REKHA BAIJAL

About Author

Birth Date : 06/07/1952


REKHA BAIJAL IS A RENOWNED WRITER. SO FAR, HE HAS SUCCESSFULLY HANDLED MANY TYPES OF LITERATURE LIKE NOVELS, ANTHOLOGIES, PLAYS, ONE-ACT PLAYS, FINE ARTS. HE HAS DONE STORYTELLING PROGRAMS ON DOORDARSHAN, E TV, ALPHA TV. MARATHWADA UNIVERSITY B.A. AND M.A. HIS STORIES AND POEMS ARE INCLUDED IN THE SYLLABUS. CONCLUDED AT PARBHANI HE HAS CHAIRED THE 2ND MARATHWADA LEKHIKA SAMMELAN.

रेखा बैजल एक प्रथितयश लेखिका आहेत. आतापर्यंत कादंबरी, कथासंग्रह, नाटके, एकांकिका, ललित असे अनेक साहित्यप्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले आहेत. दूरदर्शन, ई टीव्ही, अल्फा टीव्ही या वाहिन्यांवर त्यांचे कथाकथनाचे कार्यक्रम झाले आहेत. मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए. आणि एम.ए. अभ्यासक्रमात त्यांच्या कथा व कविता समाविष्ट झाल्या आहेत. परभणी येथे संपन्न झालेल्या दुसरे मराठवाडा लेखिका संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या साहित्यावर प्रा. दादासाहेब गिऱ्हे यांनी पीएच. डी. मिळविली आहे. रेखा बैजल यांनी काटा रुते कुणाला या चित्रपटाचे लेखनही केले आहे. आकाशवाणीच्या पुणे, औरंगाबाद, परभणी या केंद्रांवरून त्यांच्या कथा, कवितांचे सातत्याने प्रसारण होत असते. त्यांच्या साहित्यकृतींचे हिंदी, उर्दू, कन्नड, तेलुगु, इंग्रजी या भाषांत अनुवाद झाले आहेत. रेखा बैजल यांना समग्र लिखाणासाठी अनंत काणेकर पुरस्कार , पुणे मराठी ग्रंथालय पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय, त्यांच्या लेखनाला बा.सी. मर्ढेकर पुरस्कार , नाथमाधव पुरस्कार (गोवा) , महाराष्ट्र राज्य शासनाचे सहा पुरस्कार असे एकुण पंचवीस पुरस्कार मिळाले आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
ADNEYA Rating Star
Add To Cart INR 120
PRASTHAN Rating Star
Add To Cart INR 220

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more