SARAT CHANDRA CHATTOPADHYAY

About Author

Birth Date : 15/09/1900
Death Date : 17/01/1938


SHARACHCHANDRA SPENT HIS CHILDHOOD IN DEVANANDPUR, WEST BENGAL. THEN IN 1886, HE MOVED TO PRESENT-DAY BHAGALPUR. HENCE HIS SCHOOLING WAS DONE IN DEVANANDPUR AND BHAGALPUR. DESPITE BEING AN INTELLIGENT STUDENT, HE COULD NOT COMPLETE HIS COLLEGE EDUCATION DUE TO CIRCUMSTANCES. HE WAS ATTRACTED TO LITERATURE FROM HIS TEENAGE LIFE.

शरच्चंद्र यांचे बालपण पश्चिम बंगालमधील देवानंदपूर येथे गेले. त्यानंतर १८८६मध्ये, ते आजोळी भागलपूर येथे राहायला गेले. त्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण देवानंदपूर आणि भागलपूर येथे झाले. बुद्धिमान विद्यार्थी असूनही त्यांना परिस्थितीमुळे महाविद्यालयीन शिक्षण पुरे करता येऊ शकले नाही. किशोर जीवनापासूनच त्यांचा साहित्याकडे ओढा होता. १९०१मध्ये संन्यासी म्हणून त्यांनी बऱ्याच ठिकाणी भ्रमण केले. या भ्रमणात त्यांनी बारकाईने समाज जीवनाचे निरीक्षण केले. त्याचेच दर्शन त्यांच्या साहित्यकृतीत आढळते. नशीब अजमावण्यासाठी, १९०३मध्ये ते ब्रह्मदेशात गेले. तेथे त्यांनी रेल्वे व डी.ए.जी. ऑफिसमध्ये नोकरी केल्यानंतर; १९१६मध्ये ते भारतात परतले. यमुना , भारतवर्ष अशा नियतकालिकांतून लेखन करू लागल्यावर त्यांना प्रसिद्धी मिळू लागली. १९२१मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अनेक साहित्यसभांचे आणि संमेलनांचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले, तसेच त्यांना अनेक मानसन्मानही मिळाले. त्यांना कलकत्ता विश्वविद्यालयाने १९२३ साली जकत्त तपरीणी सुवर्णपदक दिले, तर १९३६ साली ढाका विश्वविद्यालयाची डी.लिट. पदवीही मिळाली. बंगाली, तसेच भारतीय साहित्यामध्ये शरच्चंद्र यांनी केलेले काम अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. बंकिमचंद्र, रवींद्रनाथ आणि शरच्चंद्र हे तिघेही बंगाली साहित्याचे आधारस्तंभ मानले जातात. देवदास , श्रीकांत , बडो दीदी , बिराज व बऊ , चरित्रदिप , पथेर दाबी या त्यांच्या काही गाजलेल्या कादंबऱ्या, तर बिंदुर छेले , परिणिता , इशकृती , स्वामी या त्यांच्या कथा अविस्मरणीय ठरल्या. विजया , षोडशि , रमा या नाट्यकृती आणि तरुणेर , विद्रोह , स्वदेश , ओ , साहित्य , नारिर , मूल्य यासारखे लेख त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. शरच्चंद्रांनी तळागाळातील माणूस आणि समाजाने पतित ठरवलेल्या स्त्रिया यांना आपल्या साहित्यात मानाचे स्थान दिले आणि त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडवले. प्रासादिक भाषा आणि अर्थगर्भ संवाद ही त्यांची बलस्थाने मानली जातात. त्यांचे साहित्य स्वानुभवाच्या मुशीतून जन्मलेले असल्यामुळे सजीव वाटते.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
DEVDAS Rating Star
Add To Cart INR 120

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more