JASWANT SINGH

About Author

Birth Date : 03/01/1938


JASWANT SINGH WAS BORN IN A RAJPUT FAMILY IN JAISAL, A VILLAGE IN RAJASTHAN. HIS POLITICAL CAREER BEGAN IN 1980 AS A MEMBER OF THE RAJYA SABHA FROM THE BHARATIYA JANATA PARTY. HE HELD THE POSTS OF EXTERNAL AFFAIRS MINISTER, FINANCE MINISTER IN THE BJP-LED NATIONAL DEMOCRATIC ALLIANCE GOVERNMENT. HIS NAME IS RESPECTED IN THE POLITICAL SPHERE AND PUBLIC LIFE AS WELL. HIS FAVORITE SPORTS ARE CHESS, GOLF AND POLO.

राजस्थानातील जेसल या गावी एका राजपूत कुटुंबात जसवंत सिंग यांचा जन्म झाला. त्यांची राजकीय कारकिर्द १९८०मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे राज्यसभा सदस्य म्हणून सुरू झाली. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारात त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री, अर्थमंत्री ही पदे निभावली. राजकीय क्षेत्र आणि सार्वजनिक जीवनातही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. बुद्धिबळ, गोल्फ आणि पोलो हे त्यांच्या आवडीचे खेळ आहेत. राजस्थानातील प्राचीन डिंगल या भाषेच्या उत्थानासाठी ते प्रत्यत्नशील आहेत. राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रांतील जीवनप्रवासात आलेल्या अनुभवांवर आधारित त्यांनी ए कॉल टू ऑनर हे पुस्तक लिहिले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
A CALL TO HONOUR Rating Star
Add To Cart INR 450
JINNAH : INDIA– PARTITION–INDEPENDENCE Rating Star
Add To Cart INR 500

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more