KONDAPALLI KOTESWARAMMA

About Author

Birth Date : 05/08/1918
Death Date : 19/09/2018


SHE WORKED ACTIVELY FOR THE COMMUNIST PARTY OF INDIA ALONG WITH HER HUSBAND AND THE LIKES OF PUCHAPALLI SUNDARAIAH. SHE CONTRIBUTED ACTIVELY TO THE TELANGANA REBELLION. SHE WORKED FOR THE PARTY FOR FEW YEARS STAYING UNDERGROUND (IN BANDAR, ELURU, PURI, RAICHUR), AWAY FROM HER FAMILY AND CHILDREN. SHORTLY AFTER THE REBELLION, THE COMMUNIST PARTY DIVIDED INTO TWO. HER HUSBAND DESERTED HER AND SHE WAS LEFT TO FEND FOR HERSELF AND HER CHILDREN. AT THE AGE OF 35, SHE CAME TO HYDERABAD TO STUDY MATRICULATION. SHE SUSTAINED DURING THOSE YEARS THROUGH THE LITTLE MONEY EARNED FROM WRITING STORIES AND PERFORMING FOR THE RADIO. EVEN WHILE SUSTAINING WITH SUCH MEAGRE EARNINGS, SHE USED TO SEND TEN RUPEES EACH TO THE PARTY (CPI AND CPI(M)) FUNDS EVERY MONTH. AFTER COMPLETING HER MATRICULATION, SHE JOINED POLYTECHNIC COLLEGE IN KAKINADA AS A MATRON. SHE STARTED PARTICIPATING IN THE LITERARY EVENTS IN KAKINADA. LATER, SHE WORKED IN VARIOUS COLLEGES ACROSS THE STATE. SHE HAD A DAUGHTER KARUNA AND A SON CHANDRASEKHAR. KARUNA WAS A DOCTOR AND CHANDRASEKHAR STUDIED AT REGIONAL ENGINEERING COLLEGE, WARANGAL. BOTH OF THEM DIED UNDER UNFORESEEN CIRCUMSTANCES. DURING THESE YEARS, HER HUSBAND ESTABLISHED THE PEOPLES WAR PARTY IN INDIA AND WORKED ACTIVELY TOWARDS IT. BUT HE GOT OUSTED LATER ON FROM HIS OWN PARTY AND WAS JAILED. HE SUFFERED MENTAL ILLNESS AND DIED AT THE AGE OF 87 IN HIS GRANDDAUGHTERS (DAUGHTER OF KARUNA) PLACE. KOTESWARAMMA LIVED IN VIJAYAWADA FOR FEW YEARS AND LATER ON MOVED TO CHANDRA RAJEWSARA RAO OLD AGE HOME IN HYDERABAD.

कोंडापल्ली कोटेश्वराम्मा ह्या आंध्रप्रदेशातील माओवादी चळवळीचे दिवंगत प्रणेते श्री. सीतारामय्या कोंडापल्ली यांच्या पत्नी म्हणून सुपरिचित आहेत. त्यांनी स्वत: राजकीय कार्यकत्र्या म्हणून बरीच वर्षे काम केलेले आहे. त्यांनी लिहिलेल्या तेलुगू कथा आणि कवितासंग्रह देखील प्रकाशित झाले आहेत. जवळपास शंभर वर्षांचे आयुष्य लाभलेल्या कोटेश्वराम्मांनी वयाच्या ९२व्या वर्षी निर्जन वारधी या नावाने आपले आत्मवृत्त लिहिले. २०१२ मध्ये हे आत्मवृत्त प्रकाशित झाले आणि २०१८ मध्ये कोटेश्वराम्मांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांची जीवनकहाणी म्हणजे आंध्र प्रदेशातील महत्त्वाच्या सामाजिक, राजकीय चळवळीतील भेदक अनुभवांची गाथाच आहे. स्वातंत्र्य आंदोलन, कम्युनिस्ट आंदोलन, तेलंगणाचा सशस्त्र लढा, नक्षलबारी या सर्वांचा यात समावेश आहे. त्यांच्या या अनुभवांना एक बाल विधवा, देशातील सर्वांत जहाल कम्युनिस्ट आंदोलनातील कार्यकर्ती, सर्वांत प्रभावी नेत्याची पत्नी, एक स्वतंत्र विचारसरणीची प्रतिभावान स्त्री आणि याशिवाय एक आई, आज्जी असे अनेक पदर आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
NIRJAN POOL Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more