SUSHMITA BANERJEE

About Author

Death Date : 04/09/2013


SUSHMITA BANERJEE, ALSO KNOWN AS SUSHMITA BANDHOPADHYAY AND SAYEDA KAMALA, WAS A WRITER AND ACTIVIST FROM INDIA. HER WORKS INCLUDE THE MEMOIR KABULIWALAR BANGALI BOU BASED ON HER EXPERIENCE OF MARRYING AN AFGHAN AND HER TIME IN AFGHANISTAN DURING TALIBAN RULE.

सुस्मिता बंदोपाध्याय आणि सईदा कमला या नावानेही त्या प्रसिद्ध होत्या. कोलकता येथे मध्यमवर्गीय कुटुंबात सुस्मिता यांचा जन्म झाला. अफगाणिस्तानमधील जानबाज खान या व्यावसायिकाशी २ जुलै, १९८८मध्ये विवाहबद्ध होऊन त्या अफगाणिस्तानात पोहोचल्या. घरच्यांचा विरोध पत्करून केलेल्या या विवाहामध्ये आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या अनुभवाने खचून न जाता त्यांनी तेथे जुळवून घेतले. पण त्याच वेळी त्यांनी बुरखा घालण्यास आणि तालिबानी फतव्यास कडाडून विरोध केला. ना\सगचे शिक्षण घेतलेल्या सुस्मिता यांनी तेथील खेड्यात स्त्रियांसाठी एक क्लिनिक सुरू केले. त्यांच्या या समाजोपयोगी कामामुळे तालिबानींनी त्यांच्यावर दबाव वाढवण्यास सुरुवात केली. यातूनच ५ सप्टेंबर, २०१३ रोजी तालिबानी दहशतवाद्यांनी त्यांची त्यांच्या घराच्याबाहेर गोळ्या घालून हत्या केली. सुस्मिता यांनी १९९५ साली आपल्या वैवाहिक जीवनावर आधारित लिहिलेली ‘काबुलीवाल्याची बंगाली बहू’ ही पहिली कादंबरी खूप गाजली. २००३ साली त्यावर ‘एस्केप प्रÂॉम तालिबान’ हा हिंदी चित्रपटही प्रर्दिशत झाला होता. त्यानंतर ‘तालिबानी अत्याचार : देश व विदेश’, ‘मुल्ला ओमर, तालिबान व मी’ (२०००), ‘एक बोलही खोटा नाही’ (२००१) या पुस्तकांनाही लोकप्रियता लाभली.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
KABULIWALYACHI BANGALI BAYKO Rating Star
Add To Cart INR 140

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more