* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 0
  • Language : MARATHI
  • Discount : Individual(Login to get best discount offers.)
Quantity
Sr.No.Book NamePriceISBN
11960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH200.009788177661019
2AADITAL170.009788171612864
3AATMACHARITRA MIMANSA160.009788171617722
4BHUMIKANYA180.009788177660456
5DAVARNI210.009788171612734
6DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS400.009789387319905
7GHARBHINTI600.009788177665932
8GHARJAWAI180.009788171618729
9GOTAVALA180.009788184984101
10GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA195.009788171612680
11GRAMINTA SAHITYA ANI VASTAV150.009788171612697
12GRAMSANSKRUTI280.009788171619764
13KACHVEL360.009788177662887
14KHALAL190.009788171612635
15LALIT GADYACHE TATVIK SWARUP AANI MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS120.009788171614769
16MAI LEKARA100.009788171617432
17MALAVARCHI MAINA180.009788177664034
18MALYACHI MATI100.009788171612642
19MARATHI SAHITYA, SAMAJ ANI SANSKRUTI195.009788171612703
20MATIKHALCHI MATI140.009788184983388
21MAULI195.009788177666090
22NANGARNI370.009788177665178
23NATRANG230.009788177665130
24PANBHAVARE150.009788177662115
25SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA295.009788177662603
26SAHITYIK JADAN-GHADAN150.009788184983272
27SAHITYIKACHA GAON90.009788177661002
28SAINIK HO TUMACHYASATHI60.009788177667660
29SHEVATCHI LADHAI160.009788177661026
30SPARSHKAMALE195.009788171618989
31UGVATI MANE160.009788177661088
32UKHADLELI ZADE195.009788177664393
33ZADVATA160.009788177660463
34ZOMBI420.009788177663921
  7120.00 
N/A
N/A
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarDnyaneshwar Chandarrao Pimparkar

    Good

  • Rating StarDipak Manjarekar

    डाॅ.आनंद यादव : (३० नोव्हेंबर १९३५ – २७ नोव्हेंबर २०१६). आज त्यांचा जन्म दिवस...! डाॅ. आनंद यादव हे नाव मराठी साहित्याशी मैत्री असणाऱ्या वाचकाला नवीन नाही. महाराष्ट्रातल्या ग्रामीण जीवनाचं यथार्थ दर्शन घडवणाऱ्या कथा, कादंबरी आणि कवितांचे लेखक म्हून त्यांचं कर्तुत्व वादातीत आहे. कथा, कविता, कादंबरी, ललितगद्य, समीक्षा इ. अनेक साहित्यप्रकारांमध्ये लक्षणीय स्वरूपाचे लेखन त्यांनी केले आहे. ललित साहित्यातील त्यांच्या कसदार लेखनामुळे आणि समीक्षात्मक लेखनात दिसणाऱ्या व्यासंगी वृत्तीमुळे आजच्या मराठी साहित्यातल्या यशस्वी लेखकांत डाॅ. आनंद यादव या नावाचा अंतर्भाव सहजपणाने होतो. आजच्या नव्या पिढीला त्यांच्या नावाची ओळख `नटरंग` या लोकप्रिय चित्रपटामुळे होते. ग्रामीण तमाशा कलावंताच्या उपेक्षित जीवनाचा आविष्कार करणारी त्यांची `नटरंग` ही कांदबरी समकालीन समाजजीवनाचा वाङ्‌मयीन दस्तऐवज ठरली. तमाशा कलावंत गुणा कागलकर याची शोकांतिका थोडक्यात सर्व तमाशा कलावंतांची प्रातिनिधिक कथा ठरते. याच कादंबरीवर बेतलेला आणि त्यांची पटकथा असणारा ‘नटरंग’ चित्रपटही तुफान लोकप्रिय ठरला. आणि त्यांच्या बावनकशी सोन्यासारख्या वाड़मयीन गुणवत्तेला जगमान्यता मिळाली. झोंबी, नांगरणी, घरभिंती आणि काचवेल या कादंबऱ्यांच्या निमित्ताने डाॅ. आनंद यादव यांनी आत्मचरित्रात्मक कादंबरीचा नवा मानदंड निर्माण केला. कारण या स्वरूपाचे कादंबरीलेखन यापूर्वी मराठी साहित्यात कधीही झालेले नव्हते. पण सर्वथा या चार पुस्तकापलिकडे त्यांच्या इतर साहित्यसंपदेकडे जिज्ञासू वाचकां शिवाय कुणी ही सरकत नाही.वस्तूतः गोतावळा किंवा खळाळ , नटरंग हे इतर साहित्य तितकेच उत्कृष्ट आहे..! डाॅ. आनंद यादव याचा जन्म 30 नोव्हेंबर 1935 साली कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. "झोंबी" ही त्यांची संपूर्ण आत्मकथा दहावी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी लेखकाला खाव्या लागलेल्या खस्ता ह्या भोवती फिरते. दारिद्र्य,अंधश्रद्धा आणि वडिलांचा शिक्षणाला असलेला प्रखर विरोध ह्या विरुद्ध ठामपणे उभे राहत आनंद यादव आपले शिक्षण पूर्ण करतात. पुढे रत्नागिरी मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेताना पु.ल. देशपांडे यांच्याशी झालेल्या परिचयानंतर त्यांच्या `हिरवे जग`मधली नववळणाची अस्सल ग्रामीण कविता कुठेही प्रकाशित न होता त्यावेळेच्या ख्यातनाम साहित्यिकांपर्यंत पोहोचली.त्यांची वाड़मयीन गुणवत्ता उजळून निघाली. पुढे डाॅ. आनंद यादव यांनी प्रांजळपणे आपल्या साहित्यिक आणि वैयक्तिक आयुष्यात पु.ल. व सुनिताताई देशपांडे यांचे योगदान नांगरणी, घरभिंती आणि काचवेल या चरित्र-खंडात उल्लेखलेलं आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर...1955 च्या संप्टेंबर-ऑक्टोबरात भाई (पु.ल. देशपांडे) आणि सुनिताताई माझ्या जीवनात अनपेक्षितपणे आले आणि त्यांनी माझ्या व्यक्तीत्वाच्या मूळ कंदाला हात घातला. तोपर्यंत मी माझ्या आवडीसाठी वाचन करत होतो. मनाला बरं वाटतं म्हणून भावनाप्रधान कविता करत होतो. त्या पलीकडे त्या लेखनात काही नव्हतं, पण भाईंनी नि सुनिताताईंनी नकळत माझ्या मनावर हळुवार फुंकर घातली. माझ्या साहित्यिक गुणांविषयी माझ्यात दाट विश्वास निर्माण केला. त्यामुळे परिस्थितीच्या टाचे खाली चुरगळून गेलेल्या माझ्या वाड़मयीन गुणांना एकाएकी खतपाणी मिळालं. मनाला चैतन्यपूर्ण जोमदारपणा आला. ते वाढू विकासू लागलं.अनावरपणे वाड़मयीन गुण माझ्या इतर गुणांवर मात करू लागले. त्यांना मागं लोटून आपण पुढं येण्यासाठी धडपड करू लागले. `तुझं शिक्षण पूर्ण करण्यास मदत केली तर उद्याच्या महाराष्ट्राला एक चांगला साहित्यिक मिळू शकेल, या विचाराने आम्ही तुझ्यासाठी धडपडत आहोत.` हे सुनिता ताईंच्या पत्रातील वाक्य मी मनावर संगमरवरात कोरावं तसं कोरून ठेवलेलं...त्यामुळे माझी जीवनविषयक महत्वाकांक्षा अधिक स्पष्ट झाली होती. प्राध्यापक आणि साहित्यिक दोन्ही व्हायचं असं मी ठरवलं होतं. माझ्या मते डाॅ. आनंद यादव ही मराठी साहित्याला पु.ल. आणि सुनिताताई यांनी दिलेली अनमोल भेट म्हणता येईल! 1950 नंतरचा काळ सत्यकथेच्या उत्कर्षाचा आणि अत्युच्च प्रतीष्ठेचा होता. रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे या शहरात वाड़मयीन संस्कार घडल्यानंतर सत्यकथा आणि मौज यांनी त्यांच्यावर ग्रामीण कथाकार, कवी म्हणून प्रतीष्ठेचा पहिला शिक्का 1961 साली दिवाळी-पाडव्याच्या मुहूर्तावर मारला.हा शिक्का मिरवत ते झपाट्याने लिहीत राहिले.. आनंद यादव यांच्या १९६० पासून ५०-५५ वर्षांच्या साहित्यिक कारकिर्दीचा एक परिपूर्ण आढावा घेताना त्यांच्या साहित्यातून नवीन प्रवाह आणण्यासाठी त्यांनी यशस्वी पणे केलेली धडपड ठळकपणे जाणवते. आत्मचरित्र ही सर्वमान्य रूढ संकल्पना त्यांच्या ‘झोंबी’, नांगरणी’, ‘घरभिंती’, ‘काचवेल’ हे अनोख्या पद्धतीनं आलेल्या आत्मचरित्रात्मक कादंबरीला लागू होत नाही. हे चार खंड मराठी साहित्याला नवे मापदंड देणारे वाटतात. यापूर्वी अशा पद्धतीने आत्मचरित्र कुणी ही लिहिलं असेल वाटत नाही. झोंबी किंवा नांगरणी पासून माझ्यासारख्या आयुष्यात दिशा हरवलेल्या कितीतरी जणांनी प्रेरणा घेतली असेल, या पुस्तकांची किती तरी पारायणे केली असतील. डॉ. आनंद यादव त्यांनी निर्माण केलेल्या आशयघन, प्रयोगशील, भरघोस साहित्यकृतींमुळे मराठी साहित्यातले एक महत्त्वाचे नाव आहेच ; परंतु तितकेच ते महत्त्वाचे आहे कारण त्यांनी ग्रामीण साहित्य लेखनाची, ग्रामीण साहित्याकडे बघण्याची एक नवी वाट शोधली आणि ती वाट पाठीमागून येणाऱ्या नव्या ग्रामीण साहित्यिकांसाठी खुली केली. त्यांनी नव्या लेखकांना जी दिशा, जो विचार, जो दृष्टिकोन दिला, त्यातूनच ग्रामीण साहित्याची चळवळ निर्माण झाली. `काचवेल` या त्यांच्या आत्मचरित्रात्मक शेवटच्या खंडामध्ये मध्ये यावर सविस्तर माहिती आली आहे. 1960 पुर्वी ग्रामीण साहित्यातील लेखक, कवी आणि सर्वसामान्य वाचकांच्या मनावर एक सवंग लोकप्रिय पण दिशाभूल करणारी कल्पनारम्य प्रतिमा रेखाटत असत. त्यांचं ग्रामीण जीवन आणि तिथला माणूस, त्याच्या आशा-आकांक्षा, सुख-दु:खं, आशा-निराशा ह्या समग्रपणे मांडल्या गेल्या नाहीत हा त्यांचा मुळ मुद्दा! या व्यतिरिक्त पुर्वीच्या ग्रामीण साहित्यात लेखकांनी बहुतांशी तृतीय पुरूषी भाषा वापरल्याने लेखक त्यांच्या साहित्यातील पात्रांना आपलं मनोगत पुरेसे मांडू न देता स्वतःची मतं ही त्यामध्ये बेमालूम पणे मिसळून देतो हा त्यांचा एक मोठा आक्षेप.त्यांच्या मते या काळात ग्रामीण लोकांकडे बघण्याचा सांप्रत लेखकांचा साहित्यिक दृष्टीकोन हा करूणदायी, सहानुभूती दाखवणारा किंवा त्यांच्यावर इरसाल विनोदी कथा लिहून वेंधळटपणाचा शिक्का मारणारा होता. हे सगळं पुसून टाकून तिथे वास्तवाची धग पेरणे हे काम सोपे नव्हते; परंतु डाॅ. आनंद यादव यांच्या साहित्यप्रेरणांची मुळं ग्रामीण भागात घट्ट रोवलेली होती. त्यामुळे अशी भ्रामक प्रतिमा घट्ट करणारं लेखन त्यांच्या हातून होणं अशक्यच होतं. कदाचित यातूनच त्यांच्यातील प्रयोगशीलतेने उसळी मारून जुन्याला नकार देत नवी वाट चोखाळण्याला त्यांना प्रवृत्त केलं असावं. त्यांच्या समग्र लेखनाच्या गाभ्यात आपल्याला ग्रामीण जीवन आणि तिथला माणूस त्याच्या आशा-आकांक्षा, सुख-दु:खं, आशा-निराशेच्या प्रहरांसकट भेटतो. कारण तोच त्यांच्या जीवनास्थेचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळेच अस्सल ग्रामीण जीवनदर्शन हे त्यांच्या संपूर्ण साहित्याचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.ग्रामीण जीवनाचे खरे दर्शन बोलीभाषेतूनच घडवणे शक्य आणि योग्य आहे. अशा आग्रही विचाराने स्वत:ला बोलीभाषेतूनच प्रकट केले. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतील पात्रे तर बोलीभाषेतून बोलतात; परंतु निवेदकही बोलीभाषेतून संवादी होतो हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. त्याचबरोबर विविध लेखांतून बोलीभाषेचे समर्थन केले. मराठी साहित्यात एक वेगळा प्रवाह त्यांनी निर्माण केला. त्यांनी ग्रामीण भागातील लेखनाचे अंकुर जपणाऱ्या नव्या, तरुण लेखकांना लिहिण्यासाठी एक पायवाट तयार करून दिली. त्यांच्या प्रेरणेने खेड्यापाड्यातील अनेक तरुण कवी, लेखकांना लेखनाची ऊर्जा मिळाली. ग्रामीणतेचे खरे निकष त्यांनी स्पष्टपणे मांडले. डाॅ.आनंद यादव यांनी विपुल आणि कसदार लेखन केलं. त्यांनी वेगवेगळे वाङ्मय प्रकार कुशलतेने हाताळले, ते केवळ सगळ्या साहित्यप्रकारात हात मारायचा या हौसेपोटी नव्हे, तर त्या-त्या साहित्यप्रकाराच्या स्वीकारामागे त्यांचा एक स्पष्ट दृष्टिकोन दिसतो. त्यातूनच कविता, कथा, कादंबरी, आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या, समीक्षा असे त्यांचे बहुआयामी लेखन निर्माण होत राहिले. ‘हिरवे जगे’, ‘मायलेकरं’ सारखे कवितासंग्रह, ‘गोतावळा’सारखी मराठी कादंबरीला नवे रूप देणारी कादंबरी, ‘नटरंग’सारख्या कादंबरीतून मांडलेली कलावंताची फरपट, बहाल करणारे समीक्षात्मक ग्रंथ अशी एकूण चाळीस ग्रंथांची समृद्ध संपदा त्यांनी निर्माण केली. त्यांच्यातील प्रगल्भ साहित्य-जाणिवांचे दर्शन त्यातून घडले. डाॅ.आनंद यादव यांनी महाराष्ट्रातील विविध साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे भूषविली आहेत. त्यात, जुन्नर, असोदा, विटा, बेळगाव, भंडारा, नाशिक, औदुंबर, जळगाव, पुणे, मुंबई अशा अनेक ठिकाणी भरलेल्या साहित्य संमेलनांचा उल्लेख करता येईल. 2009 साली महाबळेश्वर इथे झालेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मिळाले असतांना काही वादांमुळे ते संमेलन त्यांच्या अनुपस्थितीत पार पडले.आजपर्यंतच्या साहित्य संमेलनाच्या इतिहासातील ही एकमेव खंत देणारी घटना. वस्तूतः त्यांच्या संपन्न वाड़मयीन साहित्यप्रवासात हा एक दुर्भाग्य योगच!. पुढे त्यानी 2013 मध्ये साहित्यनिर्मितीमधून सुद्धा जाहीर निवृत्ती स्विकारली. त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांचीही नोंद घेणे आवश्यक ठरेल. त्यांच्या झोंबी या आत्मचरित्रात्मक कादंबरीला १९९० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच या कादंबरीला अन्य आठ पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांना शिवाजी सावंत पुरस्कार, पु. य. देशपांडे स्मृती पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, लाभसेटवार पुरस्कार असे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या साहित्याला महाराष्ट्र राज्य सरकारची एकूण दहा पारितोषिके मिळाली आहेत. राष्ट्रीय हिंदी अकादमीचा (कोलकाता) उत्कृष्ट साहित्य निर्मिती बद्दलचा पुरस्कार त्यांना १९९४ मध्ये प्राप्त झाला आहे. यादवांचे साहित्य महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरील विद्यापीठांमधूनही अभ्यासले गेले आहे. त्यांच्या साहित्यावर अनेक संशोधकांनी एम. फिल. आणि पीएच. डी. चे संशोधन केले आहे. तसेच त्यांच्या साहित्याची कन्नड, तेलगु, हिंदी, इंग्रजी, जर्मन इ.भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. त्यांच्या `गोतावळा` या कादंबरीने ग्रामीण कथात्मक साहित्याला आणि ग्रामीण बोलीभाषेच्या आविष्कार माध्यमाला महत्त्व मिळवून दिले. हे गोतावळाचे ऐतिहासिक महत्त्वाचे कार्य आहे. कथात्मक लेखनाबरोबरच आनंद यादव यांनी ललितगद्यलेखनही केले आहे. या लेखनात प्राधान्याने ग्रामीण अनुभवांचा आविष्कार आहे. ललितलेखन करीत असताना ते साहित्य व्यवहाराशी निगडित असलेल्या अनेक प्रश्नांचे चिंतन करीत होते. त्यातून त्यांचे समीक्षालेखन आणि वैचारिक स्वरूपाचे लेखन निर्माण झाले. अशाप्रकारे एकाच वेळी ललितलेखन आणि समीक्षालेखन या दोन्ही आघाड्या यादवांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. या संदर्भात यादवांच्या रूपाने ग्रामीण साहित्याला चांगला भाष्यकार मिळाला आहे असा निर्देश गो. म. कुलकर्णी यांनी केला आहे. शाळेत असताना मराठी बालभारती पुस्तकातील `पाटी आणि पोळी` किंवा झोंबी हे धडे वाचताना त्यांच्या साहित्या विषयी मनात अनावर ओढ निर्माण झाली होती. व्यक्तीशः मला आवडलेली किंवा माझं आयुष्य बदलून टाकणारी झोंबी आणि नांगरणी ही पुस्तकं मला खुप प्रेरणादायी वाटतात . #झोंबी.... "आजच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत अस्वस्थ होऊन धुमसणे हाच ग्रामीण जीवनाचा स्थायीभाव आहे. त्या अस्वस्थपणाचा स्फोट मराठी साहित्यात सुरू झालाच आहे. हे व्हायला हवेच होते. शिवाय, साऱ्या जगातलं साहित्य समृद्ध केलं आहे. ते या `झोंबी`सारख्या वाचकाला अस्वस्थ करणाऱ्या ग्रंथांनीच!" - पु. ल. देशपांडे #नांगरणी... कणखर सकसता आणण्यासाठी... भूमीनं स्वत:वर धारदार अवजारांनी आडवे उभे घाव घालून घेणे.. आणि सूर्यभट्टीत अंतर्बाह्य होरपळणे म्हणजे नांगरणी. उत्तम पिकांच्या समृद्धीसाठी शेतमळ्यांवर हिरवीगार साय साकळावी; अंगाखांद्यावरच्या गाईगुरांना, माणसाकाणसांना, किड्यामुंग्यांना, चिमण्यापाखरांच्या इवल्या चोचींना मूठमूठ-चिमूटचिमूट चारचणा मिळावा; म्हणून भूमीनं स्वत:ची सोशिकपणे केलेली उरस्फोड म्हणजे नांगरणी. इच्छाआकांक्षाची पूर्तता करणारा पाऊस, कृपावंत होऊन पडावा म्हणून... तहानलेल्या पृथ्वीनं वासलेली चोच... म्हणजे नांगरणी. नांगरणी म्हणजे... हिरव्या चैतन्याला जन्म देऊ पाहणाऱ्या, सर्जनोत्सुक भूमीची घुसमटणारी.. निर्मितिपूर्व करुणावस्था. झोंबी सुंदर आहेच पण नांगरणीत जकातेंचा `आंदा` महाराष्ट्राच्या कोन्या कपारीत जात `आनंद यादव` नावाचा लेखक होण्याचा हा प्रवास अतिशय सुंदर आहे...झोंबीमध्ये जकातें च्या आंदा चा दहावी पर्यंतचा प्रवास तर नांगरणी मध्ये आंदा ते लेखक आनंद यादव बनण्यापर्यंतचा प्रवास अधोरेखीत केलेला आहे. परिस्थितीसोबत दोन हात करायला शिकवणारे हे आत्मचरित्र, अतिशय सुंदर. नांगरलेलं शेत जसं सुंदर दिसावं तसं हे नांगरणी लेखन ही सुरेख उतरवलं आहे. प्रत्येकाची आपली अशी एक वाट असते. काहींची सरळ, धोपट, काहीची वळणावळणांची अडीअडचणींची लेखकाचीही आपली एक वाट काट्याकुट्यांनी भरलेली. दगडधोंडे आडवे येणारी. तरीही पुढे जायला प्रवृत्त करणारी. पुढे जायचंच या कल्पनेने झपाटलेला जीव काटेरी मार्गाची वाट त्या झपाटलेपणामुळं सहज पार करतो. आणि इच्छा आकांक्षांची पूर्ती; हवं ते मिळवल्याचं मनभरून राहिलेल्या समाधानानं, तृप्तीनं मागं वळून बघतानाचा क्षण, आयुष्याच्या वळत्या वाटेवरचं उमलण्याच्या कल्पनेनं झपाटणं, फुलार, बहरणं, आठवणींचे दवबिंदू पानावरून ओघळले तरी पानांच्या अंगोपांगी असलेलं ओलेपण जपणार्‍या स्मृतीची सहज उलगड जाणारी मालिका म्हणजे नांगरणी. एस. एस. सी. पूर्वीचा काळ यादवांच्या `झोंबी’मध्ये चित्रित झाला आहे. मध्ये त्या पुढील कॉलेज शिक्षणाचा काळ आला आहे. व्यक्तीत्वाचं रोपटं बहरावं म्हणून परिस्थितीच्या मातीची मशागत करताना, संकटाची तण उपटून फेकताना आलेले कडू गोड अनुभव, सहज सुलभ शैलीत मांडण्याचा यशस्वी प्रयत्न लेखकाने केलेला आहे. झोंबीपेक्षा नांगरणीतला लेखकाचा दृष्टीकोन अधिक व्यापक आहे. प्रतिकूल परिस्थितीच्या विरोधात उभा असलेला लेखक हा नांगरणीचा गाभा आहे. सहजसुलभतेने उलगडत जाणारी उत्कट आत्मकथा.....! ‘नांगरणी’तील आंदोलने ही,आपल्या कुटुंबासह आपल्याला माणसासारख्र जगता यावे म्हणून खालच्या सामाजिक स्तरातून वरच्या सामाजिक स्तरात जाऊ पाहणाऱ्यासंवेदनशील तरूण मनाची आहेत. ता.क. त्यांचा आयुष्यप्रवास इतका संघर्षमय पण प्रेरणादायी आहे की त्याच्यावर सुरेख चित्रपट, मालिका अथवा वेबसिरीज बनवता येईल. मध्यंतरी झोंबीवर मराठी चित्रपट ही येणार असल्याची चर्चा ऐकण्यात आली होती. ते खरं असेल तर तो जीवनपट भविष्यातील पुढच्या पिढ्यांना तो एका दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक म्हणून पुढे कार्यरत राहिल. डाॅ.आनंद यादव यांची साहित्यसंपदा. कथासंग्रह : खळाळ (१९६७), घरजावई (१९७४), माळावरची मैना (१९७६), आदिताल (१९८०), डवरणी (१९८२), उखडलेली झाडे (१९८६), झाडवाटा (२०००), भूमिकन्या (२००१), शेवटची लढाई (२००२), उगवती मने (२००३). कादंबरी: गोतावळा (१९७१), नटरंग (१९८०), एकलकोंडा(१९८०), माऊली (१९८५), कलेचे कातडे (२००१). आत्मचरित्रात्मक कादंबरी : झोंबी (१९८७), नांगरणी (१९९०), घरभिंती (१९९२), काचवेल (१९९७) , कविता संग्रह: हिरवे जग (१९६०), मळ्याची माती (१९७८) , मायलेकरं(१९८९) हा दीर्घ कवितासंग्रह, ललित साहित्य माती खालची माती (१९६५) - व्यक्तिचित्रसंग्रह स्पर्शकमळे (१९७८), पाणभवरे (१९८२), साहित्यिकाचा गाव(२००४) हे ललित लेखसंग्रह. समीक्षा आणि वैचारिक साहित्य : ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि समस्या (१९७९), ग्रामीणताः साहित्य आणि वास्तव (१९८१), मराठी साहित्य, समाज आणि संस्कृती (१९८५), साहित्याची निर्मिती प्रक्रिया (१९८९), ललित गद्याचे तात्त्विक स्वरूप आणि मराठी लघुनिबंधाचा इतिहास(१९९५) आत्मचरित्रमीमांसा (१९९८), ग्रामसंस्कृती (२०००) आणि १९६० नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्यातील नवे प्रवाह (२००१) अशा अनेक ग्रंथांची नोंद घ्यावी लागेल. मातीतले मोती (निवडक ग्रामीण कथा, १९७०), निळे दिवस (प्रभाकर पाध्ये यांच्या कथा, १९७६), तिसऱ्या पिढीची ग्रामीण कथा (बाबा पाटील यांच्या सहकार्याने, १९८१), बाबुराव जगताप यांच्या आठवणी, माझ्या आठवणी आणि अनुभव (विठ्ठल रामजी शिंदे, १९९९), मराठी ग्रामीण कथा (सहकार्याने, २००२) हे त्यांचे संपादित ग्रंथही लक्षणीय ठरले आहेत. या व्यतिरिक्त महाराष्ट्र साहित्य पत्रिका आणि विचारभारती या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले आहे. संदर्भ : मराठी शब्दकोश , डाॅ. आनंद यादव साहित्य-संपदा. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
साधना साप्ताहिक ३ ऑगस्ट २०२४ ... अशोक राणे

सुनंदा अमरापूरकर यांनी त्यांचं `खुलभर दुधाची कहाणी` हे आत्मकथन पाठवलं तेव्हा `आता हे वाचायचं केव्हा` असा प्रश्न सर्वप्रथम मनाशी आला. देणेकरी दाराशी ठाण मांडून बसावेत तशी अनेक पुस्तकं, कोणी कोणी पाठवलेल्या त्यांच्या फिल्म्स आणि माझे सतराशे साठ व्याप सोर असताना कसा वेळ काढायचा? माझं सबंध आयुष्य सिनेमा, तो आकाराला आणणारे दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ, त्यांच्या निर्मितीमागच्या प्रेरणा आणि त्यांच्यातला माणूस याचा शोध घेण्यात गेलं. एका गोष्टीचं कुतूहल होतं आणि ते म्हणजे या सर्वांच्या पलीकडे असलेलं, परंतु क्वचितच कळलेलं असं त्यांच्या कुटुंबातल्याच व्यक्तीने वर्णिलेलं अमरापूरकरांचं चरित्र ! सगळी व्यवधानं बाजूला ठेवून सुनंदा अमरापूरकरांचं आत्मकथन वाचायला हे कुतूहल पुरलं. मनोगतातलं पहिलंच वाक्य आहे... `मी या आठवणी का लिहिल्या ?` ...आणि मला चट्‌कन थोर अभिजात अभिनेत्री इंग्रीड बर्गमन हिचं `माय स्टोरी` आठवलं. तिनेही अशीच सुरुवात केलीय. तिची मुलं म्हणाली, `तुझ्या आयुष्याविषयी कुणी तरी तिखटमीठ लावून काहीबाही लिहील, त्याआधी तूच सारं खरं मोकळेपणानं सांगून टाक. तिने जाडजूड ग्रंथात अभिनेत्री म्हणून तिचा सारा प्रवास कसलाही आडपडदा न ठेवता सविस्तर सांगितला. सुनंदाताईंचं पुस्तक आणि त्यातलं हे पहिलं वाक्य वाचताना मला हे का आठवावं? त्यांची पहिली ओळख म्हणजे नाट्य-चित्रसृष्टीतला एक मोठा अभिनेता, दिग्दर्शक सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी आणि अलीकडचा परिचय म्हणजे एक उत्तम अनुवादकर्त्या. तर आता त्या आपल्या प्रसिद्ध नवऱ्याविषयी काय आणि कसं सांगतात, त्याचबरोबर त्यांचं वैवाहिक सहजीवन, एकूणच त्यांचं कौटुंबिक जीवन कसं उलगडून दाखवतात याचं कुतूहल होतं. मुख्य म्हणजे त्यांची मध्यमवर्गीय पार्श्वभूमी आणि सदाशिव अमरापूरकरांना मुंबईत स्थैर्य लाभेपर्यंत नगरसारख्या छोटया शहरातला त्यांचा वावर यातून पुढला सारा अचंबित करणारा प्रवास त्या का मांडतात याचीही उत्सुकता मनात होतीच, अमरापूरकर कुटुंबाचा प्रवास हा केवळ नगर ते मुंबई नव्हता. एखाद्या नवख्या नटाने रंगमंचाच्या अंधाऱ्या अवकाशात प्रवेश करावा आणि अचानक त्याच्यावर सर्व अंगांनी प्रखर प्रकाशझोत यावा, त्याचे डोळे इतके दिपून जावेत की त्याला ते नीट उघडून सभोवताल पाहता येऊ नये असाच काहीसा अनुभव या कुटुंबाने घेतला आहे. प्रायोगिक वे व्यावसायिक रंगभूमी हे स्थित्यंतर तसं फार तर कनिष्ठ ते उच्च मध्यमवर्गीय याच काहीशा परिचित अवकाशातलं; परंतु हिंदी सिनेमातली प्रसिद्धी तर भिरभिरावून टाकणारी. ते अंगावर घेत, वागवत या कुटुंबाने कशी वाटचाल केली हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. एवढी प्रचंड प्रसिद्धी आणि वलय लाभूनही अमरापूरकर कधी फिल्मी झाले नाहीत हे वाटतं तितके सोपे नाही. `खुलभर दुधाची कहाणी यातून ते उलगडणार होते... वाचायला सुरुवात केल्यावर ते खूप तपशीलवार आणि पसरटही वाटलं. पण वाचत गेलो तसतसं लक्षात आलं की, सुनंदाताईंनी चितारलेला परिसर तप‌शिलातल्या काही फरकाने आपलाही आहे. आपणच प्रत्यक्ष जगलेले, पाहिलेल वाचतो आहोत. साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या आमच्या शाळकरी वयापासून वाचलेल्या साहित्यातून हेच सर्व पाहत आलोय. आपल्या मुलांच्या आणि नातवंडाच्या पिढीला तर हा काळ अवकाश सर्वस्वी अपरिचित. हे त्यांच्यासाठीही आहे. आजच्या नव्या पिढीला 2000 चा चित्रपट जुना वाटतो, तेव्हा त्याआधीच्या त्यांच्या आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या सिनेमाशी आपण जसा त्यांचा परिचय करून देतो तसंच आहे हे. शिवाय या कथनाच्या नायिकेने पुढे अपरिहार्य असं जे वळण गाठलं आहे, त्यासाठी हे आवश्यकच आहे. संथ लयीत सुरू झालेलं आणि काहीसं रेंगाळल्यासारखं वाटणारं गाणं उत्तरोत्तर हलक्याशा द्रुत लयीत समेवर यावं असं हे आत्मकथन आहे. तरीही पूर्वार्धावर थोडे अधिक संपादकीय संस्कार झाले असते, तर आवश्यक असणाऱ्या संथ लयीला रेंगाळावं लागलं नसतं. `प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते` या प्रसिद्ध उक्तीच्या पलीकडे इथे काहीतरी आहे. ही नायिका इथे केवळ एवढ्याच भूमिकेत नाही. ही भूमिका पार पाडताना तिने सर्व प्रकारे गांगरवून टाकणाऱ्या परिस्थितीतही स्वतःला जपलं, स्वतःमधल्या गुणांना जमेल तसं आणि तेवढं खतपाणी घालत जोपासलं आणि आपली म्हणून एक ओळख निर्माण केली. ज्या संपूर्णतः अकल्पित, अनपेक्षित जबाबदाऱ्या येऊन पडल्या, त्या लीलया पार पाडत तिने आपलं व्यक्तिमत्त्व जपलं. `मीच एकटीने सारं पहायचं` असा सतत तक्रारखोर धोशा लावत एखादी कर्कशा झाली असती; परंतु सुनंदाताईंचं तसं झालं नाही. म्हणून पुस्तक वाचून झाल्यावर फोनवर मी त्यांना एवढंच म्हणालो, `माउली, कुठून गं इतकी ऊर्जा आणलीस?` 1950 चं दशक, त्याआधीचा आणि नंतरचाही काळ तसा गरिबीचा आहे. समाजाच्या सर्व थरांत अभावग्रस्तता आहे. कसला अभाव आहे याचीही त्या काळ अवकाशाला जाण नाही. आहे ते गोड मानून घेत जगण्याचा हा काळ. या सामाजिक स्तराखाली असाहाय्यपणे जगणारा एक वर्ग आहे. त्याचीही वास्तपुस्त करण्याची गरज या वातावरणात आहे. परंतु सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे संस्कारक्षम घडण्याची, घडविण्याची, अभावग्रस्तता तिथे महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या या नायिकेला हे पर्यावरण लाभलं आहे. त्यांचे वडील मुलं लहान असतानाच गेले. नंतर घरही गेलं आणि मुलांना घेऊन आईला देवळात राहावं लागलं. आहे त्या परिस्थितीतून वाट काढावी या धारणेत सभोवतालच्या सुसंस्कृत वातावरणाचाही मोठा आधार होता. ते सारं मुळातून वाचण्यासारखं आहे. यात गरिबीतले दिवस, हलाखी, अभावग्रस्तता यांपेक्षा हे संस्कार सर्वांत महत्त्वाचे आहेत हे सहजपणे अधोरेखित केलेले आहे. वर ज्या ऊर्जेचा उल्लेख केलाय ती इथूनच सुनंदाताईंना मिळाली आणि म्हणूनच यशस्वी नवन्याच्या पाठीशी उभ्या राहताना त्या स्वतः सर्वप्रकारे यशस्वी ठरल्या आहेत. त्यांच्या आणि अमरापूरकरांच्या कथेला कुठून कुठे नेऊन ठेवणारं वळण शाळा-कॉलेजच्या वयातच आलं. नाटक ! अमरापूरकर म्हणजे नाटक आणि नाटक म्हणजे अमरापूरकर असं हे रसायन होतं. सुनंदाताईही नगरच्या त्या छोट्या नाट्यअवकाशात मनापासून वावरत होत्या. सोबत, साथ होती अमरापूरकरांची. परंतु हा माणूस स्वतःमधल्या रंगकर्मीत इतका खोलवर बुडालेला होता की, जिच्या तो प्रेमात पडलाय; तिलाही नाटकाची आवड आहे; नोंद घेण्याजोगे कलागुण आहेत, तिच्यातला कलावंत घडविण्यात मात्र त्याने रस दाखविला नाही. इतकंच नाही तर पुढे मुंबईत यश मिळविल्यानंतर, बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाल्यानंतरही सुनंदाताईंनी `यशस्वी पुरुषामागे...` ची सर्व प्रकारची भूमिका यशस्वीपणे पार पाडल्यानंतर जेव्हा ऑफिसच्या नाटकात काम करायचं ठरवलं, तेव्हा यांनी त्यास ठाम नकार दिला. इथे पुस्तकातला एक प्रसंग आठवतो. नगरमध्ये नाटकाची तालीम चालली होती. अमरापूरकर खूप सिगरेट्स ओढतात म्हणून पाकीट लपवून ठेवण्यात आलं होतं. पण जसजशी तलफ अनावर होत गेली, तसतसे ते अस्वस्थ होत गेले. नाटकावरून त्यांचं लक्ष उडत चाललं होत. तेव्हा सुनंदाताईनी आपल्या पर्समध्ये लपवून ठेवलेल्या पाकिटातून दोन सिगरेट्स आणून दिल्या. हीच लग्ना आधीची प्रेयसी नंतर पत्नी, गृहिणीच्या भूमिकेतही त्याला असंच सांभाळते. अमरापूरकरांची नाट्यवेडापायी अडलेली त्यांची पदवी या पद‌वीधारक मुलीशी लग्न ठरल्यानंतर ते पूर्ण करतात. इथे लग्न पार पडतं आणि हे भाऊ म्हणतात, `मला पुण्यात राहून एम.ए. करायच आहे. ही बाई हो ला हो करते. नववधू म्हणून तक्रार करत नाही. शिक्षण पूर्ण करून नोकरी करणारी ही मुलगी नोकरीधंदा न करणाऱ्या मुलाशी लग्न करते. तो काळ आणि लहान गाव हे लक्षात घेतलं, तर कदाचित कल्पना येईल की किती अवघड होतं ते. यांचं भांडवल काय तर पिढीजात वाडा आणि व्यवसाय. बरं त्या व्यवसायात तरी सहभाग तर तोही नाही. दिवसरात्र एकच ध्यास. एकच नाद... नाटक पुढे मिळणारे अमाप यश आणि वैभव यांची काही अंशी तरी शक्यता आणवली असेल, तर तसंही काही नव्हतं. आपलं मानलं आणि निभावलं. असेल तर एक विचार मनाशी असेल आधार द्यायला, याची कलानिष्ठा सोळा आपणे सच ! तिथे अन्य गोष्टीला थारा नाही. ते मात्र खरंच होतं. अमरापूरकरांमधला अस्वस्थ रंगकर्मी त्यांना कायमचा मुंबईत घेऊन आला आणि मग सर्वाच्या वाट्याला येतो तसा स्ट्रगल करत ते आधी व्यावसायिक रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक म्हणून यशस्वी होता होता अनपेक्षितपणे सिनेमात जाऊन पोहोचले आणि `अर्धसत्य` नंतर रेस्ट इज द हिस्टरी असा पुढला प्रवास घडला. या आत्मकथनात तो तपशीलवार वाचायला मिळेलच. परंतु त्यात महत्त्वाचं आहे ते भाड्याच्या घरात पितळी स्टोव्ह आणून मुंबईतल्या संसाराला केलेली सुरुवात ते नंतर ऑडीसारख्या महागड्या परदेशी गाड्यांपर्यंत झालेला प्रवास... आणि त्याहीपेक्षा हे घबाड सहजपणे घेणं, हाताळणं, स्वतः सुनंदाताईंनी, अमरापूरकरांनी आणि त्यांच्या तीन मुलींनीही. एकीकडे हे वैभव आणि दुसरीकडे मध्यमवर्गीय साध्या राहणीचे संस्कार ! दस्तुरखुद्द अमरापूरकर तसेच होते, परंतु त्यांच्या प्रचंड बिझी शेड्यूलमध्ये घरच्या आघाडीवर निगुतीने सांभाळलं, निभावून नेलं ते सुनंदाताईंनी. बरं हे करता करता आपली नोकरीही सांभाळली. मुलींची शाळा- कॉलेज, त्यांची जडणघडण, इतर साऱ्या सांसारिक बाबी, अमरापूरकरांच्या वाढत्या उत्पन्नाचं व्यवस्थापन, त्यासाठी नेमावयाचा चार्टर्ड अकाउंटंट वगैरे. आणि हे सारं करताना जे जग कालपरवापर्यंत आपल्यापासून दूर होतं तिथे सहज शिरकाव करण्याची, तिथल्या स्टार मंडळींमध्ये बावरण्याची संधी असताना ते स्वतःहून दूर ठेवणं, आपल्या मुलींनाही त्याचं आकर्षण वाटणार नाही याची काळजी घेणं हे अवघड काम या माउलीने सहज केलंय. अशीच कमाल त्यांनी केली ती त्यांच्या आई, सासू- सासरे आणि अमरापूरकरांच्या घरातच असलेल्या आत्याबाई ताई यांच्या व्यक्तिरेखा, त्यांच्याशी असलेलं नातं आणि रोजचा संबंध यांविषयी लिहिताना. त्यातून त्या वेळचा काळ अवकाश आणि बदलता कौटुंबिक सामाजिक - पोतही सहजपणे दिसून येतो. सासरे म्हणजे घरातला अखेरचा शब्द हे मनाशी कायम मानलेलं. स्वीकारलेलं. परंतु एक वेळ अशी येते की, मागल्या पिढीतलं कुणी दुखावलं तरी त्याची क्षिती न बाळगता, नव्या पिढीला आपली वाट काढावी लागते. कारण तिच्या काळ - अवकाशाचा तो रेटा आहे. तो मागल्या पिढीला कळणे शक्य नाही. स्वतःचा विचार करण्याची ही प्रेरणा खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरते. आणखी एक नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, स्वतंत्रपणे स्वतःचं आयुष्य घडवणारी तरुण मुलगी कट्टर पुरुषसत्ताक सासरी जाते, तेव्हा तो विरोधाभास पेलणं किती अवघड असतं याचंही उदाहरण इथे प्रस्तुत होतं. या दरम्यान वेगळा विचार करणारा, सर्वांना समजून घेणारा संवेदनशील नवराही मधूनच नवरेपणा गाजवतो, पण अशा वेळी `आम्ही यांच्यासाठी एवढं करतो ,पण आमच्याबद्दल काही वाटत नाही` असा तक्रारखोर विचार दूर सारत आपलं काम करत राहणं यासाठी साधनाच लागली असेल. `स्वतःची समजूत घातली यापेक्षा `परिस्थिती नीट समजून घेतली` हा मा हा मार्ग पत्करला की सोपं होतं. मन शांत होतं. कडवटपणा तर कणभर राहात नाही. सर्जनशीलता आणि मनाचा प्रसन्नपणा ताजा टवटवीत राहतो. आणि मग आपल्याला जे करावंस वाटते ते करता येतं. त्याचं व्यवस्थापन सुचतं, जस सुनंदाताईंना त्यांच्या अनुवादाच्या कामाच्या नियोजनात सुचलं. घर आणि एकूणच कुटुंबाचे सर्व करताना त्यांना त्यांच्या लेखनासाठी वेळच काढता येईना, तेव्हा पहाटे लवकर उठून त्यांनी निवांत दोन तास काढले आणि आपलं काम केलं. एवढंच नव्हे तर कॉलेज, अभ्यास हे चाळीसेक वर्षे मागे पडल्यानंतर पुन्हा त्या मुंबई विद्यापीठात हजर झाल्या आणि मायथोलॉजीवरच्या एक वर्षाच्या घनघोर अभ्यासक्रमात स्वतःला झोकून दिलं आणि त्यात उत्तम गुण मिळवून पासही झाल्या. वयाच्या या टप्प्यावर घरगुती जबाबदाऱ्यांत, लेकींच्या बाळंतपणाचीही एकीचं तिकडे अमेरिकेत भर पडली. आरंभी मी म्हटले तस `कुठून आणते ही ऊर्जा ही माउली...!` असं करता करता आता कुठे स्वतः साठी वेळ मिळतोय असं वाटेवाटेपर्यंत अमरापूरकरांचं शेवट गाठणारं आजारपण सुरू होतं. आता पुन्हा नव्याने सारं नियोजन, आता दिवसाचा प्रत्येक क्षण त्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत राहण्यासाठी. अमरापूरकरांची कामं कमी होत चालली होती. जिथून आयुष्याची सुरुवात केली, तिथे जाऊन तिथल्या घरात दोघांनी पुढली वर्ष काढायची असं ठरवता ठरवता तोच सारा वेळ मुंबईत हॉस्पिटलमध्ये काढावा लागला. नगरला पोहोचला तो अमरापूरकरांचा निष्प्राण देह... `खुलभर दुधाची कहाणी` ही एका समजदार आणि कर्तृत्ववान स्त्रीची कहाणी आहे. त्या कहाणीतून मला जाणवलेलं तिचं व्यक्तिमत्त्व अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. सुनंदा अमरापूरकर यांना सलाम! ...Read more

JAMILCHYA SAHASKATHA
JAMILCHYA SAHASKATHA by MOHAMMED UMAR Rating Star
Pradnya Aher

Very interesting story especially for children and youngsters too. Translated well. If you take your children back to books from mobile. These kinds of books are must read