VIJAY NAIK

About Author


DELHI-BASED CONSULTING EDITOR OF SAKAL MEDIA GROUP CONVENER OF FOREIGN AFFAIRS JOURNALISTS ASSOCIATION OF INDIA. VICE PRESIDENT OF THE COMMONWEALTH JOURNALISTS ASSOCIATION. MANAGING COMMITTEE OF EDITORS GUILD OF INDIA, AFRICA-INDIA EDITORS FORUM, INDIA INTERNATIONAL CENTER AND BHARATIYA NIWAS CENTER MEMBER.

सकाळ माध्यम समूहाचे दिल्लीस्थित सल्लागार संपादक भारतीय परराष्ट्र व्यवहार पत्रकार संघटनेचे निमंत्रक. राष्ट्रकुल पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष. एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाची व्यवस्थापन समिती, आफ्रिका-भारत संपादक मंच, भारत आंतरराष्ट्रीय केंद्र आणि भारतीय निवास केंद्राचे सदस्य. १९६७ पासून दिल्लीमध्ये निवास. लोकसभा व राज्यसभा प्रेस गॅलरी समितीचे माजी अध्यक्ष. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे माजी सदस्य. १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्ध तसेच श्रीलंका आणि कारगिल युद्ध मोहिमेचे वृत्तांकन. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारण आणि राजनीतीची विशेष आवड. पुस्तके : १) मंडेलांच्या देशात (मराठी व इंग्रजी आवृत्ती) २) रणजित देसाई पुरस्कार विजेती व मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशित कादंबरी – त्रिकोण ३) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी (यूपीएससी व एमपीएससीच्या विद्याथ्र्यांसाठी) ४) साउथ ब्लॉक, नवी दिल्ली : शिष्टाईचे अंतरंग (डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार)
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
TRIKON Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
मिलिंद शिवडेकर, नागपूर

फारच छान. वाचनीय. `छाटितो गप्पा` प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक.खुसखुशीत आणि खुमासदार लेखन. प्रत्येक प्रसंगाची विनोदी लेखन शैली. प्रत्येक प्रसंग मनाला स्पर्श करणारा. सामान्य माणसाच्या जीवनात घडणारे प्रसंग लेखकाने अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे.त्यामुळे लेखक श्री जी. बी. देशमुख यांची इतर पुस्तके आता नक्की वाचणार. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अरविंद आपटे, पुणे, सेवानिवृत्त वनाधिकारी

नुकतंच जी.बी.देशमुखांचं ‘छाटितो गप्पा’ हे पुस्तक वाचलं. यापूर्वीही त्यांचं ‘कुलामामाच्या देशात’ हे रवींद्र वानखडे यांच्या वनसेवेतील अनुभवावर आधारीत पुस्तक वाचलं होतं. एक वनाधिकारी लिहील अशा भाषेत त्यांनी किस्से छान रंगवले आहेत. माझी कधी अमरावतीत पस्टिंग झाली नाही, पण माझे तीन खास मित्र अमरावतीचे असल्याने त्यांच्या तोंडून अमरावती, तिथली भाषा, ठिकाणं चांगलीच ओळखीची होती. लेखक त्यांना समवयस्क असल्याने त्यांनी तोच काळ उभा केला आहे. मी पण सरकारात काम केलं असल्याने सरकारी कामाचे नमुने मनापासून हसायला लावतात. तुमच्या गोष्टी/ किस्से म्हटले तर साधेसुधे आहेत, पण ते खूप छान पध्दतीने खुलवून, विनोदाचा आधार घेत सांगितले आहेत. प्रत्येक लेखात नकळत जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. लेखकाच्या भावी लेखनासाठी शुभेच्छा ! ...Read more