ELIE WIESEL

About Author

Birth Date : 30/09/1928
Death Date : 02/07/2016


ELIE WIESEL WAS BORN IN ROMANIA IN 1928. HE AND HIS FAMILY WERE DEPORTED TO AUSCHWITZ WHEN HE WAS VERY YOUNG. LATER IN THE PRISON OF BUSHENWALD. HIS PARENTS AND YOUNGER SISTER DIED IN THE PERSECUTION THERE. ELIE WIESEL MOVED TO PARIS AFTER WORLD WAR II. THERE HE WROTE THE BOOK KNIGHT. THIS BOOK CONTAINS HIS SHOCKING MEMORIES.

एली वायझेल यांचा जन्म १९२८ मध्ये रुमानियात झाला. अगदी लहान असतानाच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला ऑशवित्झ इथे हद्दपार करण्यात आले. नंतर बुशेनवाल्डच्या तुरुंगात. तिथल्या छळामध्ये त्यांचे आई-वडील आणि लहान बहीण यांचा मृत्यू ओढवला. महायुद्ध संपल्यावर एली वायझेल पॅरिसला गेले. तिथे त्यांनी नाइट हे पुस्तक लिहिले. या पुस्तकामध्ये त्यांच्या हेलावून टाकणाऱ्या आठवणी आहेत. एली वायझेल हे बोस्टन विद्यापीठामध्ये ह्युमॅनिटीज या विषयाचे प्रोफेसर आहेत आणि यू. एस. होलोकॉस्ट मेमोरियल कौन्सलचे अध्यक्ष आहेत. अ बेगर इन जेरुसलेम आणि सोल्स ऑन फायर या दोन पुस्तकांनी त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली. प्रत्येक सहृदय, संवेदनशील माणसाने अवश्य वाचावीत, अशी ही पुस्तके आहेत. कला आणि प्रतिभा यांचा उत्कृष्ट मिलाफ या पुस्तकांमध्ये आढळतो. डॉन, द अक्सिडेंट, द टाउन बियाँड द वॉल, लीजन्डस ऑफ अवर टाइम, द ओथ, द मॅडनेस ऑफ गॉड, अ ज्यू टुडे ही तसेच इतर आणखी काही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. १९८६ मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. नोबेल पारितोषिक समितीने एली वायझेल यांच्याबद्दल म्हटलं आहे : ज्या वेळी वंशवाद, हिंसाचार, दडपशाही यांनी जगाचा ताबा घेतला होता, त्या वेळी मानवतेला आध्यााQत्मक शक्तीच्या बळावर मार्गदर्शन करणाNया नेत्यांपैकी ते एक आहेत. अमर्याद मानवताप्रेम हेच न्याय आणि शांततेसाठी चिरकाल टिकणारे मूल्य आहे याचा त्यांनी जगापुढे वारंवार उच्चार केला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
NIGHT Rating Star
Add To Cart INR 170

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more