SARAT CHANDRA CHATTOPADHYAY

About Author

Birth Date : 15/09/1900
Death Date : 17/01/1938


SHARACHCHANDRA SPENT HIS CHILDHOOD IN DEVANANDPUR, WEST BENGAL. THEN IN 1886, HE MOVED TO PRESENT-DAY BHAGALPUR. HENCE HIS SCHOOLING WAS DONE IN DEVANANDPUR AND BHAGALPUR. DESPITE BEING AN INTELLIGENT STUDENT, HE COULD NOT COMPLETE HIS COLLEGE EDUCATION DUE TO CIRCUMSTANCES. HE WAS ATTRACTED TO LITERATURE FROM HIS TEENAGE LIFE.

शरच्चंद्र यांचे बालपण पश्चिम बंगालमधील देवानंदपूर येथे गेले. त्यानंतर १८८६मध्ये, ते आजोळी भागलपूर येथे राहायला गेले. त्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण देवानंदपूर आणि भागलपूर येथे झाले. बुद्धिमान विद्यार्थी असूनही त्यांना परिस्थितीमुळे महाविद्यालयीन शिक्षण पुरे करता येऊ शकले नाही. किशोर जीवनापासूनच त्यांचा साहित्याकडे ओढा होता. १९०१मध्ये संन्यासी म्हणून त्यांनी बऱ्याच ठिकाणी भ्रमण केले. या भ्रमणात त्यांनी बारकाईने समाज जीवनाचे निरीक्षण केले. त्याचेच दर्शन त्यांच्या साहित्यकृतीत आढळते. नशीब अजमावण्यासाठी, १९०३मध्ये ते ब्रह्मदेशात गेले. तेथे त्यांनी रेल्वे व डी.ए.जी. ऑफिसमध्ये नोकरी केल्यानंतर; १९१६मध्ये ते भारतात परतले. यमुना , भारतवर्ष अशा नियतकालिकांतून लेखन करू लागल्यावर त्यांना प्रसिद्धी मिळू लागली. १९२१मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अनेक साहित्यसभांचे आणि संमेलनांचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले, तसेच त्यांना अनेक मानसन्मानही मिळाले. त्यांना कलकत्ता विश्वविद्यालयाने १९२३ साली जकत्त तपरीणी सुवर्णपदक दिले, तर १९३६ साली ढाका विश्वविद्यालयाची डी.लिट. पदवीही मिळाली. बंगाली, तसेच भारतीय साहित्यामध्ये शरच्चंद्र यांनी केलेले काम अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. बंकिमचंद्र, रवींद्रनाथ आणि शरच्चंद्र हे तिघेही बंगाली साहित्याचे आधारस्तंभ मानले जातात. देवदास , श्रीकांत , बडो दीदी , बिराज व बऊ , चरित्रदिप , पथेर दाबी या त्यांच्या काही गाजलेल्या कादंबऱ्या, तर बिंदुर छेले , परिणिता , इशकृती , स्वामी या त्यांच्या कथा अविस्मरणीय ठरल्या. विजया , षोडशि , रमा या नाट्यकृती आणि तरुणेर , विद्रोह , स्वदेश , ओ , साहित्य , नारिर , मूल्य यासारखे लेख त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. शरच्चंद्रांनी तळागाळातील माणूस आणि समाजाने पतित ठरवलेल्या स्त्रिया यांना आपल्या साहित्यात मानाचे स्थान दिले आणि त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडवले. प्रासादिक भाषा आणि अर्थगर्भ संवाद ही त्यांची बलस्थाने मानली जातात. त्यांचे साहित्य स्वानुभवाच्या मुशीतून जन्मलेले असल्यामुळे सजीव वाटते.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
DEVDAS Rating Star
Add To Cart INR 120

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
...गणेश जोशी, पुणे.

मी मूळचा अमरावतीचाच परंतु आता पुण्यास स्थायिक झालॊ आहे. या प्रस्तावनेस कारण की मी नुकतेच जी.बी.देशमुख ह्यांनी शब्दबद्ध केलेला श्री. रवींद्र वानखडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभव कथा `कुलामामाच्या देशात ` हा कथा संग्रह वाचला. खुपच आवडला. त्यातील `माकाय आकांत` ही कथा मनाला चटका लावून जाते.. एकंदरीत सर्वच कथा खूप छान शब्द बद्ध केल्या आहेत. मी स्वतः भारतीय स्टेट बँकेत असतांना जवळपास १० वर्षे परतवाड्यास होतो त्यामुळे मेळघाटशी माझा खूप जवळचा संबंध आला आहे. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शरद जवंजाळ, अमरावती.

मी नुकतंच `छाटितो गप्पा` हे पुस्तक वाचलं. उत्तम लेखन व ओघवती भाषा शैली.