MANJUSHRII GOKHALE

About Author

Birth Date : 21/11/1957


इचलकरंजीतील द मॉडर्न हायस्कुलमध्ये सहायक शिक्षिका म्हणून, तर कोल्हापूरमधील महाराष्ट्र हायस्कुल अ‍ॅन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापिका म्हणून कार्यभार सांभाळला आहे. कादंबऱ्या, कथासंग्रह, कवितासंग्रह, पाकशास्त्र, प्रवसावर्णन वगैरे वेगवेगळ्या साहित्यप्रकारात त्यांनी लेखन केले आहे. त्यांची २५ पुस्तके प्रकाशित आहेत. शिशिरसांज, रानगंध या नावाने त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. फुलपाखरांचा गाव आणि आकृतीगंध ही दोन चारोळ्यांची पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. स्वस्तिकाची फुले, हास्यमेव जयते, बुफे आणि फेफ आणि ओंजळीतले मोती या कथासंग्रहांचे त्यांनी लेखन केले आहे. अंधाराच्या सावल्या, अग्निलाघव या रहस्यकथासंग्रहाबरोबरच रंगपश्चिमा हे प्रवासवर्णनही प्रसिद्ध झाले आहे. फास्ट-ब्रेकफास्ट नावाचे पाककृतींवर आधारित पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. अमृतसंदेश माहात्म्य या आध्यात्मिक पुस्तकाच्या लिखाणाव्यतिरिक्त त्यांनी सासूची माया या मराठी चित्रपटासाठी कथा-पटकथा व संवादलेखनही केले आहे. अरुण दाते यांचा शुक्रतारा आणि शब्दसुरांच्या झुल्यावर या कार्यक्रमांमध्ये त्यांनी निवेदन केले आहे. तुकयाची आवली या कादंबरीला २००८मध्ये तुका म्हणे पुरस्कार आणि भारताच्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील वाचनवेध पुरस्कार जोहार मायबाप जोहार या पुस्तकाला खामगाव येथील कै. वरणगावकर स्मृतिपुरस्कार २०१२, संत गाडगेमहाराज अध्यासन पुरस्कार २०१४, तसेच ज्ञानसुर्याची सावली या कादंबरीला अश्वमेध ग्रंथालय आयोजित अक्षरगौरव पुरस्कार २०१४, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे किर्तन संजीवनी पुष्पलता रानडे पारितोषिक २०१६ मिळाले आहे.

Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
SAMARPAN Rating Star
Add To Cart INR 295

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more