* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BABULMORA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662634
  • Edition : 5
  • Publishing Year : 1991
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 208
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS AGAIN A COLLECTION OF SHORT STORIES. WHAT IS HISTORY? IT IS THE CHAIN OF SUCH EVENTS IN THE PAST WHICH ARE DEEPLY ENGRAVED ON OUR MINDS. OFTEN, SOME MOMENTS, SOME INCIDENCES ARE IMPRINTED ON OUR MIND AND VERY FEW OF SUCH INCIDENCES HAVE THE STRENGTH TO REMIND US OF THE SORROW, OF THE IMMENSE PAIN. THIS COLLECTION IS OF SUCH TENDER MOMENTS, OF THOSE MEMORIES WHICH WE THINK WE HAVE FORGETTEN, BUT NOW WHEN REVEALED STILL POSSESS THE SAME VIGOUR TO TOUCH US; UNMISTAKABLY BY RANJIT DESAI, A WRITER WITH MUCH UNDERSTANDING OF THE WORDS AND THE LITERATURE.
जे घडून गेलं; पण मनामनावर कोरलं गेलं त्याचा ‘इतिहास’ होतो. अनेक क्षण, प्रसंग काळावर आपले ठसे उमटवून गेले. काही चाहूल न लागताही आपले अवशेष मागे ठेवून गेले. काही प्रसंगाचे ओरखडे मात्र आज आठवणीनंही जखम ओली करतात. अशाच फार फार जुन्या आठवणींचा हळूवार पडदा बाजूला सारत, त्या क्षणांचा अनुभव ताजा करणारा, बोलीभाषेचा बाज घेऊन रणजित देसाई यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकाचा अक्षरसाज लेवून आलेला कथाविष्कार...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarJANSHAKTI 11-08-1991

    बाबुलमोरा भरजरी, मखमली कथा संग्रह... सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. रणजित देसाई यांचे वाङ्मय प्रसिद्ध करण्याची देखण्या आणि आकर्षक स्वरुपात पेश करण्याची बरीचशी कामगिरी पुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊसने घेतली आहे. त्यांनी रणजित देसार्इंच्या कथांचे तीन संगरह प्रसिद्ध केले आहेत. त्यापैकी ‘बाबुलमोरा’ ही रागदारीच्या गाण्याचा मुखडा असलेला एक कथा संग्रह आहे. ‘स्वामी’कार रणजित देसाई हे कादंबरीकार म्हणून जितके प्रसिद्ध आहेत, तितके कथाकार म्हणून वाचकांना कमी परिचयांचे आहेत. परंतु त्यांच्या लेखनांचा बहर जरी कादंबऱ्यांमधून अधिक जाणवत असला तरी त्यांची प्रतिभेच्या क्षेत्रातली मुलुखगिरी कथा लेखनानेच झाली. यापूर्वी त्यांचे दोन तीन कथासंग्रह प्रसिद्ध झाले होते. पण त्यांतील कथांचे सामाजिक, ग्रामीण, निसर्ग, संगीत कथा असे वर्गीकरण करून त्यांचे संग्रह प्रसिद्ध करण्यात आलेले नव्हते. आता मेहता पब्लिकेशनने हे वर्गीकरण करुन त्यांचे तीन कथा संग्रह प्रसिद्ध केले आहेत. या त्यांच्या कथा विश्वातील ‘बाबुलमोरा’ हा काहीसा भुतकाळातील ऐतिहासिक (खरे तर वाङ्मयीनदृष्ट्या ही वर्गवारी चूकच आहे) व संगीताच्या प्रांतातील कथांचा ‘‘बाबुलमोरा’’हा संग्रह या देसार्इंच्या वाङ्मयांच्या पैलूचे दर्शन घडवून जातो. या संग्रहातील सर्वच कथांना एकप्रकारचा खानदानी भरजरी व मखमली असा भावनात्मक स्पर्श आहे. मराठी कथांच्या क्षेत्रात अरविंद गोखले, गंगाधर गाडगीळ यांनी सुरुवातीला अनेक नवनवीन प्रयोग करुन एका अर्थाने नवे मन्वन्तर घडवून आणले. विशेषत: स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वच नूतन लेखकांनी ‘कथा’ प्रधानतेशी नाते विलग करीत करीत नव्या वाटा यशस्वीपणे चोखाळल्या आहेत. परंतु रणजित देसार्इंच्या या संग्रहातील कथा या जुन्या घटना प्रधान वाटेनेच जातात. त्यांत काही कथा या इतिहासातील घटनांशी संबंधित असल्यामुळे त्यातून उमलणारे व्यक्तिमत्त्व, भावना या अधिक पवाढगाणाऱ्या आहेत. ‘वेडात दौडले सात’ या अशा सोळा कथांमधील पाच कथांपैकी प्रातिनिधीक कथा. मराठ्यांचे एक सेनापती प्रतापराव गुजर यांच्या पराक्रमांची गाथा या कथेत शब्दबद्ध केली आहे. या पाचही कथांमध्ये रेखाटलेल्या व्यक्तिरेखा त्यांच्या नावाने आपणास ज्ञात असल्या तरी त्यांच्या जीवनातील स्वभाव वैशिष्ट्यांचा लेखकाने घेतलेला आढावा चमत्कृतीजन्य असला तरी त्यातली पूर्वग्रहीत गौरव पूजाही आपणाला काहीवेळा पारंपारिक वाटते. शब्दांच्या साह्याने रेखाटलेली व्यक्ती चित्रेही वाचनीय झाली असली तरी अंत:करणाला भिडत नाहीत. त्यातली कलाकुसर देखणी वाटते इतकेच. कथा संग्रहाच्या सुरुवातीची नादतरंगा ही कथाही कलावंत आणि राजकन्या यांच्या भावविश्वाचे चित्रण करणारी असली तरी खूप पौराणिक धाटणीची आहे, परंतु ‘अवशेष’मधील संस्थांनिकांच्या व्यथा वास्तव असल्या तरीसुद्धा खानदानी परंपरेचे होत असलेले दर्शन व्यक्तभूत आणि इतिहासाला अधिक जवळकीचे वाटते. या सात कथानंतर संगीताची मैफील सुरू होते. अज्ञात गवय्यांच्या जीवनासंबंधीच्या या कहाण्या आहेत. सैगलच्या आवाजातील ‘बाबुलमोरा’मधील मखमली, अलवार स्पर्श या बहुतेक सर्वच कथांचा आहे. याचा अर्थ असाही आहे की संगीताशी, संगीत साधनेशी नात सांगणाऱ्या कथा वास्तवाशी नाते सांगणाऱ्या आहेत. संगीताचीच नव्हे तर सर्वच कलांचे जे जे आविष्कार आहेत मग ती चित्रकला असो, शिल्पकला असो, वादन नैपुण्य असो वा अन्य चौसष्ट कलांचे क्षेत्र असो, तेथे तेथे भारतीय संस्कृतीतील राष्ट्रीय एकात्मतेचे मनमोकळे दर्शन घडते. महंमद रफी, तलत यांची जात कुणी विचारीत नाही. पंडीत पलुस्करांच्या आत्मपात कुणी जातीयतेचा सूर न धुंडाळता मनसोक्त दाद सारेच देतात. गावस्करचा शैलीदार चौकार, फटकेबाजी पाहून सारे प्रेक्षक पेंडॉल दणाणून सोडतात तर अझरुद्दीनचा स्वीपचा फटका बघताच सगळा पेंडॉल हर्षभराने, उत्साहाने भारुन जातो. कारण तो ‘स्विप’ भारतीय असतो. आज कलांचे हे एकच राज्य असे आहे की ते भारतीय आहे एकात्म आहे. रणजित देसार्इंच्या संगीताच्या प्रांतातील हळुवार भावनांचे दर्शन घडत असताना राष्ट्रीय एकात्मतेची जाणिव किती ‘गहरी’ आहे याची सुप्त जाणीव होत राहते आणि वाटते ‘मिले सूर हमारा’ फक्त तो सूर अंत:करणाच्या गाभाऱ्यांतून बाहेर पडलेला हुंकार असला पाहिजे. रणजित देसार्इंच्या या कथा वाचताना या कलाक्षेत्रातील जीवनांचे हळुवार, मखमली समर्थ दर्शन तर घडतेच पण सैगलच्या सुरांचा ‘बाबुलमोरा’ ‘नैहर छुटोरे जाय’मधली व्याकुळताही मधुरपंखी स्पर्शाने मनमोहक वाटते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more