DR.SUCHIT TAMBOLI

About Author

Birth Date : 24/02/1965


PAEDIATRICS, CHILD DEVELOPMENT AND ADOLESCENCE (M.B.B.S., D.C.H., P.G.D.A.P., P.G.D.M.L.S.) IN JANUARY, 1992, MAHARASHTRAS FIRST PRIVATE CHILD DEVELOPMENT CENTER WAS ESTABLISHED AT AHMEDNAGAR. EARLY INTERVENTION TREATMENT METHODS, CHILD BEHAVIOR PROBLEMS, CHILDREN FALLING BEHIND IN SCHOOL, MENTAL RETARDATION, FAMILY HEALTH-COACHING FOR ADOLESCENT CHILDREN ETC. SPEECHES ALL OVER INDIA ON THE SUBJECTS.

बालरोग, बालविकास व पौगंडावस्थातज्ज्ञ (M.B.B.S., D.C.H., P.G.D.A.P., P.G.D.M.L.S.) जानेवारी, १९९२ मध्ये अहमदनगर येथे महाराष्ट्रातील पहिल्या खासगी बालविकास केंद्राची स्थापना. लवकर हस्तक्षेप उपचार पद्धती , मुलांच्या वर्तनसमस्या, शाळेत मागे पडणारी मुले, मतिमंदत्व, पौगंडावस्थेतील मुलांसाठी कौटुंबिक आरोग्य-प्रशिक्षण इ. विषयांवर संपूर्ण भारतभर भाषणे. राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ संघटने च्या शालेय शिक्षण समितीचे सदस्य. आकाशवाणीवर ५० कार्यक्रम प्रक्षेपित. लोकमत , सकाळ , लोकसत्ता , महाराष्ट्र टाइम्स इ. वृत्तपत्रांमध्ये लेख प्रसिद्ध. जन्मलेल्या बाळांसाठी मातेने करायचा सोपा बौद्धिक कार्यक्रम जागतिक आरोग्य संघटने नेसुद्धा (WHO) मान्य केला आहे. राष्ट्रीय स्थूलता निवारण समिती २०१२-१४ चे सदस्य, लवकर हस्तक्षेप उपचार केंद्र केंद्रशासन संचालित कार्यक्रमात सल्लागार समितीवर (२०१३). २०१४-१५ साठी राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या वाढ, विकास, वर्तनसमस्या या उपविभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष. २०१५ महाराष्ट्र शासनाच्या अपंगत्व प्रमाणीकरण समितीचे अध्यक्ष. समितीच्या रिपोर्टवर कायदा होणार. विविध विषयांवर भाषणे – फेब्रुवारी, २००१ पाटणा – मुलांच्या वर्तनसमस्या. नोव्हेंबर, २००२ दिल्ली – आंतरराष्ट्रीय परिषद, शाळेतील व वातावरणातील घटकांचा पौगंडावस्थेतील मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर होणारा परिणाम. जानेवारी, २००३ मुंबई – मुलांचा विकास व प्रश्न. जानेवारी, २००४ चेन्नई – मुलांच्या बौद्धिक विकासाचे प्रश्न कसे ओळखायचे, तसेच मुलांशी सुसंवाद : वाचा विकास यावर मार्गदर्शन. सप्टेंबर, २००४ गुवाहाटी – सेरेब्रल पाल्सी आणि मतिमंदत्व निदान-उपचार. ऑक्टोबर, २००५ लखनौ – विकासात्मक चाचण्या. जानेवारी, २००६ दिल्ली – आहार व अपंगत्व. सप्टेंबर, २००६ दिल्ली – वाढीच्या तक्त्यांचा प्रक्टिसमध्ये वापर. सप्टेंबर, २००७ कटक – स्वनियंत्रित उपचाराद्वारे पौगंडावस्थेतील मुलांच्या वर्तनसमस्यांचे निराकारण. जानेवारी, २००८ मुंबई – प्रसारमाध्यमांचा मुलांच्या वर्तनावर होणारा परिणाम. डिसेंबर, २००८ महाबळेश्वर – पौगंडावस्थेतील मुलांच्या वर्तनसमस्या व उपचार. जानेवारी, २०१० हैदराबाद – दोन वर्षांच्या खालील मुलांसाठी खेळ-शाळा कशी असावी. ऑक्टोबर, २०१० – सवयींचे आजार तर लुधियाना येथे वर्तनसमस्या ओळख व उपचार. जयपूर-२०११, मुंबई-२०१२, शिर्डी-२०१२ येथील राष्ट्रीय परिषदांमध्ये वर्तनसमस्यांचे उपचार, लवकर हस्तक्षेप उपचार. २०१० मध्ये अध्ययन अक्षमता यावर कोल्हापूर येथे राज्यस्तरीय परिषदेत, तर नागपूरला २०१२, अस्थिर मुले व शाळेतील कार्यक्षमता तसेच वर्तनात्मक उपचार व औषधांचे उपचार यांतील फरक.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MULANCHYA SAMRUDDHA JIVANASATHI Rating Star
Add To Cart INR 260

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more