REKHA BAIJAL

About Author

Birth Date : 06/07/1952


REKHA BAIJAL IS A RENOWNED WRITER. SO FAR, HE HAS SUCCESSFULLY HANDLED MANY TYPES OF LITERATURE LIKE NOVELS, ANTHOLOGIES, PLAYS, ONE-ACT PLAYS, FINE ARTS. HE HAS DONE STORYTELLING PROGRAMS ON DOORDARSHAN, E TV, ALPHA TV. MARATHWADA UNIVERSITY B.A. AND M.A. HIS STORIES AND POEMS ARE INCLUDED IN THE SYLLABUS. CONCLUDED AT PARBHANI HE HAS CHAIRED THE 2ND MARATHWADA LEKHIKA SAMMELAN.

रेखा बैजल एक प्रथितयश लेखिका आहेत. आतापर्यंत कादंबरी, कथासंग्रह, नाटके, एकांकिका, ललित असे अनेक साहित्यप्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले आहेत. दूरदर्शन, ई टीव्ही, अल्फा टीव्ही या वाहिन्यांवर त्यांचे कथाकथनाचे कार्यक्रम झाले आहेत. मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए. आणि एम.ए. अभ्यासक्रमात त्यांच्या कथा व कविता समाविष्ट झाल्या आहेत. परभणी येथे संपन्न झालेल्या दुसरे मराठवाडा लेखिका संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या साहित्यावर प्रा. दादासाहेब गिऱ्हे यांनी पीएच. डी. मिळविली आहे. रेखा बैजल यांनी काटा रुते कुणाला या चित्रपटाचे लेखनही केले आहे. आकाशवाणीच्या पुणे, औरंगाबाद, परभणी या केंद्रांवरून त्यांच्या कथा, कवितांचे सातत्याने प्रसारण होत असते. त्यांच्या साहित्यकृतींचे हिंदी, उर्दू, कन्नड, तेलुगु, इंग्रजी या भाषांत अनुवाद झाले आहेत. रेखा बैजल यांना समग्र लिखाणासाठी अनंत काणेकर पुरस्कार , पुणे मराठी ग्रंथालय पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय, त्यांच्या लेखनाला बा.सी. मर्ढेकर पुरस्कार , नाथमाधव पुरस्कार (गोवा) , महाराष्ट्र राज्य शासनाचे सहा पुरस्कार असे एकुण पंचवीस पुरस्कार मिळाले आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
ADNEYA Rating Star
Add To Cart INR 120
PRASTHAN Rating Star
Add To Cart INR 220

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ. पद्मा घरोटे, बंगळुरू.

पुस्तकाचे शीर्षक एकदम छान. `करतो गप्पा`, `मारतो गप्पा` सुद्धा चाललं असतं पण `छाटितो गप्पा` एकदम चपखल . साधी सोपी सरळ मराठी/वर्हाडी भाषा मनाला भावली आणि भूतकाळात घेऊन गेली. लेखकाच्या अनगळ बाईंना वाचून मला माझे नववीतले ईंग्रजी शिकवणारे बडवे मास्र आठवले जे आम्हाला डस्टरनी डोक्यावर मारायचे. `गव्हातले खडे` कथेतील मराठी चौथ्या वर्गातला श्रावण बाळ डोळे ओले करुन गेला. जोशी साहेबांची खाला १९८५ मधिल चन्द्रपूरची आठवण करवून गेली. जून्या पूस्तकात ठेवलेल्या मोरपिसा सारख्या आठवणी बाहेर आल्या आणि पुन्हा पुस्तकात गेल्या. प्रत्येक माणसाच्या जीवनात अनेक बरे वाईट लोक येतात, पण त्यांना असं पुस्तकात रेखाटणं प्रत्येकालाच जमत नाही ते आवघड काम लेखकानं केलं, म्हणून लेखकाचं खूप खूप अभिनंदन आणि असंच छान छान लिहित राहण्याकरीता शुभेच्छा. ...Read more

TEEN DAGADACHI CHUL
TEEN DAGADACHI CHUL by VIMAL MORE Rating Star
Dnyaneshwar Babruvahan Gund

अतिशय वास्तववादी, संवेदनशील आणि परिवर्तनाची आस धरून केलेले लेखन..... प्रेरणादायी आत्मकथन....