V.S.WALIMBE

About Author

Birth Date : 11/08/1928
Death Date : 22/02/2000


VINAYAK SADASHIVA VALIMBE WAS BORN ON AUGUST 11, AD. IT HAPPENED ON 1928. HE HAD TWO BROTHERS NAMED RAJA AND MANOHAR AND ONE SISTER NAMED DWARKA. WALIMBE LIVED IN PUNE DURING HIS STUDENT YEARS. A.D. AFTER GANDHIS ASSASSINATION IN 1948, VALIMBAS PARTICIPATED IN THE SATYAGRAHA AGAINST THE BAN ON THE RASHTRIYA SWAYAMSEVAK SANGH. FOR THAT HE WAS DETAINED IN YERAWADA JAIL FOR THREE MONTHS . HIS EDUCATION WAS INTERRUPTED BY THESE EVENTS. SOON HE JOINED PRABHAT NEWSPAPER .

विनायक सदाशिव वाळिंबे यांचा जन्म ११ ऑगस्ट, इ.स. १९२८ रोजी झाला. त्यांना राजा, मनोहर असे दोघे भाऊ व द्वारका नावाची एक बहीण होती. विद्यार्थिदशेत वाळिंबे पुण्यात वास्तव्यास होते. इ.स. १९४८ साली गांधीहत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधातल्या सत्याग्रहात वाळिंब्यांनी सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना तीन महिने येरवडा कारागृहात बंदी ठेवण्यात आले होते . या घडामोडींमध्ये त्यांचे शिक्षण खंडले. लवकरच ते प्रभात वृत्तपत्रामध्ये नोकरीवर रुजू झाले . प्रभात वृत्तपत्रानंतर ते ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रात काही काळ नोकरीस होते. इ.स. १९६२-६३ च्या सुमारास वाळिंबे केसरी वृत्तपत्रात वृत्तसंपादक म्हणून रुजू झाले. केसरीत असताना पत्रकारितेच्या प्रशिक्षणासाठी ते कार्डिफ येथे गेले होते.
Sort by
Show per page
Items 1 to 5 of 5 total
NETAJI Rating Star
Add To Cart INR 550
25 %
OFF
V. S. WALIMBE COMBO SET- 4 BOOKS Rating Star
Add To Cart INR 2290 INR 1718
WARSAW TE HIROSHIMA Rating Star
Add To Cart INR 895
WE, THE NATION Rating Star
Add To Cart INR 350
WE, THE PEOPLE Rating Star
Add To Cart INR 495

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more