* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS THE 8TH NOVEL BY THE AUTHOR AADYA RANGACHARYA. THIS NOVEL CASTS A LIGHT ON THE RELATIONSHIP BETWEEN A MAN AND A WOMAN. ACTUALLY, NOWHERE IN THIS NOVEL HE DESCRIBES THE INTIMATE ACTS BETWEEN A MAN AND WOMAN BUT MERELY SUGGESTS. HIS STYLE REFLECTS THE INNER CORE OF THE HUMAN BEINGS. THOUGH VERY SIMPLE THIS STYLE IS VERY EFFECTIVE. THIS NOVEL IS BASED ON THE RELATIONSHIP OF A HUSBAND AND HIS SICK WIFE, A REAL BED-RIDDEN ONE WHO IS UNABLE TO GIVE HIM ANY PHYSICAL PLEASURE. AFTER HER DEATH, HE MARRIES HER COUSIN TO WHOM HE WAS ATTRACTED TERRIBLY. THE WHOLE NOVEL THEREAFTER IS BASED ON THEIR RELATIONSHIP. IT ENDS ABRUPTLY, WHEN WE THINK THAT IT IS GOING TO TAKE SOME GOOD TURN.
आद्य रंगाचार्य (श्रीरंग) ह्यांच्या लिखाणात विचारनाविन्याची देणगी आणि प्रयोगशीलतेची आवड कटाक्षाने जाणवते. अनादि-अनंत मध्ये त्यांनी स्त्रीपुरुष संबंधांची समर्थपणे उकल केली आहे. डॉ. जी. एस. अमूर. ह्या कादंबरीत पात्रांच्या अंतरंगाचं विश्लेषण आहे. त्यामुळे हिची शैलीच निराळी आहे. मी नाटककार असल्यामुळे ही शैली सहजसुलभ आणि परिणामकारक वाटली असल्यास आश्चर्य नसावे. आद्य रंगाचार्य (श्रीरंग)
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ANADI-ANANT #ANADI-ANANT #अनादिअनंत #FICTION #TRANSLATEDFROMKANNADATOMARATHI #AVINASHDESAIDESAIUSHA #ADYARANGACHARYA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK GAONKARI 18-4-2010

    आद्य रंगाचार्य (श्रीरंग) हे कानडी भाषेतील आधुनिक साहित्यिक ते प्रथमत: एक उत्तम नाटककार सुपरिचित आहेत. त्याचबरोबर विविध साहित्य प्रकार आणि संशोधनही त्यांच्याकडून हाताळले गेले आहेत. त्यांचीच अनादी अनंत ही कादंबरी उषा देसाई आणि अविनाश देसाई यांनी अनुवादत केली आहे. या कादंबरीत पात्रांच्या अंतरंगाचे विश्लेषण असल्याने या कादंबरीची शैली निराळी आहे. मी नाटककार असल्याने ही शैली सहज सुंदर आणि परिणामकारक वाटली असल्यास आश्चर्य नसावे, असे आद्य रंगाचार्य यांनीच म्हटल्यामुळे लेखनाच्या शैलीबद्दल वेगळे काही सांगण्याचे कारणच उरत नाही. ...Read more

  • Rating StarDainik Matrubhumi 14-2-2010

    स्त्री-पुरुषांमधील तरल संबंधांचा मागोवा ‘अनादि-अनंत’ या कादंबरीत घेतला आहे. या संबंधाचे विश्लेषण तटस्थपणे कादंबरीत येत राहते. ‘अनादि-अनंत’ ही आद्य रंगाचार्य (श्रीरंग) यांची कादंबरी. या कादंबरीचा अनुवाद उषा देसाई आणि अविनाश देसाई यांनी केला आहे. कर्नाकमधील प्रसिद्ध साहित्यिक आद्य रंगाचार्य यांनी स्त्री-पुरुष संबंधाची अनादि-अनंत काळापासून असलेली उकल समर्थपणे केली आहे. कादंबरीत पात्रांच्या अंतरंगाचे विश्लेषण आहे. साहाजिकच या कादंबरीची शैली स्वत:ची ओळख निर्माण करून देणारी आहे. कादंबरी दोन भागात अनादि आणि अंत या प्रकरणातून उलगत जाते. कुमुद, रामण्णा ही पात्रे जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि भाष्य सांगत जातात. १९५१मध्ये या कादंबरीचा पहिला भाग ‘अनादि’ प्रसिद्ध झाला. यावेळी अश्लिलतेची पायरी न चढता स्त्री-पुरुष समस्यांची चर्चा करण्यात यश प्राप्त केलेली ही कादंबरी असा अभिप्राय समीक्षकांनी या कादंबरीसंदर्भात व्यक्त केला होता. आजचं साहित्य सामान्यांना समजलं पाहिजे असा उपदेश केला जातो. आपण स्वत: असामान्य आहोत या भ्रमात असा उपदेश करणारी मंडळी जगत असतात. परंतु, कोणताही अभिनिवेश न बाळगता आद्य रंगाचार्यांनी अतिशय जटिल आणि गुंतागुंतीच्या स्त्री-पुरुष संबंधाचा उलगडा सोप्या भाषेत करण्याचा प्रयत्न केला आहे. उषा देसाई आणि अविनाश देसाई या दोघांनी मराठी भाषांतर करताना रंगाचर्यांच्या अक्षरगाभ्याला कोठे धक्का लावला नाही. अत्यंत सोपे आणि तरल स्वरूपाचे भाषांतर त्यांनी केले आहे. वाचकांच्या थेट हृदयास हाक घालणारे हे भाषांतर आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 6-6-2010

    स्त्री-पुरुष नातेसंबंध हा अत्यंत गहन विषय. त्यावर अनेक विचारवंतांनी आपापले विचार, विविध कालखंडात मांडले, तरीही या नातेसंबंधाची उकल अजूनही पुरती कुणाला करता आलेली नाही. नव्या कालखंडात अन् आजूबाजूचं वास्तव बदलत असताना, विस्तारत असताना या नातेसंबंधात नव आयाम दिसू लागतात आणि मग पुन: नव्यानं स्त्री-पुरुष नातेसंबंध आहे तरी काय याचे नवेच निकष सामोरे येऊ लागतात. आद्य रंगाचार्य (श्रीरंग) यांनी आपल्या ‘अनादि-अनंत’ या कादंबरीमध्ये पुन: एकदा स्त्री-पुरुष नातेसंबंधांचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कादंबरीचे दोन भाग आहेत. पूर्र्वार्ध ‘अनादि’मध्ये नायक रामण्णा, त्यांची अंथरुणाला खिळलेली पत्नी सरला आणि सरलेनेच तिच्या नात्यातील तिला घरकामात मदत व्हावी म्हणून आणलेली तरुणी कुमुद एवढीच तीन पात्रं. रामण्णा हा सृजनशील लेखक, कादंबरीकार. त्याचं सरलावर प्रेम. पण सरलाच्या आजारपणात त्याला तिच्याकडून शारीरिक सुख नाही. मूलही नाही. त्याची आता शक्यताही नाही. सरलाला मात्र तिचं घर मुलाबाळांनी भरलेलं असावं असं वाटतं. त्यासाठी रामण्णानं दुसरं लग्न, तेही कुमुदाशी करावं ही तिची इच्छा. पण तत्पूर्वीच एका मोहाच्या क्षणी रामण्णा आणि कुमुद यांचा शरीरसंबंध होतो. आपण चूक करतोय की बरोबर हा निर्णय होण्यापूर्वीच हे सारं घडतं. यातून प्रश्न निर्माण होतो तो नैतिकतेचा. आद्य रंगाचार्य यांनी या पात्रांच्या मनोवस्थेतून, त्यांच्या विचारातून हा मुद्दा विविध स्तरावर तपासून पाहिला आहे. रामण्णाचं खरं प्रेम कोणतं? सरलेवरचं की शारीरिक उपासमारीतून कुमुदकडे आकर्षिले गेलेलं, कुमुदमध्ये अडकणारं? सरलाच्या मृत्यूनंतर रामण्णा कुमुदशी लग्न करतो. कुमुदही त्यास तयार होते, ती तिच्या पोटात रामण्णाचा अंश वाढत असतो म्हणून की तिला रामण्णा आवडत असतो म्हणून? प्रतारणा कोण कुणाशी करतं? नेमकं प्रेम म्हणजे काय? स्त्री-पुरुष यांच्यातील नात्याचा अर्थ भावनिक पातळीवर श्रेष्ठ की शारीर पातळीवर? लेखक श्रीरंग एके ठिकाणी म्हणतात, ‘हृदयं एक झाली नसता शरीरांना एकत्र आणणं हीच खरी वेश्यावृत्ती, लग्न झालं तरी वेश्यावृत्तीच ना!’ रामण्णश-सरला, रामण्णा-कुमुद या नातेसंबंधांचा विचार करताना श्रीरंग यांनी कालिदास, भवभूती यांच्या काव्याचे दाखले देत त्यांच्या नात्यांचा, वागण्याचा अन्वयार्थ लावायचा प्रयत्न केलेला आहे. पुराणातील उदाहरणं आणि रामण्णा-कुमुदचा पोरकटपणा यातील साम्य मात्र इथठ ओढून-ताणून आणल्यासारखं, कृतक वाटतं. त्या उदाहरणांनी श्रीरंग यांचा व्यासंग दिसतो, पण रामण्णा-कुमुद ही पात्रं मात्र अ-लौकिक होत नाहीत. तरीही कधी कधी त्यांचे अनुभव तत्त्वज्ञानाच्या पातळीवर व्यक्त होतात. उदा. ‘एकाचं सुखदु:ख दुसऱ्याच्या हातात नसतं’किंवा ‘मनुष्याला ज्या घटना अचानक घडल्या असं वाटतं त्या निसर्गाच्या नियमानुसार घडतात.’ उत्तरार्ध ‘अनंत’मध्ये दहा वर्षानंतरचा कालखंड. त्यात कुमुदनं घर सोडलं. रामण्णाशी संबंध ठेवला नाही. मुलगा मोहन दहा वर्षांचा झाला. आता त्या दोघांमधील एकमेव दुवा ‘मोहन’. पण त्याच्या अकस्मात जाण्यानं रामण्णा आणि कुमुद यांच्या नात्याला काय अर्थ राहिला, असा प्रश्न उपस्थित करून ही कादंबरी संपते. अगदी अपवादानंच यात अलंकार येतात. सुंदर अशी श्रीरंगची निवेदनशैली आहे. प्रारंभी कथानक एकाच मुद्याभोवती घोटाळत राहतं. उत्तरार्धातही तसंच. पात्रांचे स्वाभाविक विस्तार जाणवत नाहीत. स्त्रिया तर हिंदुस्थानी पारंपरिक स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणाNया, त्यादृष्टीनं यात आधुनिक विचारही जाणवत नाही. उषा देसाई-अविनाश देसाई यांचा अनुवाद उत्कृष्ट. चंद्रमोहन कुळकर्णींचं मुखपृष्ठ आशयानुसार अर्थचित्रासारखं सुबक. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
Ashwini Deshmukh, Pune.

This book holds a special place in my heart, especially because I come from Vidarbha, and the author`s writing resonates deeply with my roots. The stories are simple yet impactful, written in easy Marathi, making them accessible to all readers. What akes this book unique is how each story offers valuable life lessons—whether it`s about honesty, navigating real-life struggles, or the bonds we form with others. The humor woven throughout the stories adds a refreshing touch, making it enjoyable to read while also making you reflect on the deeper messages. The simplicity of the writing allows the book to flow seamlessly, leaving you eager to read the next story. It’s a perfect blend of life lessons, humor, and relatability. Overall, it`s a wonderful read that stays with you, reminding you of the little things that matter most in life. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ. मिना जोशी, नागपूर.

`छाटितो गप्पा` वाचताना असे वाटते की रोजच्या जीवनातील साधे साधे प्रसंग अतिशय नेटक्या शब्दात गुंफलेले आहेत. छाटितो गप्पांची सहज सुलभ मांडणी खूपच भावली.