* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171613533
  • Edition : 2
  • Publishing Year : JULY 1994
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 160
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A BIOGRAPHICAL ACCOUNT OF THE FUGITIVE WHO HAS SINGLE-HANDEDLY HELD THE INDIAN STATE TO RANSOM FOR MORE THAN A DECADE. THE AUTHOR FOLLOWS VEERAPPAN S CAREER FROM SMALL-TIME POACHER TO THE MOST WANTED MAN IN INDIA.HE EXAMINES VEERAPPAN`S RELATIONSHIP WITH HIS WIFE, HIS BROTHERS AND MEMBERS OF HIS GANG AND DESCRIBES IN DETAIL THE METHOD AND MADNESS OF THE MURDERS AND KIDNAPPINGS VEERAPPAN HAS BEEN ACCUSED OF.METICULOUSLY RESEARCHED BY AN INVESTIGATIVE JOURNALIST.BASED ON ACTUAL POLICE RECORDS, MEDIA REPORTS AND INTERVIEWS.FIRST-EVER PORTRAIT OF A MAN ALTERNATELY HAILED AS MESSIAH AND MURDERER.
"ग्रामीण कथालेखक म्हणून विशेष प्रसिद्ध असणारे अनंत भोयर यांचा ‘हराळी’ हा सतरा कथांचा संग्रह. यातील कथा मुख्यतः कास्तकारी (शेती) विषयाशी संबंधित आहेत. शेती करताना येणाNया नानाविध अडचणींना तोंड देताना शेतकNयाला कोणकोणती कसरत करावी लागते याचे वर्णन अनेक कथांमध्ये आले आहे. मुळात शेती ही पावसावर (बेभरवशी) अवलंबून असते. तसेच कधीकधी अशी टोकाची वेळ येते की, ही शेतजमीन विवूÂन अन्य व्यवसाय करावा विंÂवा पिकाची चांगल्या प्रकारे निगराणी करूनसुद्धा मालाची विक्री न झाल्यामुळे, अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने तर कित्येकदा उत्पादन खर्चाइतकेही पैसे न मिळाल्याने शेतकरी त्रासून जातो; अगतिक होतो. उदाहरणार्थ वावरातल्या (शेतातल्या) कामाला कोणीही मजूर मिळेना म्हणून भंगार मालाच्या धंद्यातून शेतजमीन खरेदी करणाNया भंगारवाल्यालाच ‘माझी जमीन विकत घेतो का? असे विचारण्याची वेळ प्रतिाQष्ठत कास्तकारावर कशी येते त्याचे वर्णन ‘टिनटप्पर’ कथेत आहे. तर प्रमुख शेतमजुरांतील आपापसांतील (विशेषतः स्त्री-पुरुष शेतमजूर) स्पर्धा, वर्चस्वासाठी वादावादी विंÂवा भांडणाचा मूळ मालक असणाNया कास्तकाराला कसा फायदा विंÂवा तोटा होतो याचे वर्णन ‘तितंबा’ कथेमध्ये आहे. शहरी भागातल्या लोकांना हराळी हे हिरवे गवत मऊ-मुलायम गादीसारखे म्हणून आकर्षक व सुखदायक वाटते; तर तेच हिरवे गवत भरपिकात वारंवार तणासारखे पसरत/माजत असल्याने शेतकNयाला किती त्रासदायक ठरते याचे वर्णन ‘हराळी’ या कथेत आले आहे. या कथासंग्रहात आजूबाजूच्या समाजात आढळणारी विविध माणसे, त्यांचे स्वभाव आणि त्यांच्या मनांतील दुःखे जाणून घेणाNया ग्रामीण ढंगाच्याही अनेक कथा आहेत. उदाहरणार्थ इतर सर्व बोलत असताना महत्त्वाची गंभीर गोष्ट सांगायला खूप वेळ संधीच न मिळाल्याने एका खेडूताची झालेली कोंडी ‘काटा’ कथेत आहे. तर पत्नीच्या माहेरचा ओळखीचा माणूस तिला भेटायला येऊन तिच्याशी गप्पा मारत राहातो. झोपेचं सोंग घेऊन नवरा ते ऐकत असतो; त्यामुळे त्याच्या मनात नको ते विचार येऊन त्याला पाहुण्याचा मत्सर वाटू लागतो, असा आशय ‘पांघरून’ या कथेमध्ये आला आहे. उत्सुकतापूर्ण सुरुवात, आकर्षक मध्य, शेवटी निरगाठ आणि तिची उकल विंÂवा शक्य झाले तर कलाटणी या तंत्रात कथा बसवण्याचा अनेक लेखकांचा प्रयत्न असतो आणि असं तंत्र जो अवलंबतो, त्यांच्या कथांत तंत्र राहतं; मंत्र जातो. मात्र, ‘हराळी’ या कथासंग्रहात अनंत भोयर यांनी आपल्याला भावलेले जीवनातील कलात्मक अनुभव शक्यतो, जसेच्या तसे व्यक्त केले आहेत, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. जीवनातल्या भडक प्रसंगांपेक्षा माणसांच्या मनांतील दुःखांचा वेध घेणं आणि अशा मनाचे पापुद्रे उलगडणं हा भोयर यांच्या लेखणीचा एक विशेष आहे. आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहून त्यांना शब्दरूप देणं ही तशी कष्टसाध्य गोष्ट आहे. भोयर यांना ती साध्य झाली आहे. "
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BHOYARANANT #HARALI #हरळी"
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more