* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789357201414
  • Edition : 2
  • Publishing Year : DECEMBER 2023
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 116
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BATTASHI IS THE WIFE OF A CONSTABLE FROM MANG-GARUDI COMMUNITY IN THE STORY `BATTASHI`. ONCE THE CONSTABLE GETS FIRED AND THE SUSPICION IS RAISED ON BATTASHI. BATTASHI LEAVES. FAKIRYA WANTS TO MARRY BATTASHI. WHAT HAPPENS NEXT? SHARI`S FATHER IN THE STORY `CHHADITANG` EARNS MONEY BY ARRANGING HER MARRIAGE; BUT SHARI KILLS HIM AND HANGS HIM. FROM `VASTI`, THE EMOTIONAL PICTURE OF THE PEOPLE IN THE GHETTO IS CREATED. IN THE STORY `MODKYA GOPALA`, A MAN LIVING WITH LONELINESS MEETS MODKYA GOPALA. JANU IN THE STORY `BHOOL` STAYS AWAY FROM HIS WIFE WITH THE SOUND OF PAHLWANKI; BUT HE HAS DOUBTS ABOUT HIS WIFE`S CHARACTER. IT IS BECAUSE OF THAT SUSPICION THAT HE COMMITS MURDER. THE YOUNG MAN IN THE STORY `AKULWANTI` THROWS HIS GIRLFRIEND AWAY AFTER FILLING HIS EARS WITH ALCOHOL AND LATER REGRETS IT. HER JOURNEY IN THE STORY `JOGATIN` IS FROM DEVADASI TO PROSTITUTE; BUT THE NARRATOR CAN`T GET HER OUT OF THAT TASK...A COLLECTION OF AUTHENTIC STORIES DEPICTING THE REALITY OF MAN`S DISORDERS, THE SOCIETY AROUND HIM, THE ENVIRONMENT. MAHADEV MORE`S EPIC STORY SET IN A RURAL BACKGROUND.
‘बत्ताशी’ कथेतील मांग-गारुडी समाजातील बत्ताशी ही हवालदार् याची बायको. एकदा हवालदार्या भाजतो आणि त्यावरून शंका घेतली जाते बत्ताशीवर. बत्ताशी माहेरी निघून जाते. फकिर्याला लग्न करायचंय बत्ताशीशी. काय होतं पुढे? ‘छडीटांग’ कथेतील शारीचा बाप तिच्या लग्नाचा बाजार मांडून पैसे कमवत असतो; पण शारी मारते त्याला टांग. ‘वस्ती’मधून साकारतं वस्तीवरील माणसांचं भावव्यामिश्र चित्र. एकटेपणाची व्यथा सोसत जगणारा मोडक्या गोपाळा भेटतो ‘मोडक्या गोपाळा’ या कथेत. ‘भूल’ कथेतील जानू पहिलवानकीच्या नादाने बायकोपासून राहतो दूर; पण बायकोच्या चारित्र्याचा येतो त्याला संशय. त्या संशयातूनच त्याच्या हातून होतो खून. ‘अकुलवंती’ कथेतील तरुण एका दारुड्याने कान भरल्यावर प्रेमिकेला दूर लोटतो आणि नंतर पस्तावतो. ‘जोगतीण’ कथेतील तिचा प्रवास होतो तो देवदासी ते वेश्या असा; पण त्या कर्दमातून कथानायक तिला बाहेर काढू शकत नसतो...माणसाच्या विकारांचं, त्याच्या अवतीभवतीच्या समाजाचं, वातावरणाचं वास्तव चित्रण करणार्या अस्सल कथांचा संग्रह. महादेव मोरे यांच्या ग्रामीण पार्श्वभूमीवरील व्यामिश्र कथा.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#बत्ताशी #महादेव मोरे #ग्रामीणकथा #मराठीसाहित्य #मराठी पुस्तके #मेहता पब्लिशिंग हाऊस #BATTASHI #MAHADEOMORE #GRAMINKATHA #MARATHILITERATURE #MARATHIBOOKS #MEHTAPUBLISHINGHOUSE "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more