SURESH VASANT NAIK

About Author

Birth Date : 01/04/1900


EDUCATION: B. SC., LL. B. ASSOCIATE OF KRANTIVEER BHAGATINSAG AND RAJGURU AND RENOWNED LAWYER IN PUNE KAI SON OF VASANTRAO NAIK. STARTED THE LEGAL PROFESSION AND LATER WORKED AS A GOVERNMENT PROSECUTOR. APPOINTMENT AS JUDGE AT VARIOUS PLACES IN MAHARASHTRA. WORKED AS DISTRICT JUDGE AT KOLHAPUR, AKOLA, SANGLI, ALIBAG. SERVED AS PRESIDENT OF MAHARASHTRA INDUSTRIAL TRIBUNAL IN MUMBAI. AFTER RETIREMENT WORKED AS ADVOCATE IN HIGH COURT AND SUPREME COURT.

शिक्षण : बी. एस्सी., एलएल. बी. क्रांतिवीर भगतिंसग व राजगुरू यांचे सहकारी व पुण्यातील नामंवत वकील कै. वसंतराव नाईक यांचे पुत्र. वकिली व्यवसायास प्रारंभ करून नंतर सरकारी वकील म्हणून काम केले. महाराष्ट्रामध्ये न्यायाधीश म्हणून निरनिराळ्या ठिकाणी नियुक्ती. कोल्हापूर, अकोला, सांगली, अलिबाग येथे जिल्हा न्यायाधीश म्हणून काम केले. मुंबईमध्ये महाराष्ट्र औद्योगिक न्यायाधिकरण येथे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. निवृत्तीनंतर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत. आय.एल.एस., सिम्बॉयसिस लॉ कॉलेज व इतर कॉलेजमध्ये कायदा या विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत. इतर कार्य : विश्वकोशाचे अभ्यागत संपादक म्हणून निरीक्षण व स्फुटलेखन. मासिक व वृत्तपत्रांमधून विविध विषयांवर लेखन, प्रवासवर्णनपर लेखन प्रसिद्ध, कृषिवल, केसरी, श्री समर्थ मासिक, साईबोध मासिक इ. ठिकाणी लेखन. तसेच रामदासस्वामी न्यायसंस्थेमध्ये काम केले.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
YA SUKHANNO Rating Star
Add To Cart INR 395

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more