S. S. DESAI

About Author

Birth Date : 25/07/1917
Death Date : 31/05/1996


S. S. DESAI WAS BORN IN THE VILLAGE BALLI,(GOA). HE COMPLETED HIS PRIMARY EDUCATION IN BALLI & HIGHER EDUCATION DONE IN PORTUGUESE IN MARGOA AND PANJI. HE READ SEVERAL BOOKS IN MARATHI, POTUGUESE, FRENCH & ENGLISH. IN 1944 HE WENT TO PUNE TO BECOME A JOURNALIST HE WORK AS A SUB EDITOR FOR VARIOUS MARATHI DAILYS NAMELY; THE LOKSHAKTI, THE SAMACHAR, PRABHAT, THE SANYUKTIK MAHARASHTRA. HE LEFT JOURNALISM IN THE YEAR 1946 AND JOINED HANDS WITH `BHARATIYA SANSKRUTI KOSH’ COMMITE WHICH WAS RUN BY MAHADEVSHASTRI JOSHI, WHERE HE WORKED AS AN ASSISTANT. THEN HE WAS APPOINTED BY THE COMMITEE AS THE RESEARCH ASSISTANT. HE WAS THEN PROMOTED TO THE POST OF A FULL TIME RESEARCHER BY THE SAME COMMITTEE.

प्रा. स.शं. देसाई यांचा जन्म बाळ्ळी येथे झाला. शिक्षण मराठीतून. प्राथमिक शिक्षण बाळ्ळी व पाळोळे, लिसेव (पोर्तुगीज) मडगांव व पणजी येथे. लहानपणापासून वाचनाची आवड. जडणघडणीच्या काळात मराठी, पोर्तुगीज, फ्रेंच व इंग्रजी साहित्याचे भरपूर वाचन केले. १९४० साली पहिली कथा आयुष्याचा वसंत कला मासिकात प्रसिद्ध झाली. १९४४ साली पत्रकार होण्यासाठी पुण्याला प्रयाण. तेथे दै. लोकशक्ती, दै. समाचार, प्रभात, संयुक्त महाराष्ट्र इ. दैनिकात उपसंपादक म्हणून काम केले. १९५७ मध्ये पत्रकारिता सोडून पं. महादेवशास्त्रींच्या ‘भारतीय संस्कृती कोश’ मंडळात साहाय्यक म्हणून नेमणूक झाली. पुढे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या भारतीय संस्कृती कोश मंडळात संशोधक साहाय्यक म्हणून नेमणूक झाली. पुढे पदोन्नती मिळून विश्वकोशात संशोधक म्हणून काम पाहिले. १९६४ च्या डिसेंबर महिन्यात शिवाजी विद्यापीठात इतिहास विभागात संशोधक सहकारी म्हणून निवड झाली. पुढे तिथेच संशोधक संचालक म्हणून पदोन्नती मिळाली. १९५२ साली प्रसिद्ध झालेल्या इभ्रत कादंबरीमुळे साहित्यक्षेत्रात नावलौकिक मिळाला. त्याच कादंबरीवर कुलदैवत हा चित्रपट निघाला. अब्बासअली, आहुती, चंबळेच्या पलीकडे, महापर्व, अखेरची लढाई या सामाजिक ऐतिहासिक कादंबऱ्यांमुळे प्रसिद्धी मिळाली. साहित्याचा व्यासंग व इतिहासाचा सखोल, वास्तव अभ्यास या गुणांमुळे पेशवेकालीन पत्रव्यवहाराचे संकलन पोर्तुगीज इतिहासाच्या साधनाचे मराठीत भाषांतर ही बहुमोल कामगिरी संपूर्ण जीवन इतिहासाचा व साहित्याचा व्यासंग याला वाहिले. प्रसिद्धीचा थोडाही हव्यास न बाळगता तर्कशुद्ध वास्तव लेखनाचे व्रत आयुष्याच्या अंतापर्यंत चालविले.
Sort by
Show per page
Items 1 to 5 of 5 total
AKHERCHI LADHAI Rating Star
Add To Cart INR 240
CHAMBALECHYA PALIKADE Rating Star
Add To Cart INR 720
DUSARE JAGTIK MAHAYUDDHA Rating Star
Add To Cart INR 200
MAHAPARVA Rating Star
Add To Cart INR 450
PAHILE JAGTIK MAHAYUDDHA Rating Star
Add To Cart INR 180

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more