MRINALINI SAWANT

About Author

Birth Date : 18/05/1944


SMT. MRINALINI SHIVAJIRAO SAWANT IS THE WIFE OF MURTIDEVI AWARD WINNING AUTHOR, MRITYUNJAYKAR SHIVAJI SAWANT. SHE WAS BORN ON 18 MAY 1944. SHE INHERITED HER WRITING FROM HOME AS SHE HAD A PASSION FOR READING. SHE HAS DONE HER MASTERS IN ARTS IN HINDI FROM PUNE UNIVERSITY. AFTER THAT SHE TURNED TO WRITING. SHE ALSO CONSIDERED THE SUBJECT OF TRANSLATION AS CLOSER. SHE WAS THE FIRST TO TRANSLATE THE PLAY `MRITYUNJAYA` AND THE NOVEL `YUGANDHAR`. SHE HAS ALSO TRANSLATED `PURUSHOTTAMAYANA` INTO HINDI. THE HINDI TRANSLATION OF SHANTILAL BHANDARI`S BOOK `SARVODAYA TIRTHA` HAS ALSO BEEN DONE BY MRINALINI SAWANT.

श्रीमती मृणालिनी शिवाजीराव सावंत या मूर्तिदेवी पुरस्कार विजेते लेखक, ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांच्या पत्नी असून त्यांचा जन्म १८ मे १९४४ रोजी झाला. वाचनाचा वसा घरातूनच असल्यामुळे लेखनाचा वारसा त्यांना तिथूनच मिळाला. पुणे विद्यापीठातून हिंदी विषयात एम. ए. केल्यानंतर त्या लिखाणाकडे वळल्या. त्यातही अनुवाद हा विषय त्यांनी अधिक जवळचा मानला. ‘मृत्युंजय’ हे नाटक आणि ‘युगंधर’ या कादंबरीचा अनुवाद त्यांनी सर्वप्रथम केला. तसेच ‘पुरुषोत्तमनामा’ या चरित-कहाणीचा ‘पुरुषोत्तमायन’ हा हिंदी अनुवाददेखील केला आहे. श्री. शांतीलाल भंडारी यांच्या भगवान महावीरावरील ‘सर्वोदय तीर्थ’ या पुस्तकाचा हिंदी अनुवाद देखील मृणालिनी सावंत यांच्या नावावर आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
UTTUNG Rating Star
Add To Cart INR 790

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more