & EXTENSION WORK, SHIVAJI UNIVERSITY, KOLHAPUR HAS A REWARDING CAREER AS A TEACHER FOR LAST 31 YEARS. HE HAS SUCCESSFULLY ADDRESSED THE NEEDS OF THE AMBIENT SOCIELY CONSISTENT WITH THE WORLD’S TRANSITION TO THE NEW MILLENNIUM BY IDENTIFYING LIFELONG LEARNING AS A KEY TO THE TWENTY – FIRST CENTURY

प्रा. डॉ. भालबा विभुते यांनी राज्यशास्त्र विषयात एम.ए. (१९७५) आणि पीएच.डी. (१९८१) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून प्राप्त केली. डॉ. विभुते हे शिवाजी विद्यापीठातील प्रौढ आणि निरंतर शिक्षण विभागाचे माजी संचालक आहेत. संचालक पदाच्या काळात त्यांनी शिवाजी विद्यापीठ संचलित श्रमिक विद्यापीठाचे संचालक आणि मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक म्हणून ४ वर्षे कर्तव्य बजावले आहे. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या कोल्हापूर विभागीय केंद्राचे संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. १९७८ ते १९८४ या काळात कोल्हापूर येथील न्यू कॉलेजमध्ये राज्यशास्त्राचे अधिव्याख्याता म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. डॉ. विभुते यांनी शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद, सिनेट, अ‍ॅकॅडमिक कौन्सिल इत्यादी अधिकार मंडळांवर काम केले आहे. तसेच युजीसी, राज्यशासन, देशातील विविध विद्यापीठे, राज्य साधन केंद्र, पुणे आकाशवाणी (महाराष्ट्र), कामगार कल्याण मंडळ (महाराष्ट्र) इत्यादी संस्था, मंडळांवर सदस्य म्हणून कार्य केले आहे. तसेच महाविद्यालयांच्या विविध व्यवस्थापनावरही काम केले आहे. डॉ. विभुते यांनी ३० ग्रंथांचे लेखन, संपादन केले आहे. त्यांच्या ‘महात्मा फुले विचारधन’ या पुस्तकात महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे तर ‘प्रौढ शिक्षण योजना, यंत्रणा आणि कार्यवाही’ या ग्रंथास शिवाजी विद्यापीठाने उत्कृष्ट ग्रंथ म्हणून पुरस्कृत केले आहे. डॉ. विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली चार विद्याथ्र्यांनी पीएच.डी. संशोधन तर पाच विद्याथ्र्यांनी एम.फिल. पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी ९ संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय परिसंवादामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. उत्तम वक्ते, लेखक, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक म्हणून त्यांना ओळखले जाते. विशेषत: संसदीय लोकशाही आणि आजीवन अध्ययन या क्षेत्रांत राष्ट्रीय पातळीवर त्यांना मान्यता प्राप्त झाली आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more