DR. GIRISH VALAVALKAR

About Author


DR. GIRISH WALAWALKAR OBTAINED HIS DOCTORATE IN BIOCHEMISTRY FROM THE UNIVERSITY OF MUMBAI. HE HAS DONE RESEARCH IN ENZYME TECHNOLOGY. MANY OF HIS RESEARCH PAPERS HAVE BEEN PUBLISHED. HE HAS DONE A CERTIFICATE COURSE AT IIM-AHMEDABAD. HE HAS WRITTEN ON VARIOUS TOPICS IN ENGLISH AND MARATHI NEWSPAPERS AND MAGAZINES OF TIMES OF INDIA, INDIAN EXPRESS, DAINIK BHASKAR, LOKMAT, KRISHIWAL GROUPS. HIS DRAMA UNREHITAD WAS TELECASTED ON DOORDARSHAN.

डॉ. गिरीश वालावलकर यांनी मुंबई विद्यापीठातून जीवरसायनशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवली. एंझाईम टेक्नॉलॉजी या विषयात त्यांनी संशोधन केलं आहे. त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांनी आय.आय.एम.- अहमदाबाद येथे सर्टिफिकेट कोर्स केला आहे. टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्स्प्रेस, दैनिक भास्कर, लोकमत, कृषीवल या समूहांच्या इंग्रजी, मराठी वृत्तपत्रं आणि नियतकालिकांमध्ये त्यांनी विविध विषयांवर लेखन केलं आहे. त्यांचं अपरिचित हे नाटक दूरदर्शनवरून प्रसारित करण्यात आलं होतं. फरमेंटा बायोटेक लिमिटेड या कंपनीच्या जीवतंत्रज्ञान विभागाचे सी.ई.ओ. म्हणून ते आठ वर्षं कार्यरत होते. जर्मनी, स्वित्झर्लंड, इंग्लंड, स्पेन, श्रीलंका, बांगलादेश, चीन इत्यादी देशांमध्ये व्यवसायासंबंधीची प्रेझेंटेशन्स त्यांनी केली आहेत. सध्या ते वोखार्ड फाउंडेशन चे डायरेक्टर आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
CEO CHA CABIN MADHUN Rating Star
Add To Cart INR 195
CORONANANTARCHE UDYOGVISHWA Rating Star
Add To Cart INR 320
EKE DIWASHI Rating Star
Add To Cart INR 220

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more