* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GATULA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662153
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 156
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
GATHUL MEANS A BUNDLE OF CLOTHES AND PERHAPS A FEW HUMBLE BELONGINGS. THIS NOVEL RELATES THE STORY OF A BOY FROM A PAVEMENT –DWELLING FAMILY IN MUMBAI.
चर्मकार समाजात जन्मलेल्या आणि मुंबईतल्या फुटपाथवर वाढलेल्या श्री. रवींद्र बागडे यांची ही आत्मकथनात्मक कादंबरी. यातला ‘ना-या’ हे लेखकाचंच प्रतिरूप. कमालीचं दारिद्र्य, दारूच्या व्यसनापायी कुटुंबाची धूळधाण करणारा बाप आणि नव-याच्या छळाला तोंड देत सात पोरांच्या कुटुंबाच्या पोटाला घालण्यासाठी मरेमरेस्तोवर कष्ट करणारी आई; सोबतीला गलिच्छ फुटपाथवरचं जनावरांच्या मोलानं जगणं आणि भोवताली बहुरंगी, बहुढंगी मुंबई हे ना-याचं प्राक्तन. त्यामुळे त्याच्या कोवळ्या भावविश्वात अनेक ‘जहरी’ अनुभवांचं ‘गटुळं’ आहे. त्यामुळे या आत्मकथनात केवळ चर्मकार समाजाचं दर्शन घडत नाही, तर गाळात रुतलेल्या माणसाच्या जगण्याच्या धडपडीचं आणि आपल्यासारख्या रुतलेल्यांना हात देण्याच्या जिद्दीचं वास्तव चित्र उमटलेलं आहे. यातलं फुटपाथवरचं वातावरण, वेश्याव्यवसायाचं जग, रेस, जुगार यांचं विदारक चित्रण पांढरपेशा मनाला धक्का देणारं आहे ! आज असंख्य माणसं या परिस्थितीत जगतायत्. याला जबाबदार कोण? बालमजूर प्रतिबंधक कायदा नेमका कोणासाठी? यांच्या पोटाची सोय होत नाही, तोवर ही मुलं धंदापाणी सोडून शिकणार कशी? बोलभाषेत सहज उलगडत जात ही कादंबरी परिस्थितीचं विदारक दर्शन घडवते व वाचकांना अंतर्मुख करते.
* सह्यनागरी २००१ . * भि.ग.रोहमारे पुरस्कार २००१ . * आशिर्वाद २००२ . * को.म.स.प. २००३. * नाथ माधव २००३ . * साहित्यरत्न २००३ . * वारणेचा वाघ २००४ . * राज्य पुरस्कार २००२-०३ . * बापूसाहेब धाक्रे स्मुर्ती पुरस्कार २००४. * संत प्रसाद २००५ . * आंबेकर श्रमगौरव २०११ . * राष्ट्राशाहीर अमर शेख २०१२ .
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RAVINDRA BAGADE #BOCHAKA #GATULA "#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #GATULA #GATULA #गटुळं #FICTION #MARATHI #RAVINDRABAGDE #रवींद्रबागडे "
Customer Reviews
  • Rating StarSadahana Patil

    Mala he pustak manapasun avadle 2 veles vachle ahe

  • Rating StarRavindra Bagade

    सर्वात आवडते आत्मचरित्र

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    विदारक अनुभवांचं ‘गटुळं’... मुंबईसारख्या महानगरात कित्येक मुलं आणि मुली गल्ल्यांमधून रेल्वे गाड्यांमध्ये, स्टेशनजवळच्या बकान जगांमध्ये नजरेला पडतात. काही आपल्याला झेपेल त्या पद्धतीनं लहान-मोठी कामं करत जगतात आणि आपल्या भावंडांना जगवतात. हजारो मध्यमव्गीय प्रवासी रोज त्यांना बघतात. त्यांची कीव करतात, तिरस्कार करतात. पण नंतर त्यांना विसरून कामालाही लागतात. काय भवितव्य असतं या मुलांचं, घर हरवलेली-दुरावलेली ही मुलं उद्या कोणत्या वाटेवर जाणार, अशा अनेक प्रश्नांना उत्तरं मिळत नाहीत. हेही एक भयाण वास्तव आहे, असं म्हणून सगळेच जण त्याकडे पुन्हा नजर न वळवता आपला रस्ता धरतात. कधी काळी काहीसं असंच भरकटलेलं आयुष्य जगलेल्या रवींद्र बागडे नामक लेखकाचं ‘गटुळं’ हे पुस्तक भरकटलेल्या अनुभवाचं चित्रण करतं. चर्मकार समाजात जन्मलेला लेखक मुंबईतल्या आपल्या जगण्यातून जे शिकत गेला, जे अनुभव घेत गेला त्याचं दर्शन या लेखनात घडतं. कादंबरीचा नायक नारायण-नाऱ्या हे लेखकाचंचं दुसरं रूप आहे. दारूड्या बाप, त्याची मारहाण सतत सहन करत, कष्ट उपसत मुलांना वाढवणारी आई आणि रस्त्यावरचा त्यांचा उघडा संसार... दारिद्र्य हा या घराचा स्थायीभावच होऊन गेलेला. पारंपरिक काम न करता नाऱ्याचा बाप भाजी विकायचा धंदा करणारा. पण दारूच्या व्यसनानं त्याला पुरतं गिळून टाकलेलं, अशा परिस्थितीत पाच पोरांना खाऊ घालणं हे त्यांच्या आईवरच येऊन पडलेलं. तरीही नाऱ्या शाळेत जायचा. पण पुस्तक नाही म्हणून त्याला शाळेत हाकलून लावलं. असे अनेक अनुभव घेत नाऱ्या मॅट्रिक झाला. रस्त्यावरच्या जगण्यातली कुचंबणा, तिथला गलिच्छपण यातून आपण वर यायचं आहे ही भावना मनात जपत धडपडणारा नाऱ्या ज्या चाकोरीतून गेला, ती मध्यमवर्गीय माणसाला मानसिक धक्का देणारी आहे. कोवळ्या वयातलं नाऱ्याचं भावविश्व आणि त्याच्या अवतीभवती भयंकर वास्तव याचं या कादंबरीतलं चित्रण जण्याचा कुरूप चेहरा समोर ठेवतं. नाऱ्याच्या डोक्यावरचं अनुभवाचं हे ‘गटुळं’ विदारक सामाजिक परिस्थिती, गरीब माणसाची परवड, चुकीच्या रस्त्याला लागलेली मुलं, व्यसनामुळे उद्धध्वस्त होणारे संसार, जनावराच्या पातळीवरचं जगणं अशा अनेक गोष्टींनी भरलेलं आहे. नाऱ्या भाजी विकून आईला मदत करतो, पण शाळेतली वर्गमैत्रीण भाजी घ्यायला आली की त्याला शरम वाटते. शाळेतली त्याची टिंगल होते. नाऱ्याचं संवेदनशील वयातलं मानस कादंबरीत उलगडून समोर येतं. १९५५ ते १९६८ या काळातल्या मुंबईचं चित्रणही वैशिष्ट्यपूर्ण आहे. नाऱ्यानं या वाटचालीत अनेकविध अनुभव घेतले. डोक्यावर भाजीची पाटी घेऊन वणवण फिरला. दारूड्या बापाशी भांडला-तंटला... त्याला झटापटीत मारहाणही केली. शाळेतल्या चंचल या मुलीशी त्याची मैत्री झाली, पण नाऱ्याची पार्श्वभूमी कळताच ही मैत्री झटकन तुटलीही. नाऱ्याचं जगणं, शिकणं भरकटणं, त्याला बरंच काही शिकवून गेलं. नाऱ्याच्या या अनुभवांमध्ये त्याचं वेश्यावस्तीतला शब्दांमध्ये गुंतणंही आहे. अंगावर काटा आणणारे बाललैंगिक शोषणाचे अनुभव आहेत. कॉलेजातलं अर्धवट शिक्षण, त्यानंतरच्या सरकारी नोकऱ्या यातून जाताना मदत करणारे, वाट दाखवणारेही भेटले. नाऱ्याच्या लग्नापर्यंतची ही कहाणी आहे. यापुढचा लेखकानं लिहिलेला भाग प्रसिद्ध व्हायचा आहे. आपल्या आयुष्यात नाऱ्याला प्रेरणा आहे आईची. आईच्या कष्टांचा, तिच्या डोळ्यातील पाण्याचा तो साक्षीदार आहे. बापाबद्दल चीड बाळगणारा लेखक बापानं आपल्याला माझ्यासारखं वागू नकोस म्हणून कसं सांगितलं होतं तेही लिहितो. नाऱ्याच्या जीवनातले हे खळबळजनक, वेदनापूर्ण दिवस समाजापुढे काही प्रश्न ठेवतात. त्याला जाबही विचारतात. बोली भाषेचा वापर, विस्कळित जगणं तशाच पद्धतीने मांडणारी शैली आणि नाऱ्याचं ‘मी’पण उलगडून सांगणारं प्रांजळ निवदेन यामुळे ‘गटुळं’ मनाला भिडतं. त्यातला सूर नुसताच तक्रारीचा नाही. तक्रारीपेक्षा वास्तवाचं दर्शन थेटपणे घडवण्याला लेखकानं महत्त्व दिलं आहे. आपल्याबरोबर इतरांच्याही वेदना कळत-नकळत चित्रित केल्या आहेत. लेखकाची ही सहवेदना या लेखनाला एक निराळी उंची प्राप्त करून देते. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 11-05-2003

    विदारक परिस्थितीचं भेदक दर्शन… जाती, धर्म यांच्या भेदाभेदांनी पोखरलेल्या आणि आर्थिक उच्चनीचतेच्या उतरंडीने माणसाला श्रेष्ठकनिष्ठा देणाऱ्या भारतीय समाजात, दैववशात् लाभलेला जन्मच कुणाला कधी सुखाच्या शिखरावर बसवू शकतो, तर कुण्या दुर्भाग्याला विनाअपराध ु:ख-अपमानाच्या नरकात लोटू शकतो. त्या प्रतिकूलतेला मूकपणे शरण जाणाऱ्यांचा एक गट बहुसंख्येने आढळतो. दुसरा गट आढळतो तो ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय’ असा आक्रस्ताळेपणा करीत आपल्या समाजाच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांचा! तिसरा गट तुलनेने ‘अल्पसंख्याक’ असतो, पण तोच या समाजाला विधायक वळण लावत असतो. या गटातील सूज्ञ, दैवजात दु:खांबद्दल आकांडतांडव न करता, जिद्दीने जन्मजात प्रतिकूलतेशी झगडून तिच्यावर मात करतात आणि स्वत:चे एक स्थान तथाकथित उच्चवर्णियांत निर्माण करतात. चर्मकार समाजात जन्मलेले मुंबईतील एक समाजसेवक रवींद्र बागडेलिखित ‘गटुंळ’ ही आत्मकथनपर कादंबरी वाचताना वरील सारे विचार मनात येतात. त्यामुळेच मुंबईतल्या पदपथावर अमानुष जिणे जगत वाएलेल्या लेखकाचे स्वत:च्या जिण्याबद्दलचे हे चित्रण वाचल्यानंतही वाचक खचून जात नाही; उलट हे पुस्तक त्याला जगण्याची उमेद देऊन जाते. ‘गटुळं’ नायक नाऱ्या हे मुंबईतल्या फूटपाथवर वाढलेल्या लेखकाचेच प्रतिरूप! कमालीचे दारिद्र्य, दारूच्या व्यसनामुळे कुटुंबाची धूळदाण उडवणारा बेजबाबदार बाप, नवऱ्याचा मार खात सात पोरांच्या पोटाला घालण्यासाठी सतत कष्ट करणारी आई आणि सभोवतालच्या बहुरंगी, बहुढंगी मुंबापुरीच्या झगमगत्या पार्श्वभूमीवर वाट्याला आलेले घाणेरड्या फूटपाथवरचे ढोरागत हेच नशिबी आलेल्या नाऱ्याच्या भावविश्वात अनेक जहरी अनुभवांचे ‘गटुळं’ आहे. यातले फूटपाथवरच भाज्यांच्या हाऱ्यांत, फळांच्या खोक्यात दैनंदिन वापराच्या वस्तू, चिरगुटं ठेवत वर्षानुवर्षे जगणाऱ्या नायकाचे भयानक कौटुंबिक जीवन, वेश्याव्यवसायाचे जगावेगळे जग, रेस/जुगार यांचे भोवंडून टाकणारे विश्व या साऱ्यांचे लेखकाने प्रत्ययकारकतेने केलेले चित्रण संवेदनशील पांढरपेशा वाचकांच्या मनाला भोवळ आणते. मग तो ढोर चाळीत यल्लमाच्या आरतीच्या वेळी भग्या जोगत्याकडून कोवळ्या नाऱ्याला आलेला विकृत लैंगिक अनुभव असो की, शाळेला दांडी मारून सिनेमा बघायला गेला असता, शेजारी बसलेल्या पुरुषांनी त्याच्याशी केलेले लैंगिक चाळे असोत. लेखक ते सारे घृणास्पद अनुभव काहीही हातचे न राखता वर्णन करतो. पण ते सारे जीवनाचा अटळ भाग आहे, हे उमजल्यामुळे, ती वर्णने वाचक कडू औषणाप्रमाणे रिचवतो. लेखकाची स्मरणशक्ती तल्लख आहे. त्यामुळे अशा या कडवट प्रसंगांबरोबरच संबंधित व्यक्तींच्या व्यक्तिरेखाही तो हुबेहूब साकारतो. त्यामुळेच बायकोच्या मंगळसूत्रवाटीचे पैसे घराच्या भाड्याऐवजी दारूत उडवून टाकणारा, नाऱ्याच्या पहिल्या पगाराचे कौतुक करण्याऐवजी तो चोरून दारूवर उधळणारा, पतीचे/पित्याचे कोणतेही कर्तव्य न बजावताही पत्नीवर नवरेशाही गाजवणाऱ्या बापाचे चित्रण लेखक यथायोग्य करतो. लेखकापासून पोटुशी राहिलेल्या शबनम या वेश्येचे, कष्टाळू आई सायत्रा, त्याच्यावर प्रेम करणारी पण तो भाजीविक्रेता आहे हे कळल्यावर त्याच्याकडे पाठ फिरवणारी वर्गमैत्रीण चंचगल, घरची रोजची भांडणं सहन न होऊन विष खाणारा भाऊ नामदेव या साऱ्या व्यक्तिरेखा लेखकाने नेमकेपणाने उभ्या केल्या आहेत. सभ्यतेची बंधने झुगारून, रांगड्या, बोलीभाषेत सहज उलगडत जाणारी ‘गटुळं’ कादंबरी परिस्थितीचं विदारक दर्शन घडवते आणि वाचकाला अंतर्मुख करते. -नीला उपाध्ये ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more