MILIND JOSHI

About Author

Birth Date : 31/05/1962


MILIND JOSHI WAS BORN IN PUNE AND COMPLETED HIS EDUCATION IN PUNE. HE HAS WON PRIZES IN VARIOUS STUNT AND ONE ACT COMPETITIONS WHILE IN COLLEGE. NOW HE LIVES IN MUMBAI DUE TO HIS JOB. APART FROM WRITING, HE ENJOYS PHOTOGRAPHY AND HAS HIS OWN COLLECTION OF NATURE PHOTOGRAPHS. THIS IS THE THIRD BOOK OF MILIND JOSHI. HIS TWO BOOKS HAVE BEEN PUBLISHED EARLIER TITLED AS KARPURTA CHA TEHELKA AND SHAHEED.

मिलिंद जोशींचा जन्म पुण्यातला आणि त्यांचं सारं शिक्षणही पुण्यातच झालंय. कॉलेजात असताना वेगवेगळ्या वकृत्व आणि एकांकिका स्पर्धांमधून त्यांनी बक्षिसं पटकावली आहेत. नोकरीनिमित्त आता ते मुंबईत राहतात. लिखाणाशिवाय फोटोग्राफीचा त्यांना छंद आहे आणि त्यांचा स्वत:चा निसर्ग छायाचित्रांचा संग्रहही आहे. मिलिंद जोशींचं हे तिसरं पुस्तक. भ्रष्टाचाराचा तेहेलका आणि शहीद अशा नावांची त्यांची दोन पुस्तकं यापूर्वी प्रकाशित झालेली आहेत. या शिवाय लोकप्रभासारख्या नियतकालिकांमधून त्यांचे लेख आणि लघुकथा वेळोवेळी प्रकाशित झाल्या आहेत. ए एम आय इंडिया लॉजिस्टीक्स या आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि लॉजिस्टीक्स कंपनीचे ते चीफ ऑपरेटींग ऑफिसर (सी ओ ओ) म्हणून काम करतात. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि शिपिंग या विषयांतला त्यांचा व्यासंग दांडगा आहे आणि त्या विषयांवरचं त्यांचं लिखाण त्या व्यवसायाला वाहिलेल्या नियतकालिकांमधून अधून-मधून प्रकाशित होत असतं.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
EKA PARISACHI KATHA Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more