KIRTI PARCHURE

About Author


KIRTI PARCHURE HAS BEEN WORKING IN THE FIELD OF JOURNALISM FOR THE PAST TEN YEARS. CURRENTLY SHE WORKS AS A FREELANCE JOURNALIST FOR VARIOUS FAMOUS NEWSPAPERS. SHE REGULARLY WRITES IN LEADING NEWSPAPERS LIKE MAHARASHTRA TIMES. APART FROM THAT, HE HAS ALSO WORKED FOR THE FAMOUS NEWS GROUP SAKAL. HAVING WORKED FOR THE NEWS CHANNEL ABP MAJA, HE ALSO HAS EXTENSIVE EXPERIENCE IN ELECTRONIC MEDIA.

कीर्ती परचुरे या पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत आहेत. सध्या त्या मुक्त पत्रकार म्हणून वेगवेगळ्या प्रसिद्ध वृत्तपत्रांसाठी काम करतात. ‘महाराष्ट्र टाइम्स’सारख्या आघाडीच्या वृत्तपत्रात त्या सातत्याने लेखन करतात. त्याशिवाय ‘सकाळ’ या प्रख्यात वृत्तसमूहासाठीही त्यांनी काम केले आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीसाठी काम केल्याने इलेक्ट्रॉनिक माध्यमांचाही त्यांना पुरेपूर अनुभव आहे. सांस्कृतिक वा ललित लेखन हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. वाचकाला आपलेसे करणारी भाषाशैली हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. ‘भन्नाट माणसे’ या मुलांसाठी चालवलेल्या आगळ्यावेगळ्या चरित्रमालिकेतील ‘अमिलिया एयरहार्ट’, ‘श्रीनिवास रामानुजन’, ‘थॉमस अल्वा एडिसन’ व ‘मार्टिन ल्युथर किंग’ या तीन चरित्रांचे लेखन त्यांनी केले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
I HAVE A DREAM Rating Star
Add To Cart INR 395

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more