VIJAY AMRUTA KULANGE

About Author

Birth Date : 12/09/1976


VIJAY AMRITA KULANGE OF THE SMALL VILLAGE OF RALEGAN MHASOBACHE IN AHMEDNAGAR DISTRICT IS AN EXEMPLARY INSPIRATION FOR STUDENTS APPEARING FOR COMPETITIVE EXAMS. HIS LIFE JOURNEY IS A PERFECT EXAMPLE OF HARD WORK AND PERSEVERANCE. HE HAS A MASTERS DEGREE IN SOCIOLOGY. A 2013 BATCH IAS OFFICER, KULANGE HAS ALSO QUALIFIED SECOND IN THE STATE IN THE MAHARASHTRA PUBLIC SERVICE EXAMINATION.

अहमदनगर जिल्ह्यातील ‘राळेगण म्हसोबाचे’ या छोट्याशा गावचे विजय अमृता कुलांगे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मूर्तिमंत प्रेरणास्थान आहेत. त्यांचा जीवनप्रवास खडतर परीश्रम आणि जिद्दीचं तंतोतत उदाहरण आहे. समाजशास्त्र विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली आहे. 2013 सालच्या आयएएस बॅचचे अधिकारी असणारे कुलांगे महाराष्ट्र लोकसेवा परीक्षेतही राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. अहमदनगर विक्री विभागात विक्रीकर निरीक्षक म्हणून तर जामखेड तालुक्यात त्यांनी तहसीलदार म्हणूनही सेवा बजावली आहे. कुलांगे सध्या ओडिशा राज्यातील गंजाम जिल्ह्यात जिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. अनेक सेवाभावी उपक्रमातून कुलांगे यांनी प्रशासनात सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
AAJCHA DIWAS MAJHA Rating Star
Add To Cart INR 315

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more