EDITED BY DR. NAGNATH KOTTAPALLE

About Author

Birth Date : 29/03/1948
Death Date : 30/11/2022


KOTAPALLE WAS BORN AT MUKHED IN NANDED DISTRICT. IN 1971, PH.D. AFTER GETTING IT, HE WORKED AS A LECTURER IN VARIOUS COLLEGES. FROM 1996 TO 2005, HE WAS THE HEAD OF MARATHI DEPARTMENT OF PUNE UNIVERSITY. DURING THE PERIOD FROM 2005 TO 2010, HE DR. BABASAHEB AMBEDKAR HELD THE RESPONSIBILITY OF VICE-CHANCELLOR OF MARATHWADA UNIVERSITY. HE IS THE PRESIDENT OF THE 86TH AKHIL BHARATIYA MARATHI SAHITYA SAMMELAN, APART FROM THIS HE HAS HELD THE POST OF PRESIDENT OF VARIOUS SAHITYA SAMMELANS.

कोतापल्ले यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झाला. १९७१मध्ये पीएच.डी. मिळवल्यानंतर त्यांनी विविध महाविद्यालयांतून व्याख्याता म्हणून काम केले. १९९६ ते २००५या कालावधीत ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख होते. २००५ ते २०१० या कालावधीत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची जबाबदारी संभाळली. ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष असून, याशिवाय त्यांनी विविध साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषवले आहे. कविता, कथा, कादंबNया, समीक्षा, चरित्रे, संपादने व भाषांतरे अशी सर्वस्पर्शी विपुल साहित्यर्नििमती त्यांनी केली आहे. त्यांच्या काही कथासंग्रहांची िंहदी, उर्दू व इंग्रजी अशा भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. साहित्यसंस्था व महाविद्यालये येथे त्यांनी मराठी साहित्यावर व्याख्याने दिली आहेत. त्यांनी विविध समित्यांचे सभासद आणि अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SHETAKARYACHA ASUD Rating Star
Add To Cart INR 160

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more