SUDHA RISBUD

About Author

Birth Date : 25/06/1960


SUDHA RISBUD HAS DONE DEE, AMIE (ELECTRONICS), MIE, P.G. GRADUATED WITH DIPLOMA (JURISPRUDENCE) AND MA (ANCIENT INDIAN HISTORY). RISBUD WORKED AS A TECHNICAL OFFICER IN QUALITY ASSURANCE ENGINEERING IN THE DEPARTMENT OF DEFENSE AND TOOK VOLUNTARY RETIREMENT.

सुधा रिसबुड यांनी डीईई, एएमआयई (इलेक्ट्रॉनिक), एमआयई, पी.जी. डिप्लोमा (न्यायदर्शन) तसेच एमए (प्राचीन भारतीय इतिहास) ही पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. रिसबुड यांनी संरक्षण विभागात तांत्रिक अधिकारी म्हणून क्वॉलिटी अशुअरन्स इंजिनिअरिंगचे काम केले व स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांनी वैज्ञानिक कथा आणि वैज्ञानिक विषयावर २९ वर्षे सातत्याने मराठीतून लेखन केले आहे. आतापर्यंत त्यांची अंतरिक्षाचा वेध (पुणे मराठी ग्रंथालयाचा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार ,२००६), कल्पित-अकल्पित (महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार , २००९), भास्कराचार्य ते गॉस गणिताचा ध्यास (२०११), भारतीय स्त्री : एक मीमांसा (पुणे मराठी ग्रंथालयाचा चेतना पुरस्कार , २०१३) आणि रिचर्ड फाइनमन : एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व (२०१३) अशी पाच पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी शाळांमधून वैज्ञानिक विषयावर व्याख्याने दिली आहेत. तसेच मराठी विज्ञान परिषद व अन्य दिवाळी अंकांतही त्यांनी विज्ञानविषयक लेखन केले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
ANTARIKASHACHA VEDH Rating Star
Add To Cart INR 220
GUARDIAN Rating Star
Add To Cart INR 220
KALPIT -AKALPIT Rating Star
Add To Cart INR 200
RICHARD FEYNMAN : EK HERHUNNERY VYAK... Rating Star
Add To Cart INR 150

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more