JONATHAN CARROLL

About Author

Birth Date : 26/01/1949


CARROLL IS BEST KNOWN AS A WRITER OF MODERN FANTASY, MAGICAL, REALISTIC LITERATURE. HE GOT THE GIFT OF WRITING FROM HIS CHILDHOOD. HIS FATHER WORKED IN THE FIELD OF FILM WRITING, WHILE HIS MOTHER WAS A LYRICIST AND ACTRESS. SO HE GOT ENCOURAGEMENT FOR WRITING FROM HOME. HIS FIRST NOVEL LAND OF LAUGHS WAS PUBLISHED IN 1980.

आधुनिक फॅटसी, जादुई, वास्तववादी साहित्यर्निमिती करणारे लेखक म्हणून कॅरोल प्रसिद्ध आहेत. लहानपणापासूनच त्यांना घरातून लेखनाचे बाळकडू मिळाले. त्यांचे वडील चित्रपटलेखन क्षेत्रात कार्यरत होते, तर आई गीतकार आणि अभिनेत्री होती. त्यामुळे घरातूनच त्यांना लेखनासाठी प्रोत्साहन मिळाले. १९८० साली त्यांची लँड ऑफ लाफ्स ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. वाचक तसेच समीक्षकांनी या कादंबरीला उत्तम प्रतिसाद दिला. त्यानंतर व्हॉइस ऑफ शॅडो , व्हाइट अ‍ॅपल्स यांसारख्या कादंबऱ्या, तसेच कथा अशी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. कल्पना, अद्भुत आणि वास्तव यांची सरमिसळ हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. त्यांना वर्ल्ड फॅटसी अ‍ॅवॉर्ड , ब्रिटिश पँÂटसी अ‍ॅवॉर्ड , पुशकार्ट अ‍ॅवॉर्ड आणि ब्रॅम स्टोकर अ‍ॅवॉर्ड यांसारख्या महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
THE GHOST IN LOVE Rating Star
Add To Cart INR 400
TBC Classic Book

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more