SURESH PATIL

About Author

Birth Date : 15/12/1960


HE IS WORKING IN JOURNALISM. HE STARTED HIS CAREER WITH SAMANA DAILY. ALONG WITH PRINT MEDIA, HE ALSO WORKED IN ELECTRONIC MEDIA. HE HAS WORKED IN THE POSTS OF DEPUTY EDITOR, SENIOR ASSOCIATE EDITOR, NEWS EDITOR ETC. MOREOVER, AFTER PASSING THE MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION (MPSC) EXAMINATION, HE WAS ALSO WORKING AS A GAZETTED OFFICER IN THE SERVICE OF MAHARASHTRA GOVERNMENT FOR A FEW YEARS.

हे पत्रकारितेत कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात सामना दैनिकाद्वारे केली. प्रिंट मीडियाबरोबरच इलेक्ट्रॉनिक मीडियामध्येही ते कार्यरत होते. उपसंपादक, वरिष्ठ सहसंपादक, न्यूज एडिटर आदी पदांवर त्यांनी काम केले आहे. शिवाय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा (एमपीएससी) उत्तीर्ण होऊन ते महाराष्ट्र शासनाच्या सेवेत राजपत्रित अधिकारी म्हणूनही काही वर्षे कार्यरत होते. दाह बरोबरच त्यांची नक्षल बारी (कादंबरी), सायबाचा हनिमून (कथासंग्रह), जावयाची मुंडी (कथासंग्रह) ही पुस्तके मेहता पब्लिशिंग हाऊसकडून प्रकाशित होत आहेत. शिवाय पाणजंजाळ ही कादंबरीही प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यांचे अगं, ये ना! हे नाटक मुंबईच्या नाट्यमंदार नाट्य संस्थेने घेतले आहे. सध्या ते चित्र-नाट्य क्षेत्रातही कार्यरत आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
DAAHA Rating Star
Add To Cart INR 795

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more