RAJMOHAN GANDHI

About Author

Birth Date : 07/08/1935




‘सेंटर फॉर साउथ एशियन अँड मिडल ईस्टर्न स्टडीज’, इलिनॉइझ युनिव्र्हिसटी, अर्बना-शॅम्पेन, यूएसए येथे रिसर्च प्रोपेÂसर म्हणून राजमोहन गांधी कार्यरत आहेत. ते १९९७ सालापासून इलिनॉइझ विद्यापीठात राज्यशास्त्र आणि इतिहास या विषयाचे अध्यापन करत आहेत. सन १९९०-९२ या काळात ते राज्यसभेचे सभासद होते. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सर्वपक्षीय कमिटीसमोर अनुसूचित जाती-जमाती यांची स्थिती मांडण्याचे काम त्यांनी केले आहे. १९५६ सालापासून ते ‘इनिशिएटिव ऑफ चेंज’ या संस्थेशी संलग्न असून गेल्या अर्ध शतकाहून अधिक काळ ते लोकशाहीकरणासाठी, भ्रष्टाचार व विषमता यांविरुद्ध लढा देण्याच्या कार्यात सक्रिय आहेत. त्यांना भारत तसेच भारताबाहेरील विविध संस्थांकडून भाषणे देण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आमंत्रित करण्यात येते. आणीबाणीच्या काळात त्यांनी लोकशाही हक्कांसाठी लढा देण्याच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला. काही काळ त्यांनी मुंबईतून ‘हिम्मत’ नावाचे साप्ताहिकही चालवले. ९/११ नंतर पाश्चिमात्य राष्ट्र आणि इस्लामी देश यांच्यातील संबंध सुधारण्याच्या कार्यात त्यांचे विशेष योगदान आहे. त्यांची सखोल संशोधनात्मक लेखन केलेली पुस्तके प्रकाशित असून त्यांना साहित्य अकादमीसारख्या महत्त्वाच्या पुरस्कारांनी व मानसन्मानांनी गौरवण्यात आले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
MOHANDAS Rating Star
Add To Cart INR 995

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more