* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663358
  • Edition : 4
  • Publishing Year : JULY 1991
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 116
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :MADHAVI DESAI COMBO 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HUMAN NATURE IS STRANGE INDEED. ONE NEVER LIKES WHAT ONE HAS GOT. THE MIND LUSTS FOR THE UNATTAINABLE. WHILE WALKING ALONG ONE PATH, THE OTHER PATH SEEMS BETTER; AND AMIDST THIS CONFUSION, THE TRUE PATH ELUDES US. MANY COUPLES STRUGGLE TO FIND THE TRUE PATH AS THEY LIVE THEIR LIVES. BUT THOSE WHO HAVE UNDERSTOOD THE MEANING OF LIFE, SUCCEED IN ACHIEVING BALANCE AND EQUANIMITY. ‘HARAVALELYA VATA’ – A NOVEL THAT EXPLORES SUCH SUCCESSFUL LIVES.
माणसाचा स्वभावच विचित्र असतो. त्याला जे मिळालेलं असतं, ते त्याला कधीच आवडत नसतं. आणि जे अप्राप्य, त्याचा हव्यास लागलेला असतो. या वाटेवरून चालावं, तोवर पलीकडची वाट बरी वाटते; आणि या संभ्रमातच खरी वाट हरवून जाते. संसारात अनेक स्त्री-पुरुष अशा हरवलेल्या वाटांवरून चालत असतात. खरी वाट शोधत असतात. ज्यांना जीवनाचा स्पष्ट अर्थ समजलेला असतो, ते मात्र समतोल वृत्तीने वाटचाल करत असतात. अशा जीवनाचं चित्रण करणारी कादंबरी- हरवलेल्या वाटा!

No Records Found
No Records Found
Keywords
#MADHAVIDESAI #NIYATI #HAEVALELYAVATA #MANJIRI #KANCHANGANGA #PRARTHANA #DHUMARE #SAGAR #SHUKRACHANDANI #ASA MHANUNAKOS #KATHASAVALICHI #
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 17-07-1993

    गुंतागुंतीत ‘हरवलेल्या वाटा’… ‘हरवलेल्या वाटा’ ही माधवी देसाई यांची सामाजिक कादंबरी. प्रख्यात अ‍ॅडव्होकेट विजय-आभा-रेणू आणि डॉ. तेजस्विनी मेहंदळे व डॉ. प्रशांत. ही सारी प्रमुख पात्र. घटस्फोटाच्या कल्पनेनही स्त्री किती व्याकुळ होते, मग भले ती सुशिक्षत किंवा डॉक्टर असो. अगर सामान्य गृहिणी असो. डॉ. प्रशांतने घटस्फोटाची नोटीस पाठवल्याने उद्ध्वस्त झालेली तेजस्विनी निखळत्या संसाराचे दुवे जुळविण्याकरिता अ‍ॅडव्होकेट विजयकडे सल्ला घेण्याकरिता येते आणि तिच्या जीवनाची कहाणी ऐकताना अ‍ॅडव्होकेट विजय तिच्या आयुष्याची तुलना स्वत:च्या आयुष्याशी करू लागतात. आणि आजवर बुद्धिमान सहकारी म्हणून जिला सर्वांर्थान आपलं मानलं त्या अ‍ॅड. आभाच अस्तित्व नेमकं काय हा प्रश्न विजयला सतावतो. त्याहीपेक्षा त्रासदायक वाटतं ते त्यांच रेणूशी आपल्या बायकोशी वागणं, तिचा तिरस्कार... तिचा मानसिक छळा आणि तिच्या सोशिकतेचा अंत पाहणारा त्यांचा तिच्या चारित्र्यावरचा आरोप !... रेणूचं दूर निघून जाणं आणि तेजस्विनीच्या मोडकळीला आलेल्या संसारातून विजयला रेणूची आठवण तीव्रतेनं होणं... आणि त्यांनी रेणुकडे जाणं... पण त्या वाटेवर रेणू आहे का ?... का ती वाट कधीच हरवलीय ? ह्या प्रश्नचिन्हासहितचा शेवट असलेली ही कादंबरी फारशी पकड घेणारी नसली, तरी माधवी देसार्इंनी अलंकारिक शब्दांची पुनरावृत्ती टाळल्याने वाचताना ‘कंटाळवाणे’ होत नाही हेच या कादंबरीचे वैशिष्ट्य. यातली सारी पात्र ओढून ताणून आणल्यागत वाटत असल्याने भाववृत्तीचा परिपोष इथं नाही. ‘कथेसाठी कथा’ या पार्श्वभूमीवर एकत्र आणलेली पात्रं ठाव घेऊ शकत नाही. मात्र कोकण परिसराचं वर्णन, कोकणातला समुद्र आणि मुंबापुरीच्या समुद्राची प्रसंगानुरूप आलेली तुलनात्मक वर्णनं सुरेख तर आहेतच पण त्यातून माणसाच्या प्रवृत्तीचा वेध घेण्याचा प्रयत्न देखील चांगला साधला आहे. ‘नाच ग घुमा’ नंतरची ही स्वतंत्र सामाजिक कादंबरी. या कादंबरीचं कथानक जरी चांगलं असलं तरी पात्राच्या अवास्तव गुंतागुंतीत खरी वाट हरवली आहे असच वाटायला लागतं. प्रत्येक पात्राच्या आयुष्याचा आलेख पहाता त्यांची खरी वाअ हरवलेली आहे या अर्थाने शीर्षकाची समर्पकता पटते. चंद्रमोहन कुलकर्णीचं मुखपृष्ठ कल्पक आहे. ढोबळ दोष वगळता कादंबरी वाचनीय आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.