RAVINDRA BAGDE

About Author

Birth Date : 14/04/1947


BAGDE WAS BORN IN ARDGAON NEAR LONAND IN SATARA DISTRICT IN A TANNERY COMMUNITY. HE STUDIED UP TO INTER IN MUMBAI. BUT DUE TO EXTREME POVERTY AT HOME, HE HAD TO MAKE A LIVING BY DOING BOOT POLISH AND SELLING VEGETABLES ON THE STREET. POSSESSING A SENSITIVE MIND, BAGDE CONTEMPLATED AND MEDITATED ON LIVING MINDFULLY. IT IS FROM THIS THAT HE WROTE TWO AUTOBIOGRAPHICAL NOVELS GATULAM AND BOCHKAM.

बागडे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील लोणंदजवळील आरडगाव येथे चर्मकार समाजात झाला. मुंबईत त्यांचे इंटरपर्यंत शिक्षण झाले. परंतु घरातल्या प्रचंड दारिद्र्यामुळे त्यांना बूटपॉलिश व रस्त्यावर भाजी-विक्रीचा धंदा करून गुजराण करावी लागली. संवेदनशील मन लाभलेल्या बागडे यांनी सजगपणे जगण्याचे चिंतन व मनन केले. यातूनच त्यांनी गटुळं आणि बोचकं या दोन आत्मकथनात्मक कादंबऱ्या लिहिल्या. या कादंबऱ्या भारतीय समाजव्यवस्थेतल्या दीनदलित समाजाचे प्रश्न थेट मांडतात. त्यांचे जीवन चितारतात; अंतर्मुख करतात. मराठीत दीनदलितांनी लिहिलेल्या साहित्यामध्ये या कादंबऱ्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. लहानपणापासून लेखनाची व समाजकार्याची आवड असलेल्या बागडे यांनी मुंबईत झोपडपट्टीवासीयांकरिता, विशेषत: धारावी, अंधेरी, बोरिवली येथे नागरी सुधारणेचे व समाज प्रबोधनाचे कार्य केले. त्यांची इतरही पुस्तके प्रकाशित असून वृत्तपत्रांमधूनही त्यांनी लेखन केले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
BOCHAKA Rating Star
Add To Cart INR 160
GATULA Rating Star
Add To Cart INR 160

Shop by

Category Price
      
Latest Edition Year
Author

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more