* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184989144
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE FICTION
  • Available in Combos :DR.SANJAY DHOLE COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DR.SANJAY DHOLE, WITH HIS MINDBLOWING SCIENTIFIC STORIES , HAVE BEEN SUCCESSFUL IN MAKING THE SECTION OF MARATHI STORIES MORE WIDE AND PROMINENT. THE STORIES IN THIS BOOK ARE TOTALLY BASED ON SCIENCE AND THE AUTHOR HAS HONESTLY TRIED TO CONVEY THE IMPORTANCE OF MODERN SCIENCE TO EVERYONE OUT THERE.ALONG WITH THE SPACE SCIENCE, RAYS, PHYSICS, NUCLEAR SCIENCE,”PADARTHA VIDNYAN” BOTANY ARE THE SUBJECTS INCLUDED IN THIS STORIES. “PRATISHODH” A BREATHTAKING STORY DESCRIBES THE HORRIFYING CIRCUMSTANCES OF ENERGY CONSUMPTION AND SAVING IN THE NEAR FUTURE. “ANTARALATIL MRUTYU” , “PRATIGHATNA” , “ADBHUT PRAWAS” ARE THE STORIES OF FINDING THE SISTER OF EARTH AND ANALYZING LIFE THERE. “PRAGALBHA” DESCRIBES HOW THE EMOTIONAL SIDE OF A MAN PUTS A HUMAN BRAIN FUNCTIONING IN A ROBOT AND ANALYZES THE TRUTH, ARE THE SCIENTESTS PROVING TO BE A CURSE TO HUMAN KIND ?? BESIDES, EVEN A HUMAN BEING COULD PROVE TO BE A POWERFUL WEAPON , DESCRIBES “AAWISHKAR”. NEGATIVE APPROACH OF A SCIENTIST CAN PROVE FAR MORE HAZARADOUS TO NATURE, NARRATES “ANDHARATIL TIR”
अंतराळ शास्त्रासोबत किरण, भौतिकशास्त्र, अणुशास्त्र, पदार्थविज्ञान तसेच वनस्पती शास्त्रांसारखे विषय या कथांमध्ये हाताळले आहेत. ‘प्रतिशोध’ ही कथा एका थरारक अनुभवातून भविष्यात बिकट होणाऱ्या ऊर्जेचा प्रश्न सोडविणारी आहे. तर ‘अंतराळातील मृत्यू’, ‘प्रतिघटना’, ‘अद्भुत प्रवास’ ह्या कथा कृष्णविवराच्या माध्यमातून प्रति पृथ्वीचा व समांतर विश्वाच्या शोधाच्या कथा आहेत. ‘प्रगाढ’ ही कथा किरण शास्त्रावर आधारित असून त्यातील शास्त्रज्ञ सुडापोटी विघातक प्रयोग करतो आणि समाजापुढे प्रश्न निर्माण करतो. ‘प्रगल्भ’ ही कथा भावनेच्या भरात यंत्रमानवाला जैविक मेंदूचा दर्जा मिळून देताना, शास्त्रज्ञ भविष्यात मानवापुढे भयंकर प्रश्न निर्माण करत नाही ना? याची दखल घेते. शिवाय मानवसुध्दा जैविक अस्त्र म्हणून पुढे येऊ शकतो हे ‘आविष्कार’ या कथेत प्रकर्षाने जाणवते. ‘अंधारातील तीर’ ही कथा मात्र शास्त्रज्ञाचा नकारात्मक दृष्टिकोन निसर्गालाच कसे वेठीस धरू शकतो याची जाणीव करून देते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ANTARALATILMRUTYU #ANTARALATILMRUTYU #अंतराळातीलमृत्यू #SCIENCEFICTION #MARATHI #DR.SANJAYDHOLE #डॉ.संजय ढोले "
Customer Reviews
  • Rating StarTushar Kute

    पुणे विद्यापीठात कार्यरत असणारे डॉ. संजय ढोले यांचे मेहता पब्लिशिंग हाऊसने ५-६ विज्ञान कथासंग्रह प्रकाशित केले आहेत. त्यातीलच `अंतराळातील मृत्यू` हा एक होय. त्यांच्या डिंभक व अश्मजीव या दोन पुस्तकानंतर वाचलेला हा तिसरा कथासंग्रह होय. त्यांच्या प्त्येक पुस्तकात लेखक म्हणून त्यांची संशोधक वृत्ती सातत्याने जाणवते. प्रत्येक कथेत मुलविज्ञान अर्थात जीव, भौतिक व रासायन यांचा प्रामुख्याने प्रभाव असतो. विशेष म्हणजे त्या विज्ञान संकल्पनांनी ओतप्रोत भरलेल्या असतात. विज्ञान कशा प्रकारे काम करू शकते? या प्रश्नाचे उत्तर ते आपल्या कथांमधून देत राहतात. हे सर्व कल्पनाविलास असले तरी अशक्यतेचा पल्ला कदाचित गाठू शकणार नाही असेच आहेत. प्रयोग, संशोधन व शास्त्रज्ञ/प्राध्यापक हे त्यांच्या प्रत्येक कथेत येणारे शब्द. अर्थात त्याची प्रत्येक कथा ही एका प्रयोगात सारखीच असते. तिच्यात विज्ञानाच्या मूल गाभ्याचा प्रकर्षाने समावेश असतो. जयंत नारळीकर, निरंजन घाटे व बाळ फोंडके यांच्या पेक्षा वेगळ्या कथा डॉ. ढोले लिहितात. हे मला प्रामुख्याने सांगावेसे वाटते. त्यांच्या सर्वच कथासंग्रहांमध्ये त्यांची शैली व विज्ञान हे समान धागे आहेत. त्यामुळे मुल विज्ञानाची आवड असणाऱ्यांनी त्यांचे कथासंग्रह निश्चितच वाचावेत. http://www.tusharkute ...Read more

  • Rating StarDainik Divya Marathi 13-1-17

    अंतराळशास्त्रासाेबत किरण, भाैतिकशास्त्र, अणूशास्त्र, पदार्थविज्ञान तसेच वनस्पतीशास्त्रासारखे विषय `अंतराळातील मृत्यू` या कथासंग्रहात डाॅ. संजय ढाेले यांनी अत्यंत राेमांचक पद्धतीने रेखाटल्या अाहेत. यातील प्रतिशाेध ही कथा एखाद्या थरारक अनुभवातून भविष्यत बिकट हाेणाऱ्या ऊर्जेचा प्रश्न साेडविणारी अाहे. तर अंतराळातील मृत्यू, प्रतिघटना, अद‌्भुत प्रवास या कथा कृष्णविवराच्या माध्यमातून प्रतिपृथ्वीचा समांतर विश्वाच्या शाेधाच्या कथा अाहेत. `प्रगाढ` ही कथा किरणशास्त्रावर अाधारित असून, त्यातील शास्त्रज्ञ सुडापाेटी विघातक प्रयाेग करताे अाणि समाजापुढे प्रश्न निर्माण करताे. `प्रगल्भ` ही कथा भावनेच्या भरात यंत्रमानवाला जैविक मेंदूचा दर्जा मिळवून देतात, शास्त्रज्ञ भविष्यात मानवापुढे भयंकर प्रश्न निर्माण करत नाही ना त्याची दखल घेते. शिवाय मानवसुद्धा जैविक अस्त्र म्हणून पुढे येऊ शकताे. हे `अविष्का` या कथेतून प्रकर्षाने जाणवते. `अंधारातील तीर` ही कथा मात्र शास्त्रज्ञाचा नकारात्मक दृष्टिकाेन निसर्गालाच कसे वेठीस धरू शकताे, याची जाणीव करून देते. अशा वेगवेगळ्या कथालेखकाने कुतुहलता वाढवणाऱ्या लिहिलेल्या अाहेत. लेखक हे ग्रामीण भागातून अाणि सामान्यस्तरातून असल्यामुळे त्यांच्या कथालेखनात या जनजीवनाचे स्वाभाविक प्रतिबिंब पडले अाहे. त्यांच्या कथेचा परिसर, कथेतील वातावरण, कथेतील व्यक्तिरेखा चारचाैघांसारख्याच वाटतात. कथेतील व्यक्तिरेखा जिज्ञासू अाणि हुशार असल्या तरी त्यांची पाळंमुळं ही सामान्य वाचकाला अापल्याजवळची वाटतात. कथेची मांडणी करताना बऱ्याचदा, तिचा पाया हा सामान्य माणसाच्या जीवनातील घटनांवर अाधारित असल्याचे दिसते. त्यामुळे कथेतील घटना त्याचा विकास हा सामान्य माणसाला परिचयाचा वाटताे. वास्तव अाणि कल्पना याचे अद‌्भुत मिश्रण या कथेमध्ये अाढळते. खरेतर विज्ञानकथा लिहिणे ही जाेखीम अाहे. विज्ञान लेखकाला त्यासाठी कसरत करावी लागते. म्हणजे कथेत विज्ञान किती असावे याचे भान लेखकाला असावे लागते. ते येथे दिसून येते. यातील कथानायक अांतरराष्ट्रीय स्तरावर वावरतात. सेमिनारमध्ये अापले संशाेधन सादर करतात. या कथासंग्रहातील कथा वाचकाला खिळवून ठेवतात. विषयाचे वैविध्य, उत्कंठावर्धक प्रसंग अाणि लेखकाचे उत्तम सामाजिक भान यातून दिसून येते. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 3-1-2016

    अंतराळा शास्त्रासोबत किरण, भौतिकशास्त्र, अणूशास्त्र, पदार्थविज्ञान तसेच वनस्पती शास्त्रासारखे विषय या कथांमध्ये हाताळले आहेत. ‘प्रतिशोध’ ही कथा एका थरारक अनुभवातून भविष्यात बिकट होणाऱ्या ऊर्जेचा प्रश्न सोडविणारी आहे. तर ‘अंतराळातील मृत्यू’, प्रतघटना, अद्भुत प्रवास या कथा कृष्णविवराच्या माध्यमातून प्रतिपृथ्वीचा आणि समांतर विश्वाच्या शोधाच्या कथा आहेत. प्रगाढ ही कथा किरणशास्त्रावर आधारित असून त्यातील शास्त्रज्ञ सुडापोटी विघातक प्रयोग करतो आणि समाजापुढे प्रश्न निर्माण करतो. प्रगल्भ ही कथा भावनेच्या भरात यंत्रमानवाला जैविक मेंदुचा दर्जा मिळवून देताना, शास्त्रज्ञ भविष्यात मानवापुढे भयंकर प्रश्न निर्माण करत नाही ना, याची दखल घेते. शिवाय मानवसुद्धा जैविक अस्त्र म्हणून पुढे येऊ शकतो. हे अविष्कार या कथेत प्रकर्षाने जाणवते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more