* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BEIJING CONFIDENTIAL
  • Availability : Available
  • Translators : MOHAN GOKHALE
  • ISBN : 9789386175496
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 332
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
JAN WONG HAS RETURNED TO BEIJING. HER QUEST: TO FIND SOMEONE SHE ENCOUNTERED BRIEFLY IN 1973, AND WHOSE LIFE SHE WAS CERTAIN SHE HAD RUINED FOREVER. IN THE EARLY 70S, JAN WONG TRAVELLED FROM CANADA TO BECOME ONE OF ONLY TWO WESTERNERS PERMITTED TO STUDY AT BEIJING UNIVERSITY. ONE DAY A YOUNG STRANGER, YIN LUOYI, ASKED FOR HELP IN GETTING TO THE UNITED STATES. WONG, THEN A STARRY-EYED MAOIST, IMMEDIATELY REPORTED YIN TO THE AUTHORITIES. THIRTY-THREE YEARS ON, AND MORE THAN A DECADE AFTER THE PUBLICATION OF HER BESTSELLING RED CHINA BLUES, JAN WONG REVISITS THE CHINESE CAPITAL TO BEGIN HER SEARCH FOR THE PERSON WHO HAS HAUNTED HER CONSCIENCE. SHE WANTS TO APOLOGIZE, TO SOMEHOW MAKE AMENDS. AT THE VERY LEAST, SHE WANTS TO DISCOVER WHETHER YIN SURVIVED. AS JAN WONG HUNTS THROUGH THE CITY, SHE FINDS HERSELF TRAVELLING BACK THROUGH THE DECADES, BACK TO HER EXPERIENCES IN THE CULTURAL REVOLUTION, TO PLACES THAT WERE ONCE OF HUGE IMPORTANCE TO HER. SHE HAS CHANGED, OF COURSE, BUT NOT AS MUCH AS BEIJING. ONE OF THE WORLD’S MOST ANCIENT CITIES IS NOW ONE OF ITS MOST MODERN. THE NEON SIGNS NO LONGER SAY “LONG LIVE CHAIRMAN MAO” BUT INSTEAD TOUT MARY KAY COSMETICS AND KENTUCKY FRIED CHICKEN. PLACES SHE ONCE KNEW HAVE VANISHED, BULLDOZED INTO OBLIVION AND REPLACED BY AVANT-GARDE ARCHITECTURE, TRENDY BARS, AND SLEEK CONDOS. THE PEOPLE SHE ONCE KNEW HAVE CHANGED, TOO, FOR BETTER OR FOR WORSE. MEMORIES ARE EVERYWHERE. BY SEARCHING OUT OLD FRIENDS AND ACQUAINTANCES, JAN WONG UNCOVERS TANTALIZING CLUES ABOUT THE WOMAN SHE WRONGED. SHE REALIZES HER DEEPEST FEARS AND REGRETS WERE JUSTIFIED. BUT YIN HERSELF REMAINS ELUSIVE–UNTIL THE DAY SHE PHONES JAN WONG. EMOTIONALLY POWERFUL AND RICH WITH DETAIL, BEIJING CONFIDENTIAL WEAVES TOGETHER THREE DISTINCT STORIES–WONG’S JOURNEY FROM REMORSE TO REDEMPTION, YIN’S JOURNEY FROM DISGRACE TO RESPECTABILITY, AND BEIJING’S STUNNING JOURNEY FROM COMMUNISM TO CAPITALISM.
जेन वाँग या, तिसNया पिढीतील चिनी-कॅनेडियन, पुरस्कारविजेत्या लेखिकेचे हे चीनसंबंधीचे तिसरे पुस्तक. सन १९७०च्या दशकाच्या सुरुवातीला बीजिंग विद्यापीठामध्ये मँडरिन भाषा शिकण्यासाठी प्रवेश मिळणाऱ्या पहिल्या दोन विद्यार्थिनींपैकी एक. माओ झेडाँग यांच्या `सांस्कृतिक क्रांतीच्या` ऐन बहराचा तो काळ होता. एकीकडे साम्यवादी विचारसरणीचे आकर्षण, तर दुसरीकडे कॅनडामध्ये परकेपणा अनुभवल्यामुळे कोठेतरी आपली चिनी ओळख पटवण्याची, त्यांच्यामध्ये सामावले जाण्यासाठी धडपड अशा द्वंद्वामध्ये सापडलेल्या लेखिकेच्या हातून अजाणतेपणे एक चूक झाली आणि त्यामुळे तिच्या मैत्रिणीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. मनावरील दडपण असह्य झाल्याने आणि जमले तर झालेल्या चुकीचे परिमार्जन करण्याच्या उद्देशाने, तब्बल चौतीस वर्षांनी जेन वाँग चीनच्या राजधानीत, एक महिन्याची रजा घेऊन परतली. तिच्या हातामध्ये एक महिना होता आणि एकशेतीस कोटींच्या लोकसंख्येतून, संपूर्ण नावही धडपणे माहीत नसलेल्या मैत्रिणीला शोधून काढण्याचे आव्हान तिच्यासमोर होते. काहीही झाले तरी तिला तिच्या चुकीचे परिमार्जन करायचे होते. `यीन`ला शोधून तिची माफी मागायचीच होती आणि जमले तर तिच्यासाठी काहीतरी करायचे पण होते. `यीन`चा शोध घेण्याच्या प्रयत्नांत आणि जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठींतून तिने चीनमधील गेल्या ५० वर्षांत झालेल्या सामाजिक, र्आिथक, सांस्कृतिक आणि राजकीय बदलांचा शोध पण घेतला आणि चीनच्या साम्यवादाकडून भांडवलशाहीकडे झालेल्या प्रवासादरम्यान चिनी जनतेच्या जीवनात झालेले परिवर्तन आणि मानसिकतेमधील झालेले बरेवाईट बदल पण संवेदनक्षमतेने टिपले. सामाजिक, आर्थिक बदलांविषयीची तिची निरीक्षणे आणि त्यावरील भाष्य आपल्याला पण कोठेतरी ओळखीचे वाटते. यीनला शोधण्यात ती यशस्वी झाली का? चढउतारांनी भरलेल्या आयुष्यात यीनने काय-काय भोगले होते? यीनने जेनला माफ केले का? जेनच्या शोधाची आणि यीनच्या आयुष्याची चित्तवेधक आणि हेलावून टाकणारी कहाणी म्हणजे हे पुस्तक- `बीजिंगचे गुपित`.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#JAN WONG #BEIJING CONFIDENTIAL #CHINA #CULTURAL REVOLUTION #MOHAN GOKHALE #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarSAPTAHIK SAKAL 16-06-2018

    चीनच्या साम्यवादी राजवटीला कंटाळून यीन लुयी ही तरुणी चीन सोडून जायचा विचार करते आणि सरकारी कारवाईत अडकते. पलायनाचा प्रयत्न करत असताना यीन चीनमध्ये शिकायला आलेल्या जेनला मदत मागते पण हा प्रयत्न फसतो. या प्रसंगाची टोचणी जेनला लागून राहते. यीन लुयीचे न्की काय होते याचा शोध घेण्यासाठी पत्रकार झालेली जेन वाँग चीनमध्ये काही दशकानंतर परत येते. मधल्या काळात चीनमध्ये यीन लुयीवर काय वेळ येते? या तरुणीला कोणत्या हालअपेष्टांना तोंड द्यावे लागते? याची कहाणी म्हणजे ‘बीजिंगचे गुपित’... ...Read more

  • Rating StarLOKPRABHA - 21-07-2017

    मैत्रिणीसाठी चीनचा शोध... जेन वाँग यांच्या पत्रकारिता अभ्यासकालीन घटना, त्या वेळचे त्यांचे जीवनमान, चिनी पद्धती आणि दिनक्रम यांवर प्रकाश टाकणारे हे पुस्तक. महाविद्यालयीन जीवनात मैत्रिणीची चुगली करण्याची अनवधानाने झालेली चूक काही वर्षांनी लक्षात आल्यवर पश्चात्ताप झाल्याने आणि पापक्षालन करण्याच्या निमित्ताने त्या मैत्रिणीला एवढ्या मोठ्या चीनमध्ये शोधून काढणे, हा लेखिकेचा हेतू आहे. त्या दरम्यान इतर ही अनेक जुनी माणसे भेटणे, प्रत्येकाची भेट घेताना, ती ठरवताना होणारे अनेक अपेक्षाभंग, मनस्ताप, मानसिक त्रास, लेखिकेच्या या शोधकार्यात तिच्या कुटुंबाची कधी अनिच्छेने, कधी उत्साहाने मिळणारी साथ तसेच मुख्य शोधकार्यात अनपेक्षितरीत्या उलगडणारी अनेक रहस्ये, काही विलक्षण गंभीर काही उपयुक्त तर काही विनोदी आहेत. या सर्व गदारोळात जे घडलं ते कथानक म्हणजे या पुस्तकाचा मुख्य विषय. लिहिता लिहिता चीनची काही गुपितेही उघड करण्याची संधी लेखिकेने अनायसेच साधली आहे. किंबहुना चीनची काही गुपिते उघड करण्यासाठी हा विषय निवडला असावा. पुस्तकाचे शीर्षक आणि मुख्य कथानक यांचा संबंध एकमेकांशी मुद्दाम जुळवण्यात आला असावा असे जाणवते. माओवाद्यांचा अंमल सातत्याने जाणवत राहतो. आंतरराष्ट्रीय वार्ताहराला स्वत:चे काम करताना वैयक्तिक त्रासही बऱ्याच प्रमाणात होतो. उदा. एखादी विशिष्ट लक्षवेधी घटना लिहिल्यावर जे पडसाद जनमानसांत उठतात ते थेट घरापर्यंत जाऊन त्यांचे वैयक्तिक आयुष्य ढवळून काढतात. जेन वांग या उत्तम निरीक्षक आहेत हे काही वाक्यांवरून जाणवतं. त्यांनी चंद्रकोरीला नखाच्या तुकड्याची उपमा दिली आहे. शहरामधील घरांच्या सोनेरी रंगांच्या कौलावरून प्रकाश परावर्तित झाल्याने ‘ठिणग्या’ उडाल्याचा भास होतो. रात्रीच्या वेळी तर बीजिंग शहर एखाद्या प्रचंड व्हिडिओ गेमप्रमाणे दिसतं. तरुणाने नाईकेची सेलमधील जॉगिंग पॅन्ट घातली होती, हे अप्रतिम निरीक्षण आहे. लेखिकेच्या कॉलेजातील मँडरिन भाषेची शिक्षिका ‘फु मिन’ ही साम्यवादाची अतिआग्रही होती किंवा साम्यवाद हा तिच्या नसानसांमध्ये ठासून भरला होता. लेखिका त्या शिक्षिकेला हुकूमशहा म्हणत असे. चीनमध्ये लावल्या जाणाऱ्या पाट्यांची वर्णने वाचताना पुणेरी पाट्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. काही घटना अनावश्यक असल्या तरी चीनबाहेरील लोकांसाठी त्या अतिशय मजेदार ठरू शकतील. भाषांतरकार मोहन गोखले यांनी कथानक ओघवते ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत. -पूर्वा देवधर ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 25-06-2017

    अथांग भावनांचे शब्दचित्र... एक पत्रकार व्यक्ती विविध बातम्या किंवा विशिष्ट विषयांवरील लेख या व्यतिरिक्त अन्य साहित्यप्रकारातील लेखन करते, त्यावेळी त्या व्यक्तीमधल्या पत्रकाराच्या ठायी असलेली शोधक व चिकित्सक वृत्ती आणि घटनेच्या गाभ्याला हात घालण्याचेधाडस असे पैलू त्यांच्या लेखनात अवतरतात आणि या मर्मग्राही लेखनामुळे त्या कलाकृतीला वेगळा आयाम प्राप्त होतो. जेन वाँग ही एक पारितोषिकप्राप्त व लोकप्रिय महिला पत्रकार असून तिने यापूर्वी तीन वेगवेगळ्या पुस्तकांचे लेखन केले आहे. यानंतर ‘बीजिंगचे गुपित’ ही त्यांची नवीन कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. आणि या कादंबरीचा मराठी अनुवाद मोहन गोखले यांनी केला आहे. बीजिंगच्या विद्यापीठात ‘जेन वाँग’ आणि ‘येल’हून आलेली चिनी-अमेरिकन ‘एरिका’ या केवळ दोनच परदेशी विद्यार्थिनींना प्रवेश मिळतो. तेथील वास्तव्यात ‘जेन’ला यीन लूओयी’ नामक विद्यार्थिनी भेटते आणि अमेरिकेला जाण्यासाठी तिची मदत मागते, परंतु माओवादाचा प्रभाव असलेली जेन ही खबर साम्यवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्याला देते. यानंतर ‘यीन’चे काय होते याची माहिती न मिळाल्याने जेन अस्वस्थ होते, ती स्वत:ला अपराधी समजते आणि साधारणपणे तीस वर्षांनतर पुन्हा बीजिंगला येते. कॅनडास्थित जेन वाँग ही नेवार्क विमानतळावर विमानात बसल्यापासून बीजिंगला पोहचून तेथे अठ्ठावीस दिवस राहून स्वगृही परतण्यासाठी विमानात बसेपर्यंतच्या कालावधीमधील घडलेल्या घडामोडी आणि विषयाच्या अनुषंगाने दिलेली माहिती यांचा समग्र गोफ म्हणजे ‘बीजिंगचे गुपित’ ही कादंबरी होय. ‘यीन’ला विद्यापीठातून काढून टाकण्यास आपणच कारणीभूत आहोत या भावनेने जेनला पश्चात्ताप झालेला आहे. या चुकीचे प्रायश्चित्त घेण्याचे ठरवून ‘यीन’ला शोधण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेत तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे; सोबतीच्या विद्यार्थ्याना संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असताना, ‘गु वेमिंग’ या एका मित्राकडून तिला ‘पॅन’चा पत्ता मिळतो आणि याचवेळी पॅनची दूरध्वनीवरून भेट होते. यानंतर ‘जेन’ला ‘यीन’च्या अस्तित्वाचा सुगावा लागतो. साधारणपणे कादंबरीच्या मध्यंतरानंतर तिला ‘यीन’चा ठावठिकाणा समजतो आणि अखेर महत्प्रयासाने तिची यीनशी भेट होते. या कादंबरीमध्ये ‘यीन’च्या भेटीपूर्वी तिला शोधण्याच्या प्रयत्नात असताना वेगवेगळ्या ठिकाणी जाताना किंवा अनेक लोकांच्या भेटीमधल्या चर्चेतून लेखिकेने अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण दिले आहे. बीजिंगच्या व पर्यायाने चीनच्या ऐतिहासिक घटनांची माहिती देताना मानवाच्या उत्क्रांतीच्या काळापासून बाराव्या व तेराव्य शतकातील अनुक्रमे ‘खितान’ व ‘जुर्चेड’ या रानटी जमातींच्या लोकांच्या राज्यापासून नंतरची मिंग राजवट आणि आतापर्यंत चीनमध्ये झालेल्या राजवटींचा इतिहास येथे मांडला आहे. ‘यीन’च्या भेटीनंतर तिच्याशी झालेल्या संवादातून तिच्या भूतकाळातील परिस्थितीचे संपूर्ण वर्णन येथे झाले आहे. ‘यीन’ने ज्यांच्यावर विश्वास टाकला तो साम्यवादी पक्ष, तिचे मित्र-मैत्रिणी व शिक्षक या सर्वांनीच तिचा विश्वासघात कसा केला आणि ज्या शेतकऱ्यांबद्दल तिच्या मनात कणव होती त्यांनीच तिला कसे वाळीत टाकले या वर्णनासह तिची शोकांतिका, तिला सोसाव्या लागलेल्या यातना व तिच्यावर आलेले प्रसंग याचेही वर्णन येथे केले आहे. जेन वाँग ही ‘यीन’चा शोध घेण्यासाठी गुप्तहेर संघटनेची मदत घेण्याचे ठरवते तेव्हा गुप्तहेर संस्था, विवाहबाह्य संबंध शोधून काढणे, व्यावसायिक बोधचिन्हांच्या होत असलेल्या चोरीचा छडा लावणे, स्थावर व जंगम मालमत्तांचा शोध घेणे, दूरध्वनीवरील संभाषणांचा माग काढणे, घरापासून दूर असलेल्या मुलांवर लक्ष ठेवणे, औद्योगिक क्षेत्रात हेरगिरी करणाNयांचे पुरावे शोधणे आणि हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेणे अशी अनेक कामे करीत असल्याचे तिला आढळून येते. यावरून तेथील सामाजिक परिस्थितीची ओळख करून देण्याचा तिने प्रयत्न केला आहे. याशिवाय बीजिंगचे पोलीस व गुप्तहेर यांची व्यक्तिमत्त्वे कशी असतात हेही दाखवले आहे. तसेच गुप्तहेरांच्या कार्यपद्धतीचे वर्णन करताना त्यांच्यामध्ये साम्यवाद व भांडवलशाही यांचा संगम झाल्याचे म्हटले आहे. एका पत्रकार महिलेने धाडसी वृत्तीमधून, शोधक नजरेतून आणि सूक्ष्म निरीक्षणातून लिहिलेली ही सत्यकथा असून, लेखिकेच्या अथांग भावनाच्या या शब्दचित्राचा मोहन गोखले यांनी ओघवत्या शैलीत मराठी अनुवाद करून अनुवादित साहित्यात मोलाची भर घातली आहे. -कमलाकर राऊत ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL - SAPTRANG - 26-3-2017

    चीनमधल्या जुन्या आणि समकालीन व्यवस्थेचं चित्रण करणारी ही वेगळ्या प्रकारची कादंबरी. जेन वाँग ही पत्रकार बऱ्याच वर्षांनी चीनमध्ये परतते. चौतीस वर्षांपूर्वीच्या एका घटनेची सल तिच्या मनात आहे. कॅनडामधून बीजिंगमध्ये शिकायला गेली असताना यीन लुयी नावाच्या एा तरुणीनं अमेरिकेला जायची इच्छा तिच्याकडे व्यक्त केलेली असताना वाँगनं ती गोष्ट साम्यवादी पक्षाच्या पदाधिकाऱयांकडे सांगितलेली असते. त्या घटनेचा नक्की काय परिणाम झाला, हे वाँगला आता जाणून घ्यायचं आहे. तिच्या या प्रवासात चीनमधली बदलत गेलेली संस्कृती, साम्यवादाकडून भांडवलशाहीकडे झालेला बदल अशा अनेक गोष्टी कादंबरीत उलगडत जातात. जेन वाँगनंच तटस्थपणे चित्रण केले आहे. मोहन गोखले यांनी या कादंबरीचा अनुवाद केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
साधना साप्ताहिक ३ ऑगस्ट २०२४ ... अशोक राणे

सुनंदा अमरापूरकर यांनी त्यांचं `खुलभर दुधाची कहाणी` हे आत्मकथन पाठवलं तेव्हा `आता हे वाचायचं केव्हा` असा प्रश्न सर्वप्रथम मनाशी आला. देणेकरी दाराशी ठाण मांडून बसावेत तशी अनेक पुस्तकं, कोणी कोणी पाठवलेल्या त्यांच्या फिल्म्स आणि माझे सतराशे साठ व्याप सोर असताना कसा वेळ काढायचा? माझं सबंध आयुष्य सिनेमा, तो आकाराला आणणारे दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ, त्यांच्या निर्मितीमागच्या प्रेरणा आणि त्यांच्यातला माणूस याचा शोध घेण्यात गेलं. एका गोष्टीचं कुतूहल होतं आणि ते म्हणजे या सर्वांच्या पलीकडे असलेलं, परंतु क्वचितच कळलेलं असं त्यांच्या कुटुंबातल्याच व्यक्तीने वर्णिलेलं अमरापूरकरांचं चरित्र ! सगळी व्यवधानं बाजूला ठेवून सुनंदा अमरापूरकरांचं आत्मकथन वाचायला हे कुतूहल पुरलं. मनोगतातलं पहिलंच वाक्य आहे... `मी या आठवणी का लिहिल्या ?` ...आणि मला चट्‌कन थोर अभिजात अभिनेत्री इंग्रीड बर्गमन हिचं `माय स्टोरी` आठवलं. तिनेही अशीच सुरुवात केलीय. तिची मुलं म्हणाली, `तुझ्या आयुष्याविषयी कुणी तरी तिखटमीठ लावून काहीबाही लिहील, त्याआधी तूच सारं खरं मोकळेपणानं सांगून टाक. तिने जाडजूड ग्रंथात अभिनेत्री म्हणून तिचा सारा प्रवास कसलाही आडपडदा न ठेवता सविस्तर सांगितला. सुनंदाताईंचं पुस्तक आणि त्यातलं हे पहिलं वाक्य वाचताना मला हे का आठवावं? त्यांची पहिली ओळख म्हणजे नाट्य-चित्रसृष्टीतला एक मोठा अभिनेता, दिग्दर्शक सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी आणि अलीकडचा परिचय म्हणजे एक उत्तम अनुवादकर्त्या. तर आता त्या आपल्या प्रसिद्ध नवऱ्याविषयी काय आणि कसं सांगतात, त्याचबरोबर त्यांचं वैवाहिक सहजीवन, एकूणच त्यांचं कौटुंबिक जीवन कसं उलगडून दाखवतात याचं कुतूहल होतं. मुख्य म्हणजे त्यांची मध्यमवर्गीय पार्श्वभूमी आणि सदाशिव अमरापूरकरांना मुंबईत स्थैर्य लाभेपर्यंत नगरसारख्या छोटया शहरातला त्यांचा वावर यातून पुढला सारा अचंबित करणारा प्रवास त्या का मांडतात याचीही उत्सुकता मनात होतीच, अमरापूरकर कुटुंबाचा प्रवास हा केवळ नगर ते मुंबई नव्हता. एखाद्या नवख्या नटाने रंगमंचाच्या अंधाऱ्या अवकाशात प्रवेश करावा आणि अचानक त्याच्यावर सर्व अंगांनी प्रखर प्रकाशझोत यावा, त्याचे डोळे इतके दिपून जावेत की त्याला ते नीट उघडून सभोवताल पाहता येऊ नये असाच काहीसा अनुभव या कुटुंबाने घेतला आहे. प्रायोगिक वे व्यावसायिक रंगभूमी हे स्थित्यंतर तसं फार तर कनिष्ठ ते उच्च मध्यमवर्गीय याच काहीशा परिचित अवकाशातलं; परंतु हिंदी सिनेमातली प्रसिद्धी तर भिरभिरावून टाकणारी. ते अंगावर घेत, वागवत या कुटुंबाने कशी वाटचाल केली हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. एवढी प्रचंड प्रसिद्धी आणि वलय लाभूनही अमरापूरकर कधी फिल्मी झाले नाहीत हे वाटतं तितके सोपे नाही. `खुलभर दुधाची कहाणी यातून ते उलगडणार होते... वाचायला सुरुवात केल्यावर ते खूप तपशीलवार आणि पसरटही वाटलं. पण वाचत गेलो तसतसं लक्षात आलं की, सुनंदाताईंनी चितारलेला परिसर तप‌शिलातल्या काही फरकाने आपलाही आहे. आपणच प्रत्यक्ष जगलेले, पाहिलेल वाचतो आहोत. साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या आमच्या शाळकरी वयापासून वाचलेल्या साहित्यातून हेच सर्व पाहत आलोय. आपल्या मुलांच्या आणि नातवंडाच्या पिढीला तर हा काळ अवकाश सर्वस्वी अपरिचित. हे त्यांच्यासाठीही आहे. आजच्या नव्या पिढीला 2000 चा चित्रपट जुना वाटतो, तेव्हा त्याआधीच्या त्यांच्या आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या सिनेमाशी आपण जसा त्यांचा परिचय करून देतो तसंच आहे हे. शिवाय या कथनाच्या नायिकेने पुढे अपरिहार्य असं जे वळण गाठलं आहे, त्यासाठी हे आवश्यकच आहे. संथ लयीत सुरू झालेलं आणि काहीसं रेंगाळल्यासारखं वाटणारं गाणं उत्तरोत्तर हलक्याशा द्रुत लयीत समेवर यावं असं हे आत्मकथन आहे. तरीही पूर्वार्धावर थोडे अधिक संपादकीय संस्कार झाले असते, तर आवश्यक असणाऱ्या संथ लयीला रेंगाळावं लागलं नसतं. `प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते` या प्रसिद्ध उक्तीच्या पलीकडे इथे काहीतरी आहे. ही नायिका इथे केवळ एवढ्याच भूमिकेत नाही. ही भूमिका पार पाडताना तिने सर्व प्रकारे गांगरवून टाकणाऱ्या परिस्थितीतही स्वतःला जपलं, स्वतःमधल्या गुणांना जमेल तसं आणि तेवढं खतपाणी घालत जोपासलं आणि आपली म्हणून एक ओळख निर्माण केली. ज्या संपूर्णतः अकल्पित, अनपेक्षित जबाबदाऱ्या येऊन पडल्या, त्या लीलया पार पाडत तिने आपलं व्यक्तिमत्त्व जपलं. `मीच एकटीने सारं पहायचं` असा सतत तक्रारखोर धोशा लावत एखादी कर्कशा झाली असती; परंतु सुनंदाताईंचं तसं झालं नाही. म्हणून पुस्तक वाचून झाल्यावर फोनवर मी त्यांना एवढंच म्हणालो, `माउली, कुठून गं इतकी ऊर्जा आणलीस?` 1950 चं दशक, त्याआधीचा आणि नंतरचाही काळ तसा गरिबीचा आहे. समाजाच्या सर्व थरांत अभावग्रस्तता आहे. कसला अभाव आहे याचीही त्या काळ अवकाशाला जाण नाही. आहे ते गोड मानून घेत जगण्याचा हा काळ. या सामाजिक स्तराखाली असाहाय्यपणे जगणारा एक वर्ग आहे. त्याचीही वास्तपुस्त करण्याची गरज या वातावरणात आहे. परंतु सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे संस्कारक्षम घडण्याची, घडविण्याची, अभावग्रस्तता तिथे महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या या नायिकेला हे पर्यावरण लाभलं आहे. त्यांचे वडील मुलं लहान असतानाच गेले. नंतर घरही गेलं आणि मुलांना घेऊन आईला देवळात राहावं लागलं. आहे त्या परिस्थितीतून वाट काढावी या धारणेत सभोवतालच्या सुसंस्कृत वातावरणाचाही मोठा आधार होता. ते सारं मुळातून वाचण्यासारखं आहे. यात गरिबीतले दिवस, हलाखी, अभावग्रस्तता यांपेक्षा हे संस्कार सर्वांत महत्त्वाचे आहेत हे सहजपणे अधोरेखित केलेले आहे. वर ज्या ऊर्जेचा उल्लेख केलाय ती इथूनच सुनंदाताईंना मिळाली आणि म्हणूनच यशस्वी नवन्याच्या पाठीशी उभ्या राहताना त्या स्वतः सर्वप्रकारे यशस्वी ठरल्या आहेत. त्यांच्या आणि अमरापूरकरांच्या कथेला कुठून कुठे नेऊन ठेवणारं वळण शाळा-कॉलेजच्या वयातच आलं. नाटक ! अमरापूरकर म्हणजे नाटक आणि नाटक म्हणजे अमरापूरकर असं हे रसायन होतं. सुनंदाताईही नगरच्या त्या छोट्या नाट्यअवकाशात मनापासून वावरत होत्या. सोबत, साथ होती अमरापूरकरांची. परंतु हा माणूस स्वतःमधल्या रंगकर्मीत इतका खोलवर बुडालेला होता की, जिच्या तो प्रेमात पडलाय; तिलाही नाटकाची आवड आहे; नोंद घेण्याजोगे कलागुण आहेत, तिच्यातला कलावंत घडविण्यात मात्र त्याने रस दाखविला नाही. इतकंच नाही तर पुढे मुंबईत यश मिळविल्यानंतर, बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाल्यानंतरही सुनंदाताईंनी `यशस्वी पुरुषामागे...` ची सर्व प्रकारची भूमिका यशस्वीपणे पार पाडल्यानंतर जेव्हा ऑफिसच्या नाटकात काम करायचं ठरवलं, तेव्हा यांनी त्यास ठाम नकार दिला. इथे पुस्तकातला एक प्रसंग आठवतो. नगरमध्ये नाटकाची तालीम चालली होती. अमरापूरकर खूप सिगरेट्स ओढतात म्हणून पाकीट लपवून ठेवण्यात आलं होतं. पण जसजशी तलफ अनावर होत गेली, तसतसे ते अस्वस्थ होत गेले. नाटकावरून त्यांचं लक्ष उडत चाललं होत. तेव्हा सुनंदाताईनी आपल्या पर्समध्ये लपवून ठेवलेल्या पाकिटातून दोन सिगरेट्स आणून दिल्या. हीच लग्ना आधीची प्रेयसी नंतर पत्नी, गृहिणीच्या भूमिकेतही त्याला असंच सांभाळते. अमरापूरकरांची नाट्यवेडापायी अडलेली त्यांची पदवी या पद‌वीधारक मुलीशी लग्न ठरल्यानंतर ते पूर्ण करतात. इथे लग्न पार पडतं आणि हे भाऊ म्हणतात, `मला पुण्यात राहून एम.ए. करायच आहे. ही बाई हो ला हो करते. नववधू म्हणून तक्रार करत नाही. शिक्षण पूर्ण करून नोकरी करणारी ही मुलगी नोकरीधंदा न करणाऱ्या मुलाशी लग्न करते. तो काळ आणि लहान गाव हे लक्षात घेतलं, तर कदाचित कल्पना येईल की किती अवघड होतं ते. यांचं भांडवल काय तर पिढीजात वाडा आणि व्यवसाय. बरं त्या व्यवसायात तरी सहभाग तर तोही नाही. दिवसरात्र एकच ध्यास. एकच नाद... नाटक पुढे मिळणारे अमाप यश आणि वैभव यांची काही अंशी तरी शक्यता आणवली असेल, तर तसंही काही नव्हतं. आपलं मानलं आणि निभावलं. असेल तर एक विचार मनाशी असेल आधार द्यायला, याची कलानिष्ठा सोळा आपणे सच ! तिथे अन्य गोष्टीला थारा नाही. ते मात्र खरंच होतं. अमरापूरकरांमधला अस्वस्थ रंगकर्मी त्यांना कायमचा मुंबईत घेऊन आला आणि मग सर्वाच्या वाट्याला येतो तसा स्ट्रगल करत ते आधी व्यावसायिक रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक म्हणून यशस्वी होता होता अनपेक्षितपणे सिनेमात जाऊन पोहोचले आणि `अर्धसत्य` नंतर रेस्ट इज द हिस्टरी असा पुढला प्रवास घडला. या आत्मकथनात तो तपशीलवार वाचायला मिळेलच. परंतु त्यात महत्त्वाचं आहे ते भाड्याच्या घरात पितळी स्टोव्ह आणून मुंबईतल्या संसाराला केलेली सुरुवात ते नंतर ऑडीसारख्या महागड्या परदेशी गाड्यांपर्यंत झालेला प्रवास... आणि त्याहीपेक्षा हे घबाड सहजपणे घेणं, हाताळणं, स्वतः सुनंदाताईंनी, अमरापूरकरांनी आणि त्यांच्या तीन मुलींनीही. एकीकडे हे वैभव आणि दुसरीकडे मध्यमवर्गीय साध्या राहणीचे संस्कार ! दस्तुरखुद्द अमरापूरकर तसेच होते, परंतु त्यांच्या प्रचंड बिझी शेड्यूलमध्ये घरच्या आघाडीवर निगुतीने सांभाळलं, निभावून नेलं ते सुनंदाताईंनी. बरं हे करता करता आपली नोकरीही सांभाळली. मुलींची शाळा- कॉलेज, त्यांची जडणघडण, इतर साऱ्या सांसारिक बाबी, अमरापूरकरांच्या वाढत्या उत्पन्नाचं व्यवस्थापन, त्यासाठी नेमावयाचा चार्टर्ड अकाउंटंट वगैरे. आणि हे सारं करताना जे जग कालपरवापर्यंत आपल्यापासून दूर होतं तिथे सहज शिरकाव करण्याची, तिथल्या स्टार मंडळींमध्ये बावरण्याची संधी असताना ते स्वतःहून दूर ठेवणं, आपल्या मुलींनाही त्याचं आकर्षण वाटणार नाही याची काळजी घेणं हे अवघड काम या माउलीने सहज केलंय. अशीच कमाल त्यांनी केली ती त्यांच्या आई, सासू- सासरे आणि अमरापूरकरांच्या घरातच असलेल्या आत्याबाई ताई यांच्या व्यक्तिरेखा, त्यांच्याशी असलेलं नातं आणि रोजचा संबंध यांविषयी लिहिताना. त्यातून त्या वेळचा काळ अवकाश आणि बदलता कौटुंबिक सामाजिक - पोतही सहजपणे दिसून येतो. सासरे म्हणजे घरातला अखेरचा शब्द हे मनाशी कायम मानलेलं. स्वीकारलेलं. परंतु एक वेळ अशी येते की, मागल्या पिढीतलं कुणी दुखावलं तरी त्याची क्षिती न बाळगता, नव्या पिढीला आपली वाट काढावी लागते. कारण तिच्या काळ - अवकाशाचा तो रेटा आहे. तो मागल्या पिढीला कळणे शक्य नाही. स्वतःचा विचार करण्याची ही प्रेरणा खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरते. आणखी एक नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, स्वतंत्रपणे स्वतःचं आयुष्य घडवणारी तरुण मुलगी कट्टर पुरुषसत्ताक सासरी जाते, तेव्हा तो विरोधाभास पेलणं किती अवघड असतं याचंही उदाहरण इथे प्रस्तुत होतं. या दरम्यान वेगळा विचार करणारा, सर्वांना समजून घेणारा संवेदनशील नवराही मधूनच नवरेपणा गाजवतो, पण अशा वेळी `आम्ही यांच्यासाठी एवढं करतो ,पण आमच्याबद्दल काही वाटत नाही` असा तक्रारखोर विचार दूर सारत आपलं काम करत राहणं यासाठी साधनाच लागली असेल. `स्वतःची समजूत घातली यापेक्षा `परिस्थिती नीट समजून घेतली` हा मा हा मार्ग पत्करला की सोपं होतं. मन शांत होतं. कडवटपणा तर कणभर राहात नाही. सर्जनशीलता आणि मनाचा प्रसन्नपणा ताजा टवटवीत राहतो. आणि मग आपल्याला जे करावंस वाटते ते करता येतं. त्याचं व्यवस्थापन सुचतं, जस सुनंदाताईंना त्यांच्या अनुवादाच्या कामाच्या नियोजनात सुचलं. घर आणि एकूणच कुटुंबाचे सर्व करताना त्यांना त्यांच्या लेखनासाठी वेळच काढता येईना, तेव्हा पहाटे लवकर उठून त्यांनी निवांत दोन तास काढले आणि आपलं काम केलं. एवढंच नव्हे तर कॉलेज, अभ्यास हे चाळीसेक वर्षे मागे पडल्यानंतर पुन्हा त्या मुंबई विद्यापीठात हजर झाल्या आणि मायथोलॉजीवरच्या एक वर्षाच्या घनघोर अभ्यासक्रमात स्वतःला झोकून दिलं आणि त्यात उत्तम गुण मिळवून पासही झाल्या. वयाच्या या टप्प्यावर घरगुती जबाबदाऱ्यांत, लेकींच्या बाळंतपणाचीही एकीचं तिकडे अमेरिकेत भर पडली. आरंभी मी म्हटले तस `कुठून आणते ही ऊर्जा ही माउली...!` असं करता करता आता कुठे स्वतः साठी वेळ मिळतोय असं वाटेवाटेपर्यंत अमरापूरकरांचं शेवट गाठणारं आजारपण सुरू होतं. आता पुन्हा नव्याने सारं नियोजन, आता दिवसाचा प्रत्येक क्षण त्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत राहण्यासाठी. अमरापूरकरांची कामं कमी होत चालली होती. जिथून आयुष्याची सुरुवात केली, तिथे जाऊन तिथल्या घरात दोघांनी पुढली वर्ष काढायची असं ठरवता ठरवता तोच सारा वेळ मुंबईत हॉस्पिटलमध्ये काढावा लागला. नगरला पोहोचला तो अमरापूरकरांचा निष्प्राण देह... `खुलभर दुधाची कहाणी` ही एका समजदार आणि कर्तृत्ववान स्त्रीची कहाणी आहे. त्या कहाणीतून मला जाणवलेलं तिचं व्यक्तिमत्त्व अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. सुनंदा अमरापूरकर यांना सलाम! ...Read more