* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ANTARIKASHACHA VEDH
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666274
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 204
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"SCIENCE IS AN ONGOING PROCESS. IT NEVER ENDS." DR. CARL SAGAM. MAN STARTED HIS JOURNEY IN THIS WORLD, HE EXPLORED SEAS, MOUNTAINS, OCEANS, LANDFORMS, HE EXPLORED EVERYTHING THAT HE CAME ACROSS. HE WAS EAGER TO FIND OUT THE SECRET OF THIS UNIVERSE, THE UNIVERSE WAS CALLING HIM. VERY SLOWLY, BUT FIRMLY, HE LANDED IN IT, THAT WAS THE TIME WHEN HE COULD HEAR THE SOFT CALL FROM THE PAST, FROM THE HISTORY. DURING HIS EXPEDITION, HE FOUND A TRUE FRIEND, A FRIEND WHO WOULD NOT LEAVE HIS SIDE UNDER ANY CIRCUMSTANCES, A FRIEND WHO WOULD ACCOMPANY HIM ON ANY DANGEROUS VOYAGE, A FRIEND WHO WOULD NOT HESITATE TO IDENTIFY THE TRUTH APART FROM THE FALSITY, A FRIEND WHO WOULD SEE BEYOND CASTE, RELIGION, LANGUAGE, NATION, RIGHTS, FELICITATIONS, POWER. A TRUE BELIEVER OF TRUTH. THIS FRIEND HELD THE HANDS OF MAN AND MADE HIM WALK ON THE PATH OF TRUTH, MARCHING FORWARD TOWARDS THE SPACE. THIS FRIEND WAS SCIENCE. AS WE KNOW, THE SPACE IS BOUNDLESS AND SO IS THE SCIENCE. THERE ARE NO LIMITS TO BOTH OF THESE. THE MORE WE TRY TO UNDERSTAND THEM, THE LESS WE COME TO KNOW THEM. THE MORE CLOSE WE ARE TO THEM, THE MORE DEAR THEY ARE TO US. TODAY, WHEN WE ARE EXPLORING THE SPACE MORE AND MORE, OUR FRIEND, THE SCIENCE IS CONTINUOUSLY WITH US, NOT EVEN FOR A SINGLE MOMENT IT HAS REMAINED ALOOF. THROUGH EXPLORING THE SPACE, MAN IS GETTING CLOSER TO KNOW HIMSELF. THIS BOOK IS AN HONEST ATTEMPT TO DESCRIBE THE JOURNEY AND MEASURES OF HAPPINESS DURING IT.
या विश्वाच्या अथांग सागराच्या किनाNयावर आपल्या पाऊलखुणा उमटवत माणसाने आपला प्रवास सुरू केला अन् त्याच प्रवासात त्याला ह्या विश्वाचे रहस्य खुणावू लागले.... विश्वसागराची गाज बोलवू लागली. आपल्या पाऊलखुणांचा मागोवा घेण्यासाठी त्याने ह्या सागरात आपले पाय हळूच भिजवले, तेव्हा त्याला त्याच्या गतकाळाची, इतिहासाची साद ऐवूÂ आली. ही साद ऐकत असताना त्याने जो प्रवास सुरू केला, त्यात त्याला एक साथीदार गवसला... मित्र मिळाला... हा मित्र कसा आहे? मित्र जसा असावा तसा आहे! खNयाला खरे म्हणणारा अन् खोट्याला खोटे! धर्म, जातपात, भाषा, राष्ट्र, अधिकार, मान-सन्मान, स्थान ह्या कशाकशाचीही पर्वा न करणारा, केवळ सत्य तेच सांगणारा अन् सांगता सांगता, माणसाच्या बोटाला धरून पुढे नेणारा...
स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार २००६
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ANTARIKASHACHAVEDH #ANTARIKASHACHAVEDH #अंतरिक्षाचावेध #SCIENCE #MARATHI #SUDHARISBUD #सुधारिसबुड "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK PRABHAT 02-07-2006

    भारतीय संशोधकांच्या चष्मातून अंतरिक्षाचा वेध... अंतरिक्षाचा वेध ‘हे पुस्तक म्हणजे डॉ. कार्ल सॅगन यांच्या ‘कॉसमॉस’ या पुस्तकाचा सुधा रिसबुड यांनी करून दिलेला परिचय आहे. विज्ञानावर आधारित साहित्य सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोचवण्यात डॉ. सॅगन हे एक यशस्व लेखक मानले जातात. त्यांच्या ‘द ड्रॅगन ऑफ एडन’ या पुस्तकाला ‘पुलित्झर’ हा अमेरिकन साहित्यातल सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार मिळाला आहे. व्हायेजर यानामध्ये जी कालकुपी ठेवण्यात आली, त्या कुपीतील माहिती तयार करण्यात डॉ. कार्ल सॅगन यांचे योगदान मोलाचे होते. शुक्रावरील ‘ग्रीन हाऊस’ परिणाम, मंगळावरील वादळे, टायटन भोवतालचे ढग, जिवाची उत्पत्ती, असे अनेक विषय डॉ. सॅगन यांच्या संशोधनामुळे समजण्यास साहाय्य झाले आहे. अंतराळ संशोधनातील ते पहिल्या प्रतीचे शास्त्रज्ञ मानले जातात. अणुयुद्ध झाले तर मागाहून उद्भवणारा आण्विक हिवाळा यावर त्यांनी संशोधन केले आहे. त्यांचे ‘कॉसमॉस’ हे पुस्तक अतिशय माहितीपूर्ण तसेच रंजक आहे. अतिशास्त्रीय माहिती त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केला आहे. अशा या गाजलेल्या पुस्तकाचा परिचय सौ. रिसबुडांनी केलेला आहे. पण हा केवळ ‘कॉसमॉस’चा परिचय नाही तर भारतीय शास्त्रज्ञाने या विषयाचे योगदानही नमूद केलेले आहे. त्यामुळे भारतीय शास्त्रज्ञांबद्दलचा आपला अभिमान दुणावतो. उदाहरणार्थ, आधुनिक ज्योतिषविद्येचा जनक टोलेमी समजला जात असला तरी लगाध यांनी भारतीय खगोलशास्त्राचा पाया घातला. ते वेदांत ज्योतिषांचे मूळ लेखक म्हटले पाहिजे, असे सौ. रिसबुडांनी नमूद केले आहे. (पृ.२७) त्याचप्रमाणे वैदिक काळातील प्रमुख खगोल निरीक्षक म्हणून विश्वामित्राचा उल्लेख करावा लागेल. गुरू या ग्रहाला ओळखण्याचे श्रेय. वामदेवांकडे जाते; तर शुक्र ग्रहाला शोधण्याचे श्रेय भृगूंचा मुलगा वेनभार्गव याला दिले जाते. पाश्चात्त्य संशोधकांनी निकोलस कोपर्निकस (‘ग्रहांची गती’ संबंधीचा सिद्धांत इ.स. १५४३) केप्लेर (हामर्नीज ऑफ द वल्र्ड - ग्रहांच्या परिभ्रमणातील सुसंगती संबंधीचे संशोधन) न्यूटन (गतीसंबंधीचे नियम) यांच्या संशोधनाचाही थोडक्यात उल्लेख केलेला आहे. सूर्याचे सामर्थ मानवी अनुभवापलीकडे आहे. ज्ञानेश्वरांनी ते जाणले होते. एका ओवीत ते म्हणतात – अगा सूर्योदये जालिया । सूर्ये सूर्येचि पाहावा धनंजया । तेवि माते तिया जाणावया मीचि हेतू ।। (अर्थ - हे धनंजया, सूर्य उगवल्यावर सूर्याच्या तेजानेच सूर्य पहावा लागतो, त्याचप्रमाणे मला जाणण्याच मीच कारण आहे.) म्हणजे पाश्चात्त्यांचे संशोधन वाचकांपुढे मांडताना भारतीय संशोधक, संत, विचारवंत, परंपरा, बुद्धिमत्ता यांचे दाखले सौ. रिसबुडांनी दिल्याने पुस्तकाची खुमारी वाढली आहे. त्यांनी ‘कॉसमॉस’चे शब्दश: भाषांतर दिले असते तर ते सामान्य वाचकाला कळले नसते व विवेचन कंटाळवाणेही झाले असते. आणखी एक उदाहरण देतो. अनंताची कल्पना भारतीय तत्त्वज्ञांना फार प्राचीन काळापासून ज्ञात होती. ‘अनंत’ म्हणजे काय, याचे नेमके वर्णन भास्काराचार्य (दुसरे) यांनी अचूक मांडले आहे. (इ.स. ११५० च्या सुमारास) ‘खहर राशी म्हणजे अनंत’ असे ते म्हणतात. अस्मिन्विकार: खहरेण राशावपि प्रविष्टेष्वपि नि:सृतेषु । बहुष्वपि स्यल्लयसृष्टी काले ऽ नन्तेऽच्युते भूतगणेषु यद्वत् ।। (ज्याप्रमाणे सृष्टी व्युपत्ती आणि प्रलय काळाच्या समयी, अनंतजीव ब्रह्मातून येतात आणि जातात; परंतु तो (ब्रह्म) मात्र अनंतच राहतो. त्याचप्रमाणे अनंत ही संख्या आहे, त्यात काही वाढवले आणि कमी केले तरी फरक पडत नाही.) सौ. रिसबुडांची शैली कशी ओघवती आहे. याचा नमुना द्यावासा वाटतो. ‘ग्रह-ताऱ्यांचे जीवन’ (पृ. १३२-१४८), या प्रकरणात त्या म्हणतात, ‘नुकतेच जन्मलेले विश्व काही काळ प्रकाशाने व्यापले गेले होते; परंतु काळाच्या ओघात ते निवळले आणि दृश्य प्रकाशाच्या दृष्टीने ते अंधारमय झाले होते. स्थलरूपी धागे, कापड ताणले गेले. नूतन अवस्थेतील विश्वात हायड्रोजन व हेलियम हे दोन्ही वायू अस्तित्वात आले होते. बघण्याजोगे असे त्या विश्वात काहीच नव्हते. (बघायला तरी कुणी होते का?) कालांतराने विश्वाच्या पोकळीत वायूचे मेघ जमा झाले. ते वाढू लागले. त्यानंतर तारे, ग्रह, आकाशगंगा, दीर्घिका निर्माण झाल्या. या पुस्तकात (१) विश्वसागराचा किनारा (२) अंतरिक्षाचा वेध (३) पृथ्वीवरील उत्क्रांतीची वाटचाल (४) खगोलशास्त्राचे शिल्पकार (५) सूर्याची ग्रहमाला (६) मंगळाचे अंतरंग (७) गुरू व शनिकडे झेप (८) युरेनस व नेपच्यूनच्या दिशेने (९) झेप ताऱ्यांकडे (१०) स्थलकालातील प्रवास (११) ग्रह-ताऱ्यांचे जीवन (१२) सीमोल्लंघन (१३) उत्क्रांत मानव आणि देवमासा (१४) अनंत आमची ध्येयासक्ती (१५) विश्वाचे आर्त. अशी एकूण पंधरा प्रकरणे आहेत. त्यापैकी ‘सूर्याची ग्रहमाला’ व ‘मंगळाचे अंतरंग’ ही दोन प्रकरणे अनुक्रमे २४ व २३ पृष्ठांची आहेत. अन्य प्रकरणे साधारणपणे १०-१५ पृष्ठांची आहेत. शास्त्रज्ञांची विधाने स्पष्ट करण्यासाठी आवश्यक तेथे आकृत्या, शुक्र, मंगळ, सूर्य व आकाशगंगा यांची छायाचित्रे यामुळे या पुस्तकाची मनोरंजकता वाढली आहे. डॉ. कार्ल सॅगन व अन्य काही शास्त्रज्ञानांची छायाचित्रे दिली असती तर अधिक बरे झाले असते. तळटीपा व परिशिष्टे यामुळे या पुस्तकाला मौलिकता प्राप्त झाली आहे. काही ठिकाणी गोष्टीरूप विवेचन तर काही ठिकाणी काव्यपंक्तींचा दाखला यामुळे सर्वसामान्यांची ‘विज्ञान जिज्ञासा’ निश्चित वाढीस लागेल. -सतीश पोरे ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 22-05-2006

    वेध गच्चीवरच्या आकाशाचा… भारताने अवकाश युगात प्रवेश केल्याला बराच काळ लागला असला तरी त्याला आत्ता कुठे जागतिक मान्यता मिळू लागली आहे. २००८च्या भारतीय चांद्रयान मोहिमेत खुद्द अमेरिकेने सामील होऊन भारताच्या अवकाश तंत्रज्ञानाला सलामी दिली आहे. या पारश्वभूमीवर समाजात निव्वळ विज्ञाननिष्ठा रुजणंच आवश्यक नाही तर विज्ञानाच्या विविध अंगाउपांगाविषयी औत्स्युक्य निर्माण होणंही आवश्यक आहे. यासाठी शाळांतून प्राथामिक शिक्षणाची पातळीवरून जसे प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे तशीच प्रसार माध्यमं, ग्रंथमाध्यम यातूनही प्रसार होण्याची आवश्यकता आहे. भारतातल्या ग्रंथनिर्मितीत विज्ञानविषयक ग्रंथांना महत्त्वाचं स्थान आहे. मराठीतही असे प्रयत्न जाणीवपूर्वक होताना दिसतात. विज्ञानकथा, विज्ञानाच्या विविध शाखांची ढोबळ आणि विस्तृत चर्चा करणारी, माहिती देणारी पुस्तकं मराठीत नित्यनेमाने प्रसिद्ध होत असतात आणि ती खपतही असतात. विज्ञान शाखांतही खगोलशास्त्राचं मराठी वाचकांना विशेष आकर्षण वाटतं. हा विषय मराठीजनांमध्ये लोकप्रिय करण्याचं श्रेय जयंत नारळीकरांना द्यावं लागेल. त्यांनी ललित लिखाणातून हा विषय मराठी लोकांपर्यंत पोहोचवल्यानंतर त्याची शास्त्रीय माहिती देण्याचं काम या क्षेत्रातल्या अन्य जाणकरांनी व तज्ज्ञांनी घेतली आहे. अलिकडेच प्रसिद्ध झालेली खगोलशास्त्रविषयक तीन पुस्तकं ही जबाबदारी योग्य रितीने पार पाडतात. ‘तारकांच्या विश्वात’ (पराग अळवणी), ‘अंतरिक्षाचा वेध’ (सुधा रिसबुड) आणि ‘कथारुपी खगोलशास्त्र’ (लीना दामले) ही ती तीन पुस्तकं आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवरच्या विद्यार्थ्याना खगोलशास्त्राविषयी जे कुतूहल वाटतं किंवा त्याबाबत त्यांना जे प्रश्न पडतात, शंका असतात त्यांचं समाधान करण्यास ही पुस्तकं समर्थ आहेत. ‘तारकांच्या विश्वात’ हे पुस्तक रात्री अंगणात झोपल्यावर दिसणाऱ्या चमचमणाऱ्या आकाशाविषयी मनात निर्माण होणाऱ्या हजोर प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न करतं. आकाशाचं निरीक्षण कसं करावं, कुठल्या दिशेला कुठला तारा, ग्रह केव्हा असतो, तो कसा ओळखावा, ताऱ्यांचे प्रकार किती, त्यांचं वर्गिकरण, नाव आदी विस्तृत माहिती नकाशा व चित्रासह या पुस्तकात देण्यात आली आहे. पुस्तकात प्रत्येक ताराकापुंजाचा पानभर आकाराचा नकाशा, त्यांची माहिती त्याच्याविषयी कथा आदी सर्व माहिती देण्यात आली आहे. ज्यांना आकाश निरीक्षणाची हौस आहे त्याच्या हाती कायम असावं असं हे पुस्तक आहे. एकदा ग्रह-ताऱ्यांची ओळख पटली की मन त्यांच्याजवळच थांबत नाही. त्यांच्या पलिकडेही या अवकाशात काय आहे, याचा शोध ते घेऊ लागतं. या विशाल अवकाशाची व्याप्ती किती, त्याच्या पोकळीत ग्रह-ताऱ्यांखेरीज आणखी काय दडलं आहे, आणखी सौरमाला आहेत का, अन्य ग्रहांवर जीवसृष्टी आहे का, आपल्या सौरमालेतले ग्रह कसे आहेत, डोळ्यासमोर दिसणाऱ्या ताऱ्याचा प्रकाश किती अब्ज वर्षांपूर्वी निघाला आहे. उल्का, युफो हे काय आहेत. गॅलॅक्सी म्हणजे काय, धूमकेतूचं रहस्य काय, ब्लॅक होल म्हणजे काय, या विश्वाची रचना कशी झाली आहे असे ग्रह-तारकांसारखे असंख्य प्रश्न आपल्याला पडतात. या प्रश्नांची उत्तर ‘अंतरिक्षाचा वेध’ या पुस्तकातून बऱ्याच प्रमाणात मिळतात. सुधा रिसबूड यांनी गोष्टीवेल्हाळपणे ही सर्व माहिती दिली आहे. हि दोन्ही पुस्तकं काहींना शास्त्रीय किंवा जड वाटत असतील तर हाच विषय अधिक सोप्या आणि पटकन समजेल अशा भाषेत म्हणजे गोष्टीरुपाने लीना दामले यांनी ‘कथारूपी खगोलशास्त्र’ या पुस्तकात मांडला आहे. आकाशातली नक्षत्रं, राशी, तारकासमूह, यांच्याबद्दलची माहिती लेखिकेने कथा व संवादाच्या माध्यमातून सांगितली आहे. त्यामुळे हे पुस्तक बोजड वाटत नाही. विशेषत: शाळकरी मुलांना ते वाचायला आवडेल व या विषयाची त्यांच्यात रुचीही निर्माण करेल. या पुस्तकातही नकाशे व चित्रं दिली असल्यामुळे विषय समजायला मदत होते. या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलींनी ही तिन्ही पुस्तकं वाचली तर त्यांचा वेळ मजेत जाईलच पण खगोलशास्त्राविषयीचं त्यांचं कुतूहलही वाढेल आणि अधिक माहिती मिळवायची ओढ लागेल. मेहता पब्लिशिंग हाऊसने या तिन्ही पुस्तकांची निर्मिती अत्यंत उत्कष्टपणे केली आहे. -दिवाकर देशपांडे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more