* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GRAMIN BOLICHA SHABDAKOSH
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663839
  • Edition : 4
  • Publishing Year : MARCH 2003
  • Weight : 200.00 gms
  • Pages : 144
  • Language : MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WORDS AND THE LANGUAGE THEREAFTER IS THE GREATEST BOON TO THE MANKIND. WORDS ARE THE MEDIUM OF ACQUIRING KNOWLEDGE, FULFILLING OUR DAILY NEEDS AND AFFAIRS. EVERY LANGUAGE HAS ITS OWN BEAUTY WHICH IS REVEALED IN THE CULTURE OF EVERY SOCIETY. INDIA HAS A VERY RICH AND VARIED HERITAGE. INDIAN LANGUAGE IS ALSO EQUALLY RICH AND VARIED. THE LANGUAGE DIFFERS FROM REGION TO REGION, STATE TO STATE, AND COMMUNITY TO COMMUNITY. EACH LANGUAGE IS FULL OF BEAUTIFUL WORDS EXPRESSING THE FEELINGS IN PERFECT WORDS. BUT IF NOT USED, THESE WORDS WOULD SOON BECOME A FORGOTTEN THING. TODAY, ALL OF US ARE AWARE THAT MANY POWERFUL AND MEANINGFUL WORDS HAVE ALREADY BEEN EXTINCT. WITH THE PURPOSE OF GIVING THROUGH THIS BOOK, THE AUTHOR HAS ATTEMPTED TO BRING BACK MANY SUCH FORGOTTEN WORDS, HE HAS COMPILED THEM TOGETHER FOR OUR PERUSAL AND A NEW DIMENSION TO THE MARATHI LANGUAGE TO BRING BACK SOME OF ITS GLORY. HE DOES NOT BOTHER MUCH TO FIND THE ORIGIN OF THE WORDS, ON THE CONTRARY HE STRIVES TO MAKE US FAMILIAR WITH THEM BY PRESENTING A BIT OF ITS HISTORY AND EXAMPLES TO RELATE THEIR PERFECT USE. THIS IS SURELY A VERY GOOD ATTEMPT TO BRING BACK THE FORGOTTEN WORDS TO THE PRESENT; ONCE AGAIN.
शब्द आणि शब्दांनी तयार झालेली भाषा ही मानवाला मिळालेली फार मोठी देणगी आहे. हे शब्द, ही भाषा दैनंदिन व्यवहाराचे साधन, ज्ञानसंपादनाचे माध्यम असते. प्रत्येक भाषेतील शब्दसौंदर्य हे त्या समाजाच्या संस्कृतीचे दर्शक असते. अठरापगड जाती तसेच शहरी व ग्रामीण भागात विभागलेल्या भारतीय समाजात वापरात असलेल्या बोली भाषेतील अनेक शब्द हे अभिव्यक्तीच्या दृष्टीने अतिशय प्रभावी, अचूक अर्थ प्रकट करणारे आणि ताजे टवटवीत असतात. परंतु हे शब्द वापरात राहिले नाही तर ते विस्मृतीत लोप पावतात. आपल्या लोकजीवन आणि लोकसंस्कृतीतील कितीतरी शब्द ‘अर्थपूर्ण’ असूनही हळूहळू लोप पावत चालले आहेत. अशा लोप पावत चाललेल्या बोलीमधील शब्दांची अतिशय मनोरंजक ओळख या संग्रहातून करून दिली आहे. या शब्दांची ओळख करुन देताना, त्यांच्या व्युत्पत्तीवर फारसा भर न देता ग्रामीण लोकजीवनात तो कसा, कोणत्या अर्थाने वापरला जात होता, त्याचा विस्तार कसा होत गेला, यावर अधिक भर देण्यात आला आहे. लोप पावणाNया लोकसंस्कृतीच्या या शब्दरूपी सुवर्णमुद्रांना झळाळी देण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न.
राज्य पुरस्कार २००२-०३
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #GRAMINBOLICHASHABDAKOSH #GRAMINBOLICHASHABDAKOSH #ग्रामीणबोलीचाशब्दकोश #REFERENCEANDGENERAL #MARATHI #D.T.BHOSALE #डी.टी.भोसले "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more